शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मुंबई मेडिकल आणि पुढे.....प्रवासाच्या काही आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 07:10 IST

धरणगावात वडील शिक्षक. त्यांनीच दहावीत खूप सुंदर कविता शिकवली होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.. ती आठवतच मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्थिरावलो. इंग्रजी येत नव्हती, भाषेचा, राहणीमानाचा प्रश्न.पण टिकलो... त्या प्रवासाच्या काही आठवणी...

डॉ. निपुण संजीवकुमार सोनवणे

माझं गाव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव. धड खेडंही नाही, शहरही नाही. बारावीपर्यंत शिक्षण गावातच घेतलं. वडील याच गावात माध्यमिक शिक्षक. डॉक्टर व्हायच्या इच्छेने सीईटी दिली. आणि पहिल्या प्रयत्नात बीडीएसला नंबर लागला. पहिल्या राउंडला परभणीला गेलो. तेथे कॉलेज गावाबाहेर पंधरा-वीस किलोमीटर होतं. काहीच सोय नव्हती. मुंबईत जायचं स्वप्न होतं, ते साकार झालं. नवी मुंबईचं एमजीएम डेण्टल कॉलेज मिळालं. आनंद वाटला; पण गावातून महानगरात जायचं तर थोडी धास्तीपण वाटली. घर सोडताना अक्षरश: गलबलून आलं. आईची सारखी रट, यानं कधी घर सोडलं नाही, हा राहील कसा, इतक्या लांब पोराला कशाला पाठवायचं? पण वडिलांनी समजूत काढली, मेडिकलला नंबर लागलाय. करिअर करायचंय त्याला. घर सोडावंच लागेल. ज्यानं घर-गाव सोडला तोच जीवनात यशस्वी होतो. हे वडिलांनी पटवून दिलेलं होतं.गावचं गावपण आम्ही जगलो होतो. आता अचानक गाव सोडावं लागणार याची हुरहुर वाटत होती. मी मुंबईला कधी गेलो नव्हतो. मनाचा हिय्या केला. निघालो. मला जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा अजून आठवतो. मित्रांच्या डोळ्यांत पाणी होतं.पहिल्या दिवशी वडिलांनी कॉलेजच्या होस्टेलला सोडलं. ते स्वत:चे अश्रू लपवत निघून गेले. मी त्या अनोळखी वातावरणात अक्षरश: बुजून गेलो होतो.कॉलेजला शंभर विद्यार्थ्यांत नव्वद तर मुंबईचेच होते. ते अप-डाउन करणारे होते. विशेष म्हणजे बहुसंख्य मुलं इंग्रजी मीडिअममध्ये शिकलेले होते. घरचे श्रीमंत. बºयाच जणांचे आई-वडील डॉक्टर होते. उरलेले आम्ही दहा जण मराठवाडा आणि खान्देशमधून आलो होतो. आम्ही गावाकडे मराठी मीडिअममधून शिकलेलो होतो. त्यामुळे आमची इंग्रजी तशी प्राथमिक स्वरुपाची होती. काही दिवस हाच प्रॉब्लेम आला. त्यामुळे अधिकच बुजरेपणा वाटायचा.महानगरातली ही मंडळी आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायची. त्यांची शहरी राहणी, कपडे, बोलणं आणि आमची गावाकडची राहणी खूप फरक वाटायचा. ओशाळे व्हायचो.पण माझ्याच वडिलांनी दहावीत शिकवलेली माधव ज्युलियन यांची ‘भ्रांत तुम्हा का पडे’ ही कविता आठवायची. ते ठासून शिकवायचे, ‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला. थांबला तो संपला...’गावातून निघताना मनात ध्येय बाळगलं होतं. ते साध्य करायची ईर्षा होती. पण पहिल्याच दिवशी रॅगिंगचा अनुभव आला. सिनिअर्सनी नाचायला लावलं. नाचलो. गाणं म्हणायला लावलं ते पण म्हटलं. दुसºया दिवशी रॅगिंगच्या धाकानं होस्टेलच्या रूममध्ये लपून बसलो; पण ठरवलं, आलेल्या प्रसंगांना तोंड दिलंच पाहिजे. गावात अकरावी- बारावीला झुरळ आणि गांडुळावर डिसेक्शन करावं लागायचं. इथं पहिल्याच दिवशी अ‍ॅनाटॉमी लॅबमध्ये माणसाच्या बॉडीवर तो प्रयोग करावा लागला. गाव आणि शहर याच्यातील हा फरक होता.गावात मी व्हॉलीबॉल आणि क्रि केटमध्ये चांगला खेळाडू होतो. शाळेत मी स्टेटपर्यंत मजल मारली होती. शाळेत गॅदरिंगला नाटकं केली होती. त्याचा मला येथे फायदा झाला. या खेळांमुळे आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये माझी छाप पडल्यानं माझा मित्रपरिवार वाढला. मी इंग्रजी भाषाही आत्मसात केली. या वातावरणात रुळताना आधी त्रास झाला. मग हळूहळू अंगवळणी पडलं.जे आधी वेगळ्या नजरेनं पाहायचे ते मस्त गप्पा करू लागले. मी प्रत्येक वर्षी यश मिळवत राहिलो. मेडिकलची हीच खासियत आहे, की तुम्ही लगेच एकमेकांच्या सहवासात, एकत्र काम करताना दोस्त होता. प्रत्येक वेळेस तुम्हाला एकमेकांची कुठे ना कुठे गरज लागतेच. मुंबई महानगरी आहेच इतकी भारी की ती सर्वांना आपल्यात सामावून घेतेच. या महानगराने माझ्यात आत्मविश्वास पेरला. जिद्दीने जीवनाचा प्रवास करायला शिकवलं. गावापेक्षा किती तरी जास्त व्यावहारिक ज्ञान दिलं. नवी आशा, नवी उमेद दिली.त्याच बळावर मी डॉक्टर बनू शकलो.या महानगरीने मला पाच वर्षे तर सामावून घेतलंच, आताही हे शहर मला आपलंसं वाटतं. कधी तरी गावाकडे चार-पाच दिवसासाठी जातो. गावचं गावपण हरवत चाललंय असंही वाटतं. पण तेवढ्यापुरतंच. दोन दिवस राहून मी मुंबईला परत येतो.

(बीडीएस, एमजीएम डेण्टल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेज, नवी मुंबई )