शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

व्हॉट आॅर्डर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:24 IST

आॅनलाइन ७/१२ चा उतारा ते आधार हे सारं काय आहे, डिजिटल इंडिया की इंडस्ट्री ४.०?

डॉ. भूषण केळकरगेल्या वर्षी मी अमेरिकेत गेलो असताना मित्राबरोबर त्याच्या गाडीतून चाललो होतो. स्टारबक्समध्ये कॉफी प्यायला निघालो. गाडीत बसल्यावर मित्र म्हणाला ‘कॉफी’. तो मित्र माझ्याशी बोलत नव्हता, तो त्याच्या गाडीशी बोलत होता. गाडीनं विचारलं, स्टारबक्स? तो हो म्हणाल्यावर गाडीनं विचारलं, व्हॉट आॅर्डर? तो म्हणाला, माय युजवल फॉर मी, वन मोअर हॉट चॉकलेट! मग गााडीनं सांगितलं की सगळ्यात जवळचं स्टारबक्स २० मिनिटांवर (२० मैलांवर) आहे. तेवढ्यात शॉर्टेस्ट रूट स्क्रीन जीपीएसवर आला. आणि आम्ही निघालो. वाटेत आमच्या गप्पा चालू असताना अचानक गाडी बोलू लागली की ‘आम्हाला पोहोचायला ट्राफिकमुळे उशीर लागेल’ त्यामुळे गाडीनंच मग आमची आॅर्डर (त्या मित्राची नेहमीची कॉफी आणि माझे हॉट चॉकेलट) कॅन्सल करून पुन्हा रिआॅर्डरपण केली. म्हणजे आम्ही (आता उशिराने) पोहोचण्याची वेळ व कॉफी/चॉकलेट येण्याची वेळ साारखीच येईल! मला त्या हॉट चॉकलेटची नितांत गरज होती कारण मी हे सगळं पाहून एव्हाना गपगार पडलो होतो!हे काय आहे?हेच तर आहे इंडस्ट्री ४.०!तुम्ही म्हणाल, अहो अमेरिकेत हे होऊ शकेल; पण भारत आणि इतर विकसनशील देशांत ही फार पुढची गोष्ट आहे.असं म्हणता, जरा तपासून पाहूया.आपल्याकडेही आता शेतातला पाण्याचा पंप चालू करण्यासाठी अनेक शेतकरी मोबाइल फोनचा वापर करताहेत.जन्म दाखला, ७-१२चा उतारा या गोष्टी आता इंटरनेटवरून उपलब्ध होताहेत, नाशिक ते चंद्रपूर सगळीकडेच, देशभर! १०-१२ वर्षांपूर्वी पुण्यात जीपीएसविषयी उपहासानं बोललं जायचं की ११२ सदाशिव आणि ११३ सदाशिव हे दोन पत्ते गूगल शोधूच शकणार नाही; कारण ते कधीच जवळ जवळ नसतात! आज सदाशिव-नारायणपेठ सकट सर्व पुणे गूगल मॅपवर उपलब्ध आहे. तेही अचूक!माझ्या मित्राच्या आजोबांना साधा फोनसुद्धा १५ वर्षांपूर्वी हायफाय वाटायचा. आज ते विजेचं बिल मोबाइल अ‍ॅपवरून भरताहेत आणि बँकत जाणं कमी झालंय. बँकेच्या अ‍ॅपमुळे तब्येतीमुळे नाही बरं का, तब्येत खणखणीत आहे त्यांची!असो, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की इंडस्ट्री ४.० ही लाट, त्सुनामी फक्त युरोप-अमेरिकेसाठी नाही. ते स्वाभाविकच नाही का? थॉमस फ्रिडमनचं वर्ल्ड इज फ्लॅट नावाचं पुस्तक आहे. त्यात जागतिकीकरण, त्याचे सुदूर परिणाम व त्यांची अपरिहार्यता याचं वर्णन आहे. आता हेच बघा ना, सौदी अरेबिया आणि सिरिया-इराणमधील ताणतणावाचा परिणाम पुणे, मुंबई, नाशिकमध्ये पेट्रोलचे भाव वाढण्यात होतोच! एचवन बी व्हिसाच्या अमेरिकेतील नियमातील बदलांचा परिणाम भारतात आयटी कंपन्या किती पदवीधारकांना नोकºया देतील यावर होतो. सबब, इंडस्ट्री ४.० म्हणून जर्मनीत २०११ मध्ये सुरू झालेली ही लाट पुणे-मुंबई-नाशिक-नागपूरच नव्हे तर सातारा-सांगली-मालेगाव-चंद्रपूर अन् रत्नागिरीतपण दिसणार आहे, दिसत आहे.आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा ती दिसतेय. त्याची ही उदाहरणं..१) गाड्यांचं पार्किंग आता आॅटोमेटेड होतं आहे. पार्किंग लॉटमध्ये पार्किंग उपलब्ध आहे. ते कुठे आहे त्याचा नकाशाच तुम्हाला उपलब्ध होतो.२) घरातला रेफ्रिजरेटरसुद्धा नुसतेच तपमान नियंत्रित करतो असं नाही तर कुठल्या प्रकारचं व किती अन्न आहे याचा अंदाज घेऊन ते नियंत्रण करतोय. नुसतं एवढंच नाही तर तुम्हाला आजकाल मोबाइल वरून घराबाहेर कित्येक मैलच्या अंतरावरूनही ते नियंत्रण ठेवता येऊ शकतं.३) खरेदी करताना किमती व वस्तू/सेवांचा दर्जा याची तुम्हाला तुलना करता येते आहे. त्यात इतर लोकांच्या अनुभवावरून निर्णय पक्का करता येतोय.४) म्हणजे निष्कर्ष असा काढता येईल की इंडस्ट्री ४.० विकसित देशांमध्ये जेवढं खोलवर रुजलंय आणि जेवढं व्यापक झालंय, तेवढं भारतात (शहरी/ग्रामीण) नसलं तरी या बदलाची लाट भारतात आली आहे, रुजली आहे नक्की. ती वाढत जाणार हेही नक्की. डिजिटल इंडिया हा विचार केवळ संकल्पना नव्हे तर मूर्त रूपात येत असणारी क्रांती आहे.७-१२ चा उतारा, जन्म दाखलाा, एवढंच काय तर संपूर्ण आधार प्रणाली ही इंडस्ट्री ४.० चा आविष्कार आहे. सरकारी पातळीवरही या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे. कालचीच बातमी आहे - ‘पुणे महापलिकेचे इस्रोच्या सॅटेलाइटद्वारे अनधिकृत बांधकामांवर लक्ष’...आता बोला!!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com)