शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

मुंबई मेडिकल आणि पुढे.....प्रवासाच्या काही आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 07:10 IST

धरणगावात वडील शिक्षक. त्यांनीच दहावीत खूप सुंदर कविता शिकवली होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.. ती आठवतच मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्थिरावलो. इंग्रजी येत नव्हती, भाषेचा, राहणीमानाचा प्रश्न.पण टिकलो... त्या प्रवासाच्या काही आठवणी...

डॉ. निपुण संजीवकुमार सोनवणे

माझं गाव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव. धड खेडंही नाही, शहरही नाही. बारावीपर्यंत शिक्षण गावातच घेतलं. वडील याच गावात माध्यमिक शिक्षक. डॉक्टर व्हायच्या इच्छेने सीईटी दिली. आणि पहिल्या प्रयत्नात बीडीएसला नंबर लागला. पहिल्या राउंडला परभणीला गेलो. तेथे कॉलेज गावाबाहेर पंधरा-वीस किलोमीटर होतं. काहीच सोय नव्हती. मुंबईत जायचं स्वप्न होतं, ते साकार झालं. नवी मुंबईचं एमजीएम डेण्टल कॉलेज मिळालं. आनंद वाटला; पण गावातून महानगरात जायचं तर थोडी धास्तीपण वाटली. घर सोडताना अक्षरश: गलबलून आलं. आईची सारखी रट, यानं कधी घर सोडलं नाही, हा राहील कसा, इतक्या लांब पोराला कशाला पाठवायचं? पण वडिलांनी समजूत काढली, मेडिकलला नंबर लागलाय. करिअर करायचंय त्याला. घर सोडावंच लागेल. ज्यानं घर-गाव सोडला तोच जीवनात यशस्वी होतो. हे वडिलांनी पटवून दिलेलं होतं.गावचं गावपण आम्ही जगलो होतो. आता अचानक गाव सोडावं लागणार याची हुरहुर वाटत होती. मी मुंबईला कधी गेलो नव्हतो. मनाचा हिय्या केला. निघालो. मला जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा अजून आठवतो. मित्रांच्या डोळ्यांत पाणी होतं.पहिल्या दिवशी वडिलांनी कॉलेजच्या होस्टेलला सोडलं. ते स्वत:चे अश्रू लपवत निघून गेले. मी त्या अनोळखी वातावरणात अक्षरश: बुजून गेलो होतो.कॉलेजला शंभर विद्यार्थ्यांत नव्वद तर मुंबईचेच होते. ते अप-डाउन करणारे होते. विशेष म्हणजे बहुसंख्य मुलं इंग्रजी मीडिअममध्ये शिकलेले होते. घरचे श्रीमंत. बºयाच जणांचे आई-वडील डॉक्टर होते. उरलेले आम्ही दहा जण मराठवाडा आणि खान्देशमधून आलो होतो. आम्ही गावाकडे मराठी मीडिअममधून शिकलेलो होतो. त्यामुळे आमची इंग्रजी तशी प्राथमिक स्वरुपाची होती. काही दिवस हाच प्रॉब्लेम आला. त्यामुळे अधिकच बुजरेपणा वाटायचा.महानगरातली ही मंडळी आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायची. त्यांची शहरी राहणी, कपडे, बोलणं आणि आमची गावाकडची राहणी खूप फरक वाटायचा. ओशाळे व्हायचो.पण माझ्याच वडिलांनी दहावीत शिकवलेली माधव ज्युलियन यांची ‘भ्रांत तुम्हा का पडे’ ही कविता आठवायची. ते ठासून शिकवायचे, ‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला. थांबला तो संपला...’गावातून निघताना मनात ध्येय बाळगलं होतं. ते साध्य करायची ईर्षा होती. पण पहिल्याच दिवशी रॅगिंगचा अनुभव आला. सिनिअर्सनी नाचायला लावलं. नाचलो. गाणं म्हणायला लावलं ते पण म्हटलं. दुसºया दिवशी रॅगिंगच्या धाकानं होस्टेलच्या रूममध्ये लपून बसलो; पण ठरवलं, आलेल्या प्रसंगांना तोंड दिलंच पाहिजे. गावात अकरावी- बारावीला झुरळ आणि गांडुळावर डिसेक्शन करावं लागायचं. इथं पहिल्याच दिवशी अ‍ॅनाटॉमी लॅबमध्ये माणसाच्या बॉडीवर तो प्रयोग करावा लागला. गाव आणि शहर याच्यातील हा फरक होता.गावात मी व्हॉलीबॉल आणि क्रि केटमध्ये चांगला खेळाडू होतो. शाळेत मी स्टेटपर्यंत मजल मारली होती. शाळेत गॅदरिंगला नाटकं केली होती. त्याचा मला येथे फायदा झाला. या खेळांमुळे आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये माझी छाप पडल्यानं माझा मित्रपरिवार वाढला. मी इंग्रजी भाषाही आत्मसात केली. या वातावरणात रुळताना आधी त्रास झाला. मग हळूहळू अंगवळणी पडलं.जे आधी वेगळ्या नजरेनं पाहायचे ते मस्त गप्पा करू लागले. मी प्रत्येक वर्षी यश मिळवत राहिलो. मेडिकलची हीच खासियत आहे, की तुम्ही लगेच एकमेकांच्या सहवासात, एकत्र काम करताना दोस्त होता. प्रत्येक वेळेस तुम्हाला एकमेकांची कुठे ना कुठे गरज लागतेच. मुंबई महानगरी आहेच इतकी भारी की ती सर्वांना आपल्यात सामावून घेतेच. या महानगराने माझ्यात आत्मविश्वास पेरला. जिद्दीने जीवनाचा प्रवास करायला शिकवलं. गावापेक्षा किती तरी जास्त व्यावहारिक ज्ञान दिलं. नवी आशा, नवी उमेद दिली.त्याच बळावर मी डॉक्टर बनू शकलो.या महानगरीने मला पाच वर्षे तर सामावून घेतलंच, आताही हे शहर मला आपलंसं वाटतं. कधी तरी गावाकडे चार-पाच दिवसासाठी जातो. गावचं गावपण हरवत चाललंय असंही वाटतं. पण तेवढ्यापुरतंच. दोन दिवस राहून मी मुंबईला परत येतो.

(बीडीएस, एमजीएम डेण्टल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेज, नवी मुंबई )