शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मेडिकल आणि पुढे.....प्रवासाच्या काही आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 07:10 IST

धरणगावात वडील शिक्षक. त्यांनीच दहावीत खूप सुंदर कविता शिकवली होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.. ती आठवतच मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्थिरावलो. इंग्रजी येत नव्हती, भाषेचा, राहणीमानाचा प्रश्न.पण टिकलो... त्या प्रवासाच्या काही आठवणी...

डॉ. निपुण संजीवकुमार सोनवणे

माझं गाव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव. धड खेडंही नाही, शहरही नाही. बारावीपर्यंत शिक्षण गावातच घेतलं. वडील याच गावात माध्यमिक शिक्षक. डॉक्टर व्हायच्या इच्छेने सीईटी दिली. आणि पहिल्या प्रयत्नात बीडीएसला नंबर लागला. पहिल्या राउंडला परभणीला गेलो. तेथे कॉलेज गावाबाहेर पंधरा-वीस किलोमीटर होतं. काहीच सोय नव्हती. मुंबईत जायचं स्वप्न होतं, ते साकार झालं. नवी मुंबईचं एमजीएम डेण्टल कॉलेज मिळालं. आनंद वाटला; पण गावातून महानगरात जायचं तर थोडी धास्तीपण वाटली. घर सोडताना अक्षरश: गलबलून आलं. आईची सारखी रट, यानं कधी घर सोडलं नाही, हा राहील कसा, इतक्या लांब पोराला कशाला पाठवायचं? पण वडिलांनी समजूत काढली, मेडिकलला नंबर लागलाय. करिअर करायचंय त्याला. घर सोडावंच लागेल. ज्यानं घर-गाव सोडला तोच जीवनात यशस्वी होतो. हे वडिलांनी पटवून दिलेलं होतं.गावचं गावपण आम्ही जगलो होतो. आता अचानक गाव सोडावं लागणार याची हुरहुर वाटत होती. मी मुंबईला कधी गेलो नव्हतो. मनाचा हिय्या केला. निघालो. मला जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा अजून आठवतो. मित्रांच्या डोळ्यांत पाणी होतं.पहिल्या दिवशी वडिलांनी कॉलेजच्या होस्टेलला सोडलं. ते स्वत:चे अश्रू लपवत निघून गेले. मी त्या अनोळखी वातावरणात अक्षरश: बुजून गेलो होतो.कॉलेजला शंभर विद्यार्थ्यांत नव्वद तर मुंबईचेच होते. ते अप-डाउन करणारे होते. विशेष म्हणजे बहुसंख्य मुलं इंग्रजी मीडिअममध्ये शिकलेले होते. घरचे श्रीमंत. बºयाच जणांचे आई-वडील डॉक्टर होते. उरलेले आम्ही दहा जण मराठवाडा आणि खान्देशमधून आलो होतो. आम्ही गावाकडे मराठी मीडिअममधून शिकलेलो होतो. त्यामुळे आमची इंग्रजी तशी प्राथमिक स्वरुपाची होती. काही दिवस हाच प्रॉब्लेम आला. त्यामुळे अधिकच बुजरेपणा वाटायचा.महानगरातली ही मंडळी आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायची. त्यांची शहरी राहणी, कपडे, बोलणं आणि आमची गावाकडची राहणी खूप फरक वाटायचा. ओशाळे व्हायचो.पण माझ्याच वडिलांनी दहावीत शिकवलेली माधव ज्युलियन यांची ‘भ्रांत तुम्हा का पडे’ ही कविता आठवायची. ते ठासून शिकवायचे, ‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला. थांबला तो संपला...’गावातून निघताना मनात ध्येय बाळगलं होतं. ते साध्य करायची ईर्षा होती. पण पहिल्याच दिवशी रॅगिंगचा अनुभव आला. सिनिअर्सनी नाचायला लावलं. नाचलो. गाणं म्हणायला लावलं ते पण म्हटलं. दुसºया दिवशी रॅगिंगच्या धाकानं होस्टेलच्या रूममध्ये लपून बसलो; पण ठरवलं, आलेल्या प्रसंगांना तोंड दिलंच पाहिजे. गावात अकरावी- बारावीला झुरळ आणि गांडुळावर डिसेक्शन करावं लागायचं. इथं पहिल्याच दिवशी अ‍ॅनाटॉमी लॅबमध्ये माणसाच्या बॉडीवर तो प्रयोग करावा लागला. गाव आणि शहर याच्यातील हा फरक होता.गावात मी व्हॉलीबॉल आणि क्रि केटमध्ये चांगला खेळाडू होतो. शाळेत मी स्टेटपर्यंत मजल मारली होती. शाळेत गॅदरिंगला नाटकं केली होती. त्याचा मला येथे फायदा झाला. या खेळांमुळे आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये माझी छाप पडल्यानं माझा मित्रपरिवार वाढला. मी इंग्रजी भाषाही आत्मसात केली. या वातावरणात रुळताना आधी त्रास झाला. मग हळूहळू अंगवळणी पडलं.जे आधी वेगळ्या नजरेनं पाहायचे ते मस्त गप्पा करू लागले. मी प्रत्येक वर्षी यश मिळवत राहिलो. मेडिकलची हीच खासियत आहे, की तुम्ही लगेच एकमेकांच्या सहवासात, एकत्र काम करताना दोस्त होता. प्रत्येक वेळेस तुम्हाला एकमेकांची कुठे ना कुठे गरज लागतेच. मुंबई महानगरी आहेच इतकी भारी की ती सर्वांना आपल्यात सामावून घेतेच. या महानगराने माझ्यात आत्मविश्वास पेरला. जिद्दीने जीवनाचा प्रवास करायला शिकवलं. गावापेक्षा किती तरी जास्त व्यावहारिक ज्ञान दिलं. नवी आशा, नवी उमेद दिली.त्याच बळावर मी डॉक्टर बनू शकलो.या महानगरीने मला पाच वर्षे तर सामावून घेतलंच, आताही हे शहर मला आपलंसं वाटतं. कधी तरी गावाकडे चार-पाच दिवसासाठी जातो. गावचं गावपण हरवत चाललंय असंही वाटतं. पण तेवढ्यापुरतंच. दोन दिवस राहून मी मुंबईला परत येतो.

(बीडीएस, एमजीएम डेण्टल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेज, नवी मुंबई )