शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

टिकटॉक, पबजी आणि जॉबलेस : कोरोनाकाळातल्या तारुण्याचं असंही एक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:36 IST

आपण भले, आपला पबजी भला, टिकटॉक बरे, असं म्हणत काहीजण त्यातच हरवून गेलेत. काही मात्र आपल्या भविष्याचं काय, म्हणत नैराश्यात रुतलेत.

ठळक मुद्देकाय करायचं या प्रश्नांचं? कुठे सापडतील उत्तरं.

- राखी राजपूत

लॉकडाउनच्या निमित्ताने थोडे दिवस का होईना घरी निवांत राहण्याचा योग आला. मात्न हा घरात बसून राहण्याचा काळ तसा फारसा सुंदर, छान असा काही नव्हता.. जवळ होती नव्हती ती पुस्तक वाचून झाली होती. थोडेफार बाकीचे कलाकुसरीचे छंदपण जोपासून झाले होते. पण काही दिवसातच वातावरणातल्या बदलाने, घामट कुंद हवेने अधिकच मरगळ यायला लागली. त्यामुळे एरवी फारसं कॉलनीमध्ये कोणाशी संबंधच न येणारी मी विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या काही माङयासारख्या चोविशी-पंचवीशीतल्या आणि काही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणा:या तरुण-तरुणींच्या जवळून संपर्कात आले. त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली जवळून अनुभवली. त्यात एरवी फक्त ऐकूनच माहीत असणा:या टिक-टॉक, पबजीसारख्या अॅप्सच अॅडिक्शन या पिढीत केवढं खोलवर भिनलेलं आहे, हे पाहून हैराण झाले ! कुठल्याशा जागेत उतरून लोकांना फक्त मारत सुटायचं आणि आपल्याला मारायला कोणी आलं तर मदतीसाठी खरोखरीच समोरच्याची मदत मागत ओरडायच! केवढा थिल्लर खेळ आहे हा. मात्न हे सगळेच तरुण काही अशा थिल्लर अॅप्सच्या आहारी गेलेले नाहीत हे बघून थोडं बरही वाटलं. मग असा कोणत्याच अॅडिक्शनमध्ये नसणारा साधारण एकविशीतला तो. एवढय़ात फारच गप्प आणि गंभीर दिसायला लागला तेव्हा त्याला नेमकं  झालं तरी काय, हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यानेच माङयावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला! फार गंभीर आणि गहन प्रश्न होते त्याचे.  घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे आता डिग्री घेऊन लगेच नोकरीला लागायचं आणि घराचा भार उचलायचा, मग आपल्या पायावर उभं राहिलं की पुढचं शिक्षण घ्यायचं. अशी स्वप्न रंगवत असतानाच आता कोरोनामुळे आधीच आर्थिक मंदीचे सावट येऊन ठेपल्याने अनेकांच्या नोक:यांवर गदा आली.तो विचारत होता, आता  मला कोण नोकरी देणार? उमेदीच्या काळातच आता अशी गत झाली आहे तर माङया भविष्याचं काय होईल? खरं तर ही काय फक्त त्याचीच गोष्ट नाही त्याच्या सारख्या अनेकांना आज आपल्या भविष्याची चिंता सतावत असणार आहे.तसं पाहिलं तर तुम्हाला, मुळात भारतालाच बेरोजगारी हा विषय नवा नाही. पण लॉकडाउनमुळे आता अर्थव्यवस्थेचा अधिकच बोजवारा वाजला असताना ज्यांच्या बळावर भारत महासत्ताक होऊ पाहत होता त्या तरुणांचेच भविष्य आता अधांतरी झाले आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे तरुणांचा एक वर्ग असाही आहे जो या लॉकडाउनचा वेळ मोबाइलवर पबजी खेळण्यात आणि टिक-टॉकचे व्हिडीओ बनवण्यात वेळ घालवत आहे. या वर्गाला भविष्याची चिंता तर नाहीच; पण सध्याच्या परिस्थितीशी ही यांना घेणं देणं नाही. आपण भले, आपला पबजी भला असा जीवनमंत्न आत्मसात केल्यासारखे दिवस-रात्न मोबाइलमध्ये घुसून या खेळाला अशा अॅप्सलाच त्यांनी आपलं विश्व बनवलं आहे.

 अनेकजण टिक-टॉकवर वाढलेले आपले फॉलोअर्स बघून आनंदून जातात. त्यातून मिळणा:या तोकडय़ा पैशांवर काहीजण स्वत:ला सेटल  समजतात.भविष्यात आपल्याला आता निदान पोटापाण्यासाठी तरी काही काम मिळेल का, असे प्रश्न यांच्या गावीही नाहीत. पूर्वी आपला मुलगा वयात आल्यानंतर काही व्यसनांच्या आहारी तर जात नाही ना म्हणून पालक चिंतेत असायचे मात्न आताच्या पिढीला या अॅप्सचं एवढं भयंकर व्यसन जडलं आहे की त्यापुढे त्यांना आपले आई-वडील काहीच आठवत नाही. कोणत्यातरी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत ते वावरत असतात आणि  या सगळ्या परिस्थितीची जाणीव ज्यांना आहे ते जास्तच चिंतेत आहेत. भविष्याच्या चिंतेत आहेत.  आपण आयुष्यात हवं ते साध्य करू  शकलो नाही म्हणून उदास आहे.काय करायचं या प्रश्नांचं?कुठे सापडतील उत्तरं.

(राखी मुक्त पत्रकार आहे.)