शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मूठभर बदामाची मऊ किमया

By admin | Updated: March 16, 2017 22:38 IST

हल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं? या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच.

- डॉ. निर्मला शेट्टी

कोरडी रखरखीत त्वचाआणि राठ केसांवरचा उपायकोणत्या दुकानात नाही तरमूठभर बदामात नक्की सापडेल!हल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं? या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते?खरंतर या प्रश्नाचं उत्तर म्हणून आणखी एक प्रश्न. पूर्वी ही कॉस्मेटिक्सची दुकानं नव्हती तेव्हा आपल्या आई आजीचं काय नुकसान होत होतं? आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी त्या कशा घेत होत्या? त्या तर स्वयंपाकघरात जे उपलब्ध असेल ते चेहेऱ्याला आणि केसांना लावून मोकळ्या व्हायच्या. रोजच्या वापरातल्या भाज्या आणि फळांची ताकद जी आपल्या आई आजीला माहित होती ती आपल्याला का नाही? आयत्या कॉस्मेटिक्सच्या पर्यांयामुळे या नैसर्गिक उपायांच्या ताकदीकडे आपलं दुर्लक्ष होतय हेच खरं.  भाज्यांमध्ये-फळांमध्ये एक नैसर्गिक ताकद असते. शरीरस्वास्थ्यं राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात भाज्या आणि फळं महत्त्वाची असतात. तशीच सुंदर दिसण्यासाठीही यांचा उपयोग होवू शकतो. ज्याकाळी आजच्यासारख्या शेकडो कॉस्मेटिक क्रीम्स नव्हत्या त्याकाळी बायका आपल्या स्वयंपाकघरातलीच साधनं वापरुन सौंदर्याची निगा राखत. लिंबू, टमाटा, बटाटा ही तर अगदी हक्काची साधनं. ते वापरुन त्वचा आणि केस सुंदर ठेवण्याचे अनेक प्रयोग केले जात. आपणही हे प्रयोग सहज करू शकतो.आता बदामाचंच उदाहरण घेवू. आपल्या घरात बदाम हे नेहेमी असू द्यावेत. मान्य आहे की बदाम महाग असतात. पण तरीही त्याच्या वापराचे फायदेही खूप आहेत. त्यादृष्टीनं बदाम वापरायला लागलं की न परवडणारे बदाम इतर उपायांपेक्षा खूप किफायतशीर वाटू लागतात.  त्वचा निस्तेज दिसू लागली, तरूण वयातही चेहेऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागली, त्वचा कमालीची कोरडी झाली की समजावं आपल्याला बदाम वापरण्याची तातडीनं गरज आहे. रोज सकाळी दोन किंवा तीन भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं, खनिजं, कॅल्शियम आणि प्रथिनं मिळतात. बदामाचेही प्रकार असतात. कडसर बदाम हे खाण्यासाठी वापरू नयेत. या बदामात प्रूसिक नावाचं अ‍ॅसिड असतं. ज्याचा उपयोग तेल आणि अत्तरं बनवतांना केला जातो. बदाम खावून जसं शरीराचं पोषण होतं तसंच ते केसांना आणि त्वचेला लावलं तर त्यांचंही पोषण उत्तम होतं.राठ केसांसाठी बदामाचं दूधकेस राठ झाले असतील, केसांची चमक गेल्यासारखं वाटत असेल तर केसांच्या मुळांना पोषक तत्त्वंच मिळत नाहीत हे समजून घ्यावं. ही पोषकता बदामाच्या दुधात असते. हे बदामाचं दूध करणंही एकदम सोपं. त्यासाठी अर्धा कप बदाम आदल्या रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी भिजलेले बदाम सोलावेत. सोललेले बदाम कपभर पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. गाळणीनं बदामाचं दूध गाळून घ्यावं. दुधात बदामाचा रवाळपणा अजिबात राहता कामा नये. या मिश्रणात आता दोन चमचे बदामाचं तेल घालावं. हे लोशन थोडं थोडं हातावर घेवून त्यानं केसांच्या मुळांची हलक्या हातानं मालिश करावी. केसांच्या मुळापासून केसांच्या टोकापर्यंत हे लोशन लावलं गेलं पाहिजे. लोशन लावल्यानंतर अर्धा तास सुकू द्यावं. नंतर सौम्य हर्बल शाम्पूनं केस धुवावेत. कंडीशनरसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करावा. निस्तेज त्वचेसाठी बदामाची पेस्टचेहरा निस्तेज होवून त्यावरच्या सुरकुत्या वाढत असतील तर बदामाची पेस्ट लावणं उत्तम. ही पेस्ट करताना बदाम पाण्यात भिजवण्यापेक्षा उकळून घ्यावेत. बदामाची सालं काढून घ्यावीत. असे अर्धा कप सोललेले बदाम दूध घालून वाटून घ्यावेत. बदामाची ही मऊसर पेस्ट चेहरा आणि मानेला लावावी. चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास या पेस्टने चेहऱ्याला मसाज करावा. यामुळे त्वचेखालच्या तैलग्रंथी जागृत होतात आणित्वचेचा कोरडेपणा कमी होतो. हात आणि पायाची त्वचा कोरडी असणाऱ्यांनी बदामाची पेस्ट लावल्यास त्याचा फायदा होतो.