शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

ऊसाचा रस फ्रिजमध्ये गारेगार करावा का?

By admin | Updated: April 4, 2017 17:28 IST

उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो श्रमहारी आहे.

- वैद्य राजश्री कुलकर्णीएन्जॉय धिस समर, बट..उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो श्रमहारी आहे. तो बल्य म्हणजे त्वरित ताकद देणारा आहे. त्यामुळेच ऊसाचा रस प्यायला की लगेच उत्साह वाटतो, तरतरी येते. रसात प्रत्यक्ष साखरच असल्यामुळे ती रक्तात लगेच जीभेवरूनच शोषली जायला लागते आणि पट्कन उत्साह, ताकद आल्यासारखे वाटते.खरं तर ऊसाचा रस काढून पिण्यापेक्षा ऊसाचे करवे करून ते चोखून जर रस घेतला तर तो अधिक गुणकारी असतो.यंत्रातून काढलेल्या रसात उसाचे मूळ, मधले खोड आणि वरचा टोकाचा भाग सगळेच पिळले जातात. त्यामुळे तो पचायला जड होतो. त्यातही लाकडी यंत्रातून काढलेला रस जास्त गुणकारी असतो, पण धातूच्या यंत्रात काढलेल्या रसात, धातुशी संपर्क आल्याने तो लवकर काळा पडतो, लवकर खराब होतो आणि कधीकधी जळजळ निर्माण करतो.उसाचा रस शिळा करून कधीही पिऊ नये. हल्ली कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाण्या पिण्याची नवी पद्धत रूढ होत आहे, पण शिळा रस दोष उत्पन्न करतो त्यामुळे नेहमी ताजाच रस प्यावा.आवडतो म्हणून एकावेळी खूप पोटभर रस पिणेही योग्य नाही. कारण तो पचायला जड होतो आणि मग कधीकधी जुलाब होऊ शकतात. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ही दक्षता नक्की घ्यावी.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रस थंड गुणाचा असतो, पण त्यात बर्फ टाकला जाणारा बर्फ मात्र केवळ स्पर्शाला थंड असतो. गुणाने मात्र तो उष्ण असतो. त्यामुळेच पुष्कळ जणांना रस दुपारच्या वेळी प्यायल्यास उलट लघवीला किंवा छातीत जळजळ होते. त्यामुळे रसाचे खरे गुण हवे असतील तर साधाच रस प्यावा किंवा निदान कमीतकमी बर्खटाकावा .ऊसाचा रस म्हणजे एक प्रकारे कच्ची साखरच असते, त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर ऊसाचा रस लगेच पिऊ नये. कारण पोट एकदम जड होते.रसाचे नियम पाळून रस प्यायल्यास त्यासारखे उत्तम, तृष्णाहर नैसिर्गक पेय नाही हे मात्र खरं!सो एन्जॉय धिस समर विथ इट!! पियो ग्लासफुल !!rajashree.abhay@gmail.com