शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मेळघाटातील मित्रांसाठी ‘धडक’ मोहीम

By admin | Updated: August 14, 2014 15:29 IST

मेळघाटाचं सगळंच विचित्र. उन्हाळ्यात इतकं ऊन पडेल की, चामडी सोलून निघेल. हिवाळ्यात इतकी थंडी पडेल की हाडं गोठावीत. आणि पावसाळ्यात इतका पाऊस की अनेक गावांची चक्क बेटं व्हावीत.

मेळघाटाचं सगळंच विचित्र. उन्हाळ्यात इतकं ऊन पडेल की, चामडी सोलून निघेल. हिवाळ्यात इतकी थंडी पडेल की हाडं गोठावीत. आणि पावसाळ्यात इतका पाऊस की अनेक गावांची चक्क बेटं व्हावीत. 
त्यात बहुतांश ठिकाणी रस्ता नाही, बस नाही, वीज नाही. आरोग्याच्या पुरेशा सोयी नाहीत. कित्येकदा रुग्णाला झोळी करून खांद्यावरून घेऊन जावं लागतं. प्रामुख्यानं कोरकू आदिवासी इथे राहतात.
कुपोषण आणि बालमृत्यूमुळेही हा परिसर ‘कुप्रसिद्ध’ आहे. कुपोषणामुळे दरवर्षी शेकडो बालकांचा इथे मृत्यू होतो. अनेक कारणं. नैसर्गिक परिस्थिती, अज्ञान, अंधश्रद्धा, अनारोग्य, बेरोजगारी. ही मुलं वाचावीत, कुपोषण थांबावं यासाठी काय करता येईल? वेगवेगळ्या क्षेत्रांतील काही तरुणांनी काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती पाहिली आणि त्यांनी ठरवलं, इथले प्रश्न इथे राहूनच सुटू शकतात, कमी होऊ शकतात. त्यातूनच १९९७ मध्ये ‘मैत्री’ची (‘मेळघाट मित्र’) स्थापना झाली आणि तेव्हापासून ‘मैत्री’च्या वतीनं मेळघाटात दरवर्षी ‘धडक मोहीम’ही राबवली जाते. महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून तरुण येथे येतात, दहा दिवस राहतात, त्यांच्यात राहून, त्यांच्यासाठी काम करतात आणि परत जातात. गेल्या १८ वर्षांपासून सलग हा उपक्रम सुरू आहे.
‘मैत्री’चे काही सदस्य तर वर्षभर मेळघाटातच राहून त्यांच्यासाठी काम करतात. मात्र इतर स्वयंसेवकांसाठी दरवर्षी पावसाळ्यात धडक मोहिमेचं आयोजन केलं जातं. 
यंदाही १८ जुलैपासून धडक मोहिमेला सुरुवात झाली असून, २९ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. त्यासाठी तीस-तीस मुलांच्या एकूण दहा मोहिमा आखण्यात आल्या असून, स्वयंप्रेरणेनं आणि स्वखर्चानं महाराष्ट्रभरातून तरुण प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करतील.
सामाजिक तळमळ आणि इच्छा असणार्‍या ज्या संवेदनशील तरुणांना प्रत्यक्ष तिथे जाऊन दहा दिवस काम करायचं असेल, त्यांना त्यात सहभाग घेता येईल. मात्र या मोहिमेचं एक मुख्य सूत्र म्हणजे ही ‘पिकनिक’ नाही, स्वत:ला जोखण्याचा, काही वेगळं करून पाहण्याचा, आयुष्यभरासाठी एक वेगळा अनुभव घेऊन पाहण्याचा तो ‘पाठ’ आहे.
कोणाला सहभागी होता येईल?
१८ वर्षांवरील कोणाही तरुण, तरुणीला. स्वयंप्रेरणेनं हा सहभाग असल्यानं तिथला प्रवास खर्च, राहणं, जेवण यासाठीचा साधारण हजार रुपयांपर्यंतचा खर्च स्वयंसेवकालाच करावा लागेल.
मेळघाटात काय करायचं? 
सहा वर्षांवरील मुलांच्या आजारांवर लक्ष ठेवणं.
एक वर्षाखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणं.
गरोदर स्त्रियांना दररोज भेटणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं.
गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबवणं. 
साध्या आजारांवर उपचार करणं.
प्रथमोपचार पद्धती राबवणं. 
शासकीय आरोग्य विभाग आणि आदिवासी यांच्यात दुवा साधणं. 
डूज अँण्ड डोण्ट्स
धडक मोहिमेला निघण्यापूर्वी आपल्या घरच्यांना संपूर्ण माहिती द्या.
गटप्रमुखांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागेल. 
व्यसनांपासून दूर राहावं लागेल. इत्यादि.यापुढच्या मोहिमा- २२ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ५ सप्टेंबर, १२ सप्टेंबर, १९ सप्टेंबर १४
‘दूरस्थ’ स्वयंसेवक
ज्यांना धडक मोहिमेत सहभागी होणं शक्य नाही, पण या उपक्रमाविषयी आस्था आहे, ते किराणा, औषधं, प्रथमोपचार साहित्य किंवा आर्थिक मदतही देऊ शकतात. 
अधिक माहितीसाठी संपर्क : 
मधुकर माने  : ७५८८२४४२३१
वेबसाइट :www.dhadakmohim. wordpress.com