शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

नुसतं ट्रेडमिलवर पळण्यासारखं स्पर्धेत धावून काय मिळणार? बघा कोरोना पॉज काय म्हणतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:04 IST

माहिती तर पाहिजे, आपण कशासाठी पळतोय? कोरोना काळानं बेरोजगारी लादणं सुरूकेलं आहे, हे मान्य; पण तरुणांना तरी कुठं स्वत:ची नेमकी ओळख आहे? - तुमचं पॅशन काय, हे तरी यानिमित्तानं शोधा.

ठळक मुद्देआपली जीवनशैली कधी बदलणार याचा विचार झाला पाहिजे. 

डॉ. अच्युत गोडबोले

कोरोनाकाळ हा आताचा आहे. आता आणि एरव्हीही महत्त्वाचं काय, तर आपण आयुष्याकडं कसं बघतो?त्यावर खूप अवलंबून आहे. तरुण पिढीतले काही अपवाद सोडले तर बहुतेक जण आपलं आयुष्य पैसा, खोटी प्रतिष्ठा, करिअर यांच्या मागे धावण्यात घालवतात. स्पर्धा परीक्षा, त्यातली एकेका मार्कासाठीची जीवतोड मेहनत, नोकरीतल्या प्रमोशनसाठीची खेचाखेची, टू-बीएचकेसाठी जिवाचं रान.. यातच जगणं अडकून राहातं. सर्वस्व पणाला लावून एकाच गोष्टीसाठी इतर सगळे आनंद पणाला लावणं थांबलं पाहिजे. मुख्य गडबड इथे आहे. करोना आता आहे, थोडय़ा काळाने आटोक्यात येईलही. मात्न आपली जीवनशैली कधी बदलणार याचा विचार झाला पाहिजे. आपलं नेमकं झालंय काय ते आधी पाहू.1. गेल्या तीस वर्षात, जागतिकीकरण आल्यानंतरच्या काळात आपल्या सगळ्या आशा-आकांक्षा अवाढव्य होऊन बसल्या. पाश्चिमात्य जीवनशैलीचा मोह आपल्याला पडला. भुलवणा:या जाहिरातींचा सातत्यानं मारा सुरू झाला. आपला अटेंशन स्पॅन कमी होऊ लागला. हमखास यशस्वी व्हा, सर्वोत्कृष्ट सीईओ बना अशा पुस्तकांचा मारा सुरू झाला. तरु ण पिढी अतिमहत्त्वाकांक्षी बनली.2. मात्र तसं जगणं आत्मकेंद्री होत असताना अशी एखादी समूह पातळीवरची आपत्ती आली, की तरुण पिढी बिचकते, सैरभैर होते. भवतालाकडे आपण निकोप दृष्टीने बघतच नाही कधी. आपला दृष्टिकोन चंगळवादी, स्पर्धात्मक असा आपणच करून ठेवलाय. तो मुळात बदलण्याची गरज आहे. त्यातूनच या काळातली उत्तरं सापडू शकतील.3. आता तरी आपण आयुष्याकडं वेगळ्या, समृद्ध  नजरेनं बघण्याचा सराव करूया. मित्न, नातेवाईक यांचं मोल समजून घेऊया. स्वत:बरोबरचं नातंही नव्यानं शोधूया. पूर्वी चांगला माणूस कोण म्हणवला जायचा? तर ज्याला साहित्य-संगीत आणि कलांची आवड आहे, जो विज्ञाननिष्ठ आहे, विवेकवादी, परोपकारी आहे. आता सगळ्या व्याख्या बदलल्या. त्या कशामुळे? 4. अगदी आयुष्याचा जोडीदार निवडतानाही मानवी गोष्टी बाजूला ठेवत मुलं-मुली भौतिकच निकष लावतात.  चांगला माणूस  क्वचितच निवडला जातो. बहुतेकदा त्या माणसाऐवजी टू-थ्री बीएचके फ्लॅट, फोर व्हिलर यांचीच निवड होते. या सगळ्यात काय चूक, काय बरोबर याचा आता थोडा थबकून विचार करूया.5. या काळाचा प्रॉब्लेम मला काय वाटतो, तर मोठमोठी स्वप्नं हरेकाला दाखवली जातात; पण शंभरातल्या 1क् लोकांनाच शिखरावर पोहोचण्यात यश मिळतं. बाकीच्या नव्वद जणांचं काय? त्यांच्या अस्वस्थतेचं, अपयशाचं, नैराश्याचं उत्तर कोण देणार? फसव्या वक्त्यांची प्रेरणादायी भाषणं ऐकून कित्येक तरुण असेच वाहवत जातात. अंगाच्या कौशल्यांना वाव देत आनंदाने उपजीविका करण्याऐवजी स्पर्धेत अडकतात. आपल्या आयुष्याची सातत्याने इतरांशी तुलना करत राहातात. 

