शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

आंध्र प्रदेशात नोकरीसाठी गेलो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:32 IST

बदली झाली, थेट आंध्र प्रदेशात. भाषा, जेवण, राहणीमान सगळंच वेगळं. पण पर्याय काय होता?

ठळक मुद्देशहरं आपल्याला स्वीकारतात, आपण रुजलं पाहिजे!

- प्रशांत धमाळ

माझं पदवीर्पयतचं शिक्षण माझ्याच शहरात म्हणजे नागपूरलाच झालं. सरकारी नोकरी मिळावी या प्रयत्नात असताना झिरो बजेटचं आक्रमण झालं त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचा मार्ग जवळ-जवळ बंद झाला होता.वडील सेवानिवृत्त झाले होते. घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शहाण्या पोरासारखं पुढील शिक्षण, सरकारी नोकरी इत्यादीच्या भानगडीत न पडता आपल्या शहरातच खासगी कंपनीत नोकरीला लागलो. काही दिवसांतच कंपनीनं कामानिमित्त मला दुसर्‍या राज्यात म्हणजे आंध्र प्रदेशातील कर्नुल या जिल्ह्यात पाठवण्याचं ठरवलं.आपले शहर सोडून बाहेर न गेलेला मी, एकदम परराज्यात जाणं अवघड झालं. कंपनीने जाणं आवश्यक आहे असं स्पष्ट सांगितलं. नोकरी आणि पैशाची गरज लक्षात घेता, मी आपलं शहर सोडून परराज्यात जाण्याचा निर्णय घेतला.स्वतर्‍चं घर, माणसं आणि शहर सोडून मी प्रथमच, एकटाच भलामोठा प्रवास करून आंध्र प्रदेशातील कनरुल जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी रहावयास गेलो. तेथील बस स्टॅण्डवर उतरताच मला रडू कोसळलं. फार मोठं आभाळ कोसळलं असं वाटू लागलं. लगेच घरी परत जावं की काय, असा विचार मनात येत होता. मला घेण्यासाठी तेथील एक कर्मचारी आला होता. त्याला मोडकंतोडकं हिंदी येत होतं. त्यानं माझं खूप प्रेमानं स्वागत केलं. बरं वाटलं, हायसंही वाटलं.  तिथली भाषा, राहणीमान, संस्कृती अतिशय वेगळी.  मलासुद्धा ते वेगळेपण नकोसं वाटत होतं. तेथील खानपान, वातावरण यामुळे माझी प्रकृती आठवडाभरातच बिघडली.  मी कंपनीला परत बोलावण्यासाठी विनंती केली, परंतु कंपनीनं परवानगी नाकारली. मला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं होतं. तब्येत खालावली होती. घरी याबाबत सांगणं योग्य नव्हतं. घरच्यांना त्रास नको म्हणून माझ्या अवस्थेविषयी घरी काहीच सांगितलं नाही. माझी ही अवस्था माझ्या त्या सहकार्‍याला मात्र दिसत होती. त्यानंच जेवण, राहणं याची सोय करायला मदत केली होती. एकदा त्यानं आग्रहानं मला आपल्या घरी रहावयास नेलं. त्यानं व त्याच्या पत्नीनं मला आधार दिला. दवाखाना, माझ्या आवडीचं जेवण, माझी आवड-निवड याबाबत ते विशेष काळजी घेऊ लागले. आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी मला माया दिली. त्यांना हिंदीसुद्धा फारशी येत नव्हती, इंग्रजी कळत नव्हतं आणि मला त्यांची भाषा म्हणजे तेलुगु येत नव्हती. तरीसुद्धा भावनिक नातं, माणुसकीच्या नातं होतंच. त्यातून एकमेकांशी बोलणं सुरू झालं. संवाद उत्तम होता. प्रेमाला भाषेची गरज नसते,  भावनेची बोली कळते हे तेव्हा उमजले. या संबंधांमुळे माझी प्रकृती सुधारली. मला माझ्या कामामध्ये आणि तेथील वास्तव्यात आनंद येऊ लागला.परक्या गावी असा जीव लावणारी माणसं भेटतात, हा अनुभवच मला उभारी देऊन गेला.  त्या कुटुंबासोबत मी रुळलो. काही दिवसांतच मी  तेलगु भाषा शिकलो. जेवण आणि पोषाख (लुंगी आणि सदरा) आपलंसं  केलं. सलग तीन वर्षे तिथे वास्तव्य केले. याकाळात माझ्यामध्ये धीटपणा आला. गावाकडं येणं-जाणं, घराबाहेर राहणं याची सवय झाली, हिंमत वाढली.या अनुभवातून नोकरीनिमित्त कुठेही जाण्याची मनाची तयारी झाली. पुढे दुसरी नोकरी चांगल्या पगाराची, महाराष्ट्रात जालना येथे मिळाली. हे दुसरं स्थलांतर. पहिल्या परराज्यातील अनुभवामुळे ते सुखावह ठरलं. नोकरीनिमित्त जालन्याहून औरंगाबाद, त्यानंतर वर्धा आणि आता पुणे असं स्थलांतर सुरूच आहे. हे स्थलांतर मला आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्टय़ा समृद्ध करत गेलं. घराबाहेर येणार्‍या अनेक अडचणी, नवीन लोकांशी होणारा परिचय, तडजोडी, संकटांना सामोरं जाण्याचं सामथ्र्य, घर सोडून बाहेर पडल्यानंतरच मिळालं.नवीन शहरं, महानगरं यामध्ये आपण स्वतर्‍ला कसं स्वीकारतो त्यावर आपल्याला येणारा अनुभव अवलंबून असतो. आयुष्यात यशस्वी, स्वावलंबी होण्यासाठी स्थलांतर गरजेचं आहे. आजच्या स्पर्धात्मक दिवसांत, आपल्या सर्वागीण विकासासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी मित्रांनो स्थलांतरास तयार राहा. मोठी शहरं आपल्याला स्वीकारायला तयार असतात, याची खातरी बाळगा.