शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वडे-समोसे चहा-कॉफी - उन्हाळ्यात त्वचेचे शत्रू

By admin | Published: April 27, 2017 5:17 PM

काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो

 -ऑक्सिजन टीम

 
 
उन्हाळा आला की नको होतो जीव, तगमग नुस्ती. घाम पुसून अर्धमेली होती त्वचा.  त्यात कोरडी किंवा तेलकट असेल त्वचा तर मग झालंच काम तमाम. त्यात आपल्या चूका. काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो आणि हातपाय तर असे जसे वाळकी लाकडेच!
यावर उपाय काय?
काही गोष्टी केल्या आणि काही टाळल्या तर उन्हाळ्यातही आपली त्वचा रसरशीत आंब्यासारखी मस्त दिसू शकेल.
 
1) भजीवडेसमोसे
उन्हाळ्यात भाजीपोळी नकोच होते. त्यात आपण सुटी म्हणून अरबट चरबट खातो. तेलकट, समोसे, वडे, आणि रस्त्यावरचं चमचमीत काय वाट्टेल ते भरतो. परिणाम म्हणून त्वचा तेलकट होते. जीव पाणी पाणी करतो पण ते ही कमीच पडतं. म्हणून कितीही इच्छा झाली तरी तेलकट पदार्थ टाळा. किंवा कमीत कमी खा.
 
2) कोल्डड्रिंक 
ते तर काय पितोच आपण. पण त्यातल्या अ‍ॅडेड शूगरचं काय? रंगांचं काय? सोडय़ाचं काय? तो एरिएटेड ड्रिंक्स धड पचत तर नाहीच. पण त्यानं कंबरेभोवतीची चरबी हमखास वाढते. त्यात हे पेय सतत प्याल्यानं भूक मरते, अनेकांना अजीर्ण होतं, अपचन होतं. पोट साफ होत नाही. त्यानं चेहर्‍यावर पिंपल्स वाढतात. म्हणूनच शितपेयं, अमूकतमूक मिल्क, तमूक मिल्कशेक, पॅक्ड ज्यूस हे सारं टाळा. फळं खा, ताजे रस प्या फळांचे ते ही वरुन साखर आणि बर्फ न घालता.
 
3) मेकअप
उन्हाळ्यात मेकअप करुन जाणार असाल तर किती करायचा याचं भान ठेवा. होतं काय, त्या मेकअपचे थर आणि घामांच्या धारा हे वाईट दिसंतच. पण त्यातून चेहर्‍याची त्वचा खराब होते ती वेगळीच!
 
 4) जागरण
हा आणखी एक महत्वाचा मुद्दा. सुटी आहे म्हणून भरपूर जागरणं केली जातात. आणि त्यानं बॉडी क्लॉक बिघडतं, चहाकॉफीचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनही चेहर्‍याचा नूर पार बदलून जातो.