मग करायचं काय?1. ऑनलाइन वावर असो की वास्तव जग, अनेक तरुणांचं भकास जगणं हे करोनाच्याही पूर्वीचं वास्तव आहे. तरु ण पिढी जणू अखंड एका ट्रेडमिलवर धावते आहे. ध्येय काय, जायचं कुठं आहे हे नक्की माहीत नाही. पण धावताहेत. मी याचं गेली अनेक वर्षे निरीक्षण करतोय.2. आता या सा:यात अचानक कोरोना आला. आता या सगळ्या सक्तीच्या लॉक झालेल्या काळात करायचं काय, असा ज्याच्या-त्याच्या पुढे एकदम प्रश्नच निर्माण झाला.3. तर असा प्रश्न पडलेल्यांना मी सांगेन आधी आपण स्वत:च स्वत:ची तपासणी करावी. आधी महत्त्वाचं हे, की स्वत:चा शोध घ्या. ही त्यासाठी मिळालेली चांगली संधी आहे. या इष्टापत्तीचं तरु णांनी सोनं करावं. नोकरी-व्यवसायातली जास्तीची कौशल्यं तर  या काळात शिका. भाषा, संभाषणकला शिका; पण सोबतच भवतालाकडे जरा संवेदनशीलतेने बघा. 4. इतरांचं दु:ख कधी-कितपत जाणवतं आपल्याला? आज गरिबी/बेरोजगारी किती वाढलीय. आपण देश म्हणून जीडीपीच्या अगदी दीडेक टक्का आरोग्यव्यवस्थेवर खर्च करतो. यातून काय प्रकारचं भवितव्य नव्या पिढीला मिळणार आहे? एकीकडे अकुशल, अशिक्षित माणसं, तर दुसरीकडे हजारो शिक्षक बेरोजगार. विचारा स्वत:ला हा विरोधाभास का? आपली व्यवस्था भ्रष्ट, किडलेली असण्याची मुळं कशात आहेत? हे प्रश्न पडले पाहिजेत. नसतील पडत तर विचारा स्वत:ला, की माङयातलं काय मेलंय नक्की? लहान मुलासारखं कुतूहल माङयात का नाही?आपलं काहीतरी चुकलंय. आपलं काहीतरी राहून गेलंय हे जाणवू द्या. कोरोना येण्याआधीच आपण ज्या चक्रात अडकलो होतो, त्याचं स्वरूप समजावून घ्या. आपण प्रश्न विचारूच नयेत अशी व्यवस्था यंत्नणोने केलेली असते. तो कट ओळखा.5. येत्या काळात ज्या क्षेत्नांना मोठी मागणी असणार आहे ते आहेत इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा, थ्री-डी-फोर -डी प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हचरुअल रिअॅलिटी. यातली कौशल्यं शिकायला घ्या.6. महत्त्वाचं हे, की जुन्या वृत्ती बदलून काही वेगळं जगणं सुरू करू शकतो का हे बघा. अनेक विषयांमधल्या नवनव्या गोष्टी समजून घ्या.7. या काळाला सामोरं जाण्याचा एकच एक फॉम्यरुला नाही. आणि ही आपत्ती काय कायमची नाही. नंतर उभं राहायचं असेल, यातून तगून-तरून जायचं असेल, तर काही गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे, बदलाला सामोरं जाणं. दुसरं, तुमचे बेसिक्स क्लियर असणं. शिवाय तुम्हाला अनलर्न आणि रिलर्न करता येणं महत्त्वाचं.  नवे ट्रेंड्स कळले पाहिजेत. व्यवहार महत्त्वाचा आहेच; पण त्यापलीकडेही खूप मोठं जग आणि त्यातल्या उलथापालथी आहेत. त्या पाहा. सापडेलच वाट.

मुलाखत आणि शब्दांकन- शर्मिष्ठा भोसले