शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मुक्काम IIT मद्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 07:37 IST

पैनगंगेच्या अभयारण्यात वसलेलं माझं गाव. बिटरगाव, ता. उमखेड, जि. यवतमाळ. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण इथंच झालं. सहावीत मला नवोदय विद्यालय घाटंजी (जि. यवतमाळ) इथं प्रवेश मिळाला.

- अंकित राऊत,उमरखेड ते जम्मू आणि राजस्थान ते चेन्नईया प्रवासानं चांगलं-वाईटनिवडायला शिकवलं तेव्हा..पैनगंगेच्या अभयारण्यात वसलेलं माझं गाव. बिटरगाव, ता. उमखेड, जि. यवतमाळ. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण इथंच झालं.सहावीत मला नवोदय विद्यालय घाटंजी (जि. यवतमाळ) इथं प्रवेश मिळाला. त्या काळी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणं ही फार मोठी गोष्ट होती. आई-वडिलांना सोडून, लांब आणि वसतिगृहात राहायचं मात्र होतं. नवोदय विद्यालय म्हणजे काय, बाहेर कसं राहायचं, स्वत:ची कामं स्वत: कशी करायची यातलं काहीही कळत नव्हतं.पण त्या लहानशा वयात एवढंच कळलं होतं की आपण काहीतरी नवीन करतोय, त्याची उत्सुकता मात्र होती. सुरुवातीचा एक महिना मला फार कठीण गेला. बाहेरच्या खाण्याची आणि राहायची सवय नसल्यामुळे नेहमी तब्येत बिघडत असे.नवोदयचे नियम आणि शिस्त फार कडक! सारखी घरची आठवण यायची. एकदा तर बाबांकडे शाळा सोडायचा आग्रहच धरला. तिथं न राहण्याची नाना कारणं मी सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, ‘तुला जर काही आयुष्यात करायचं असेल, स्वत:ला घडवायचं असेल तर कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागेल! धीर धर, हा अवघड काळ फार वेळ राहणार नाही.!’काय कळलं त्या वयात हे माहिती नाही; पण कठीण काळात टिकून राहायचं एवढं मनाशी नक्की केलं. नंतर मी कधीही माघार घेतली नाही.कारण पुढे नववीमध्ये तर मला थेट जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातल्या नवोदय विद्यालयात शिकायची संधी मिळाली. नवोदयमध्ये नववीतले काही विद्यार्थी एका वर्षासाठी दुसºया राज्यात शिकायला पाठवतात. त्यात माझी निवड झाली.नागपूर ते जम्मू हा माझा पहिला रेल्वे प्रवास. जम्मू नवोदयचा परिसर अतिशय सुंदर होता. तीनही बाजूंनी बर्फाच्छादित भल्या मोठ्या टेकड्या. आणि एका बाजूनं रावी नदीवरचे धरण. तिथं गेलो, सगळंच वेगळं. त्यात थोडं रॅगिंगही झालं.मात्र तिथली संस्कृती, बोलीभाषा, राहणीमान, भौगोलिक परिस्थिती याचाही अनुभव आला. या काळात आम्हाला राधाकृष्ण दुधाटे सर मराठी शिकवायला होते. त्यांनी शिस्त आणि नम्रता हे सारंही मराठीसोबत शिकवलं, ते अजून साथ ेदेतंय.दहावी झाली. अकरावी- बारावीला (आयआयटी- जेईई कोचिंगसाठी) अजमेर (राजस्थान)ला गेलो. तिथं हेमंत छाब्रा सरांमुळे फिजिक्सची गोडी लागली. पुढे बारावीनंतर शेगावला संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात विविध प्रोजेक्ट्स करताना संशोधनाची आवड निर्माण झाली. गेटची परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटी मद्रासला प्रवेश मिळवला. सध्या माझं (कल्ल३ी१ल्लं’ उङ्मेु४२३्रङ्मल्ल एल्लॅ्रल्ली२) या क्षेत्रात संशोधन सुरू आहे.एक अभयारण्यात राहणारा मुलगा व्हाया जम्मू, राजस्थात ते चेन्नई असा प्रवास करतो. तेव्हा हा प्रवासच त्याला पुस्तकी शिक्षणासोबत बरंच काही शिकवतो. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी वाट्याला आल्याच; पण त्यात चांगल्या कोणत्या आणि वाईट कोणत्या हे ठरवण्याची नजर या स्थित्यंतरानं दिली. चांगलं भवितव्य घडवण्यासाठी चांगल्या गोष्टींची आणि व्यक्तींची साथ हवी हेच बाहेर राहून शिकायला मिळतं. आपण कोणत्या वेळी कशाची निवड करतो यावरच पुढल्या जीवनाची वाट तयार होत जाते. ती वाट दूर जाते; पण आपण त्याच उत्सुक नजरेनं चालत जायचं..( सध्या आयआटी मद्रास येथे शिकतो आहे.)