शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

गावठीपणाचा शिक्का पुसलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 08:46 IST

शहरं भरभरून देतात, घ्यायचं काय हे आपण ठरवायचं!

- अविनाश बाळू मोरे

अळसुंदे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातलं एक छोटसं गाव. वडील वारले तेव्हा वय अवघं सात वर्षं होतं. तेव्हापासून आई आणि मी, माझा लहान भाऊ जवळच्याच मामाच्या गावात राहात होतो. माझं दहावीपर्यंतच शिक्षण मामाच्याच गावात झालं. काहीतरी करायची जिद्द ठेवणारा प्रत्येकजण मोठ्या शहराकडे धाव घेतो तसा मी ही धावलो. जगणं घडवण्याची जिद्द बाळगून शहरात कॉलेजला जायचं ठरवलं.घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी बार्शीला जायचा पर्याय निवडला. बार्शी तसं परवडणारं होतं. अकरावी-बारावीसाठी मी बार्शीत शिवाजी कॉलेजला प्रवेश घेतला. तो माझ्या शिक्षणाचा टर्निंग पॉइंट होता. छोट्याशा गावातून शहरात आल्यावर घरट्यातल्या पक्ष्याला आभाळाचं दर्शन झालं असंच म्हणावं लागेल. अभ्यासात थोडं दुर्लक्ष झालं म्हणून बारावीत मार्क्स कमी झाले; पण मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द अजून होती. राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करावा अशी मनात इच्छा होती; पण माझ्या आईच्या इच्छेखातर मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं.त्यासाठी मला पुणे-मुंबईसारख्या शहरात जायचं होत; पण इथेपण आर्थिक बाजू नको म्हणाली. शेवटी मी कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजात प्रवेश घेतला. कोल्हापूर जरी महानगर असलं तरी आपल्या मातीशी जोडलेलं होतं. मराठीचं रांगडेपण या मातीत अजूनही जिवंत आहे. इथं आल्यानं मला मनासारखं वाट्टेल ते करायचं स्वातंत्र्य मिळालं होतं. मी भरभरून जगलो.चार वर्षे होत आली. शेवटचं वर्ष हे करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. इथं अडकला तर तो कायमचाच अडकतो. पण जर आपण ज्या उद्देशानं, जे मिळवायला इथं आलोय ते माझ्या लक्षात होतं. शेवटच्या वर्षात मोठ्या कंपनीत पदवी पूर्ण व्हायच्या आधी जॉबला लागणं हेच प्रत्येक इंजिनिअरचं स्वप्न असतं. मी गावातून आलेलो असल्यानं इथल्या शहरी मुलांच्या तुलनेत इंग्रजी भाषेत कमी पडायचो. इंग्लिश बोलता येत नसेल तर नामांकित कंपनीची स्वप्न सोडून द्यावी असा सगळ्यांचा सल्ला होता; पण मनात जिद्द पेटलेली होती. कॉलेजवर कॅम्प्स प्लेसमेंटसाठी येणारी पहिलीच मोठी कंपनी म्हणजे केपीआयटी. आपण याच कंपनीत प्लेस व्हायचं ही एकच जिद्द मनात ठेवून मी तयारी करत होतो. माझ्या तोडक्या-मोडक्या इंग्लिशची मित्र थट्टा करायचे; पण मी ठाम होतो. प्रयत्न करत होतो. माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्लिशवर आणि मनातल्या जिद्दीवर शंभर विद्यार्थ्यांमधूनही मला नोकरी मिळाली. आईचं स्वप्न मी साकार केलं याचं मोठं सुख मनात होतं.मोठ्या शहराकडे देण्यासारखं खूप असतं; पण आपल्याला काय पाहिजे हे आपणच ओळखायंच असतं. गावाकडचा पोरगा, गावराण भाषाशैली म्हणून गावठी असा टॅग मलाही सुरुवातीला लावण्यात आला. पण असा विचार करणाºया, स्वत:ला उच्चशिक्षित शहरी म्हणवून घेणाºयांकडे मी साफ दुर्लक्ष केलं. त्यांना आपल्या कर्तृत्वानेच उत्तर द्यायचं असा सकारात्मक विचार केला.अळसुंदे ते कोल्हापूर अंतर तसं २५० किलोमीटरच, पण माझ्यासाठी हा प्रवास फार मोठा आणि महत्वाचा होता.माझ्यासारखे कित्येकजण गावातून शहरात येतात. स्वत:ची ओळख निर्माण करतात. गावापासून दूर येतात; पण तरी आपल्या मातीची ओढ मनात कायमच असते. गाव मनात असतंच...