शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

तुम्हाला गोड बोलता येत नाही? - मग करिअर खल्लास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:16 PM

आपलं काम हसतमुख चेहर्‍यानं, प्रेमानं करणं हे स्किल आहे, दुसर्‍याच्या भावना समजणं हे तर उत्तम कौशल्यच. ते नसेल तर नुस्त्या हुशारीला काय अर्थ?

ठळक मुद्देआयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!

डॉ. भुषण केळकर 

प्रॉजेक्ट ऑक्सिजन आणि नंतर प्रॉजेक्ट अ‍ॅरिस्टॉटलमध्ये आपण बघितलं की मानवी भावभावना समजणं आणि समवेदना (एम्पथी) असणं ही अत्यंत महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स आहेत. कालच त्याची तोंडओळख झाली इकडे लंडनला आल्यावर!अमेरिका दौरा आटपून भारतात परतण्यापूर्वी काल लंडनला काही कामानिमित्त उतरलो आणि तेथील सुप्रसिद्ध टय़ूब म्हणजे अण्डरग्राउण्ड रेल्वेमधून 2 जड बॅग्ज घेऊन जायच्या होत्या. एका माणसाला अवघड होतं; पण माझ्याबरोबरच्या असणार्‍या एका मित्राला तिकीट नसताना प्लॅटफॉर्मर्पयत तिथल्या सुरक्षारक्षकाने येऊ दिलं आणि त्याला थँक्स म्हटल्यावर त्याचं उत्तर होतं की ‘त्यात काय विशेष, माझं कामच तुमचा प्रवास सुकर करण्याचं आहे’!गोष्ट छोटी आहे, पण मला वाटून गेलं की आपल्या देशाच्या इतिहासातला दुर्दैवी परकीय सत्तेचा कालखंड असला तरीही, ‘गोरा साहेब’ भारतावरच नाही तर जगावर राज्य करून गेला कारण बहुदा युद्ध साहित्याच्या हार्ड स्किल्सबरोबर, जाऊ तिथल्या जनतेची नस ओळखून त्याची बलस्थान अन् कमतरता ओळखून बरोबर सॉफ्ट स्किल्स वापरू शकला! आपल्याला असल्या कुठल्याही कृष्णकृत्यासाठी नको असली तरीही सॉफ्ट स्किल्स मात्र हवी आहेत, बरं का! असो!पुढे लेस्टर या गावी गेलो होतो. माझी एक मैत्रीण तिथे डॉक्टर आहे. तिनं सांगितलं की, 10-15 वर्षापूर्वी तेथील हॉस्पिटल्समध्ये दरवर्षी एकूण 20 मॉडय़ूल शिकवली जायची. त्यात 17 मॉडय़ूल ही वैद्यकीय ज्ञानाची आणि 3 ही सॉफ्ट स्किल्सची असायची. आता मात्र 15 सॉफ्ट स्किल्स आणि 5 ही वैद्यकीय ज्ञानाची आहेत!! त्यापुढे जाऊन तिनं जे सांगितलं त्यानं मी थक्क झालो.ती म्हणाली की नवीन डॉक्टर्स घेतले जाताना तेथील एनएचएस (नॅशनल हेल्थ सव्र्हिस) म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय सेवा या देशपातळीवरील व्यवस्थेत, तुमचे वैद्यकीय ज्ञान उत्तमच लागतं; परंतु जर नवीन डॉक्टरकडे इम्पॅथी नसेल वा कमी असेल तर त्यांना 1 वर्ष प्रोबेशनवर ठेवलं जातं.हे अमेरिका, इंग्लंडमध्ये घडतंय असं समजू नका! काही महिन्यांपूर्वी मी वाचलं होतं की ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल इंडिया’ थेट एमडी मधुसूदन गोपालन यांनी सांगितलं होतं की, विशेषतर्‍ कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत ज्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यांना एम्पथी व इक्यू (भावनांक) कमी असेल तर त्यांचे मत ग्राह्य धरले जात नाही!या एम्पॅथी (समवेदना) व भावनांक या दोन गोष्टींबरोबरच, इंडियन हॉटेल्स, कंपनीमध्ये विनम्रता, मानवी मूल्यांची जाणीव असणे ही दोन सॉफ्ट स्किल्स पण महत्त्वाची आहेत, असं नमूद करण्यात आलंय.पूर्वी जे जीवघेणी स्पर्धा, एकमेकांच्यावर कुरघोडी करून सत्तासोपान चढण्याची अहमहमिका व इतरांना कमी लेखून जिंकण्याची ईर्षा हे अत्यंत आवश्यक समजलं जायचं; तिथंच आता सहकार्य याला अधिक महत्त्व येतय!ज्या गोष्टीला पूर्वी रुक्ष कॉर्पोरेट जगतात स्थान नगण्य होतं त्या म्हणजेच विनोदबुद्धी असण्याचंही महत्त्व वाढतं आहे!!2018-19 या वर्षात काही ज्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये 110 लीडर्स निवडून गेले त्यात 70 टक्केमध्ये विनोदबुद्धी असणे, विनम्रता असणे आणि भावनांक चांगला असणे हे अत्यावश्यक होते, असा एक अहवाल सांगतो!या सगळ्यावरून हे नक्की सांगता येतं की आयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!