शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गावठीपणाचा शिक्का पुसलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 08:46 IST

शहरं भरभरून देतात, घ्यायचं काय हे आपण ठरवायचं!

- अविनाश बाळू मोरे

अळसुंदे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातलं एक छोटसं गाव. वडील वारले तेव्हा वय अवघं सात वर्षं होतं. तेव्हापासून आई आणि मी, माझा लहान भाऊ जवळच्याच मामाच्या गावात राहात होतो. माझं दहावीपर्यंतच शिक्षण मामाच्याच गावात झालं. काहीतरी करायची जिद्द ठेवणारा प्रत्येकजण मोठ्या शहराकडे धाव घेतो तसा मी ही धावलो. जगणं घडवण्याची जिद्द बाळगून शहरात कॉलेजला जायचं ठरवलं.घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी बार्शीला जायचा पर्याय निवडला. बार्शी तसं परवडणारं होतं. अकरावी-बारावीसाठी मी बार्शीत शिवाजी कॉलेजला प्रवेश घेतला. तो माझ्या शिक्षणाचा टर्निंग पॉइंट होता. छोट्याशा गावातून शहरात आल्यावर घरट्यातल्या पक्ष्याला आभाळाचं दर्शन झालं असंच म्हणावं लागेल. अभ्यासात थोडं दुर्लक्ष झालं म्हणून बारावीत मार्क्स कमी झाले; पण मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द अजून होती. राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करावा अशी मनात इच्छा होती; पण माझ्या आईच्या इच्छेखातर मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं.त्यासाठी मला पुणे-मुंबईसारख्या शहरात जायचं होत; पण इथेपण आर्थिक बाजू नको म्हणाली. शेवटी मी कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजात प्रवेश घेतला. कोल्हापूर जरी महानगर असलं तरी आपल्या मातीशी जोडलेलं होतं. मराठीचं रांगडेपण या मातीत अजूनही जिवंत आहे. इथं आल्यानं मला मनासारखं वाट्टेल ते करायचं स्वातंत्र्य मिळालं होतं. मी भरभरून जगलो.चार वर्षे होत आली. शेवटचं वर्ष हे करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. इथं अडकला तर तो कायमचाच अडकतो. पण जर आपण ज्या उद्देशानं, जे मिळवायला इथं आलोय ते माझ्या लक्षात होतं. शेवटच्या वर्षात मोठ्या कंपनीत पदवी पूर्ण व्हायच्या आधी जॉबला लागणं हेच प्रत्येक इंजिनिअरचं स्वप्न असतं. मी गावातून आलेलो असल्यानं इथल्या शहरी मुलांच्या तुलनेत इंग्रजी भाषेत कमी पडायचो. इंग्लिश बोलता येत नसेल तर नामांकित कंपनीची स्वप्न सोडून द्यावी असा सगळ्यांचा सल्ला होता; पण मनात जिद्द पेटलेली होती. कॉलेजवर कॅम्प्स प्लेसमेंटसाठी येणारी पहिलीच मोठी कंपनी म्हणजे केपीआयटी. आपण याच कंपनीत प्लेस व्हायचं ही एकच जिद्द मनात ठेवून मी तयारी करत होतो. माझ्या तोडक्या-मोडक्या इंग्लिशची मित्र थट्टा करायचे; पण मी ठाम होतो. प्रयत्न करत होतो. माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्लिशवर आणि मनातल्या जिद्दीवर शंभर विद्यार्थ्यांमधूनही मला नोकरी मिळाली. आईचं स्वप्न मी साकार केलं याचं मोठं सुख मनात होतं.मोठ्या शहराकडे देण्यासारखं खूप असतं; पण आपल्याला काय पाहिजे हे आपणच ओळखायंच असतं. गावाकडचा पोरगा, गावराण भाषाशैली म्हणून गावठी असा टॅग मलाही सुरुवातीला लावण्यात आला. पण असा विचार करणाºया, स्वत:ला उच्चशिक्षित शहरी म्हणवून घेणाºयांकडे मी साफ दुर्लक्ष केलं. त्यांना आपल्या कर्तृत्वानेच उत्तर द्यायचं असा सकारात्मक विचार केला.अळसुंदे ते कोल्हापूर अंतर तसं २५० किलोमीटरच, पण माझ्यासाठी हा प्रवास फार मोठा आणि महत्वाचा होता.माझ्यासारखे कित्येकजण गावातून शहरात येतात. स्वत:ची ओळख निर्माण करतात. गावापासून दूर येतात; पण तरी आपल्या मातीची ओढ मनात कायमच असते. गाव मनात असतंच...