मोबाइलची चटक तरुणांना गुन्हे करायला भाग पाडतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 08:00 IST2019-04-04T08:00:00+5:302019-04-04T08:00:06+5:30

पुण्यात आनंदवन नावाचं मोबाइल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आहे. मोबाइलचं व्यसन आहे आणि ते इतर व्यसनांइतकंच घातक आहे, त्यानं आयुष्य भरकटायला लागलं याची जाणीव झालेले अनेक पालक आणि तरुण या केंद्रात येतात. त्या केंद्रानं राज्यभरातून सायबर पोलिसांकडून मागवलेली ही सायबर गुन्ह्यांची आकडेवारी.

mobile use & cyber crime, see the changing cyber crime record in Maharashtra. | मोबाइलची चटक तरुणांना गुन्हे करायला भाग पाडतेय?

मोबाइलची चटक तरुणांना गुन्हे करायला भाग पाडतेय?

ठळक मुद्देहे सगळे गुन्हे सरसकट मोबाइल वापरामुळेच झाले असं म्हणता येत नाही, मात्र तरीही मोबाइलचा वापर, व्यसनाधिनता आणि गुन्हे याचं दृष्टचक्र तरुणांना गाठतं आहे.

- हर्षल पंडित

मोबाइलचं अ‍ॅडिक्शन असलेल्यांचं प्रमाण चिंताजनक आहेच. रोज आमच्याकडे 14 ते 22 या वयोगटातील अनेक तरुण-तरुणी सल्ला-समुपदेशनासाठी येतात. नववी-दहावीत शिकणारी ही मुलं. आईवडील मोबाइल घेऊन देतात आणि त्यानंतर एकदम व्यसनाधिनतेच्या गर्तेत जावं तशी ही मुलं मोबाइलच्या व्यसनाधिनतेत ढकलली जातात. विशेषतर्‍ सध्या पबजी या खेळाचं व्यसन अनेक तरुणांमध्ये आढळतं. मोबाइल गेम्ससह इंटरनेटचा वापर, पोर्न पाहण्याचं व्यसन मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. ही मुलं तासंतास मोबाइलवर असतात. दिवसाला सुमारे 14 ते 15 तास मोबाइलवर असणं, गेम खेळणं हे सर्रास दिसतं. त्यामुळे त्यांच्यात वर्तन समस्या निर्माण होता. चिडचिड होते. झोप होत नाही. अभ्यासावरचं चित्त उडतं, परीक्षेत नापास होणं सुरू होतं.
त्याहून भयंकर म्हणजे अनेक तरुण आणि तरुणींनाही मोबाइल-इंटरनेटमुळे पोर्न पाहण्याचं व्यसन लागतं आणि ते पाहून त्याप्रमाणे शरीर संबंध ठेवण्याचा प्रय} अनेकजण करतात. त्यातून शरीरसंबंधांच्या विकृत कल्पनाही त्यांच्या मनात घर करतात. 
घरोघर मोबाइल भांडणाचंही कारण ठरताना दिसत आहे. 
अनेक मुलं मोबाइल वापरावरून पालकांशी भांडतात. हुज्जत घालतात. काहीजण तर पालकांवर हात उगारण्यार्पयत भान सोडतात. त्याशिवाय घर सोडण्याच्या धमक्या देणं, घरातून निघून जाणं, आत्महत्या करण्याची दमबाजी करणं हे सारं सुरू होतं.
हातातला मोबाइल हे एक भयंकर व्यसन ठरतं आहे, तरुणांसाठी घातक आहे हे दिसत होतंच. मात्र महाराष्ट्रात त्यातून घडणारे गुन्हे किती हे वास्तव शोधायचं म्हणून आम्ही राज्यभरात सायबर पोलिसांकडे माहिती मागितली आणि त्यातून जी आकडेवारी समोर आली, ते आजचं तरुण मुलांच्या मोबाइल वापराचं आणि व्यसनाचं वास्तव आहे.

***
 

मोबाइल, इंटरनेटचा वापर यामुळे किती आत्महत्या झाल्या? खून/अपघात किंवा गैरसमजुतीमुळे झालेले वाद याचं प्रमाण काय यासंदर्भातील माहिती पुण्यातील आनंदवान डीअ‍ॅडिक्शन सेंटरचे समुपदेशक हर्षल पंडित यांनी राज्यभरात माहिती अधिकारांतर्गत सायबर पोलिसांकडे मागितली होती. त्यानुसार हाती आलेली ही आकडेवारी. अर्थात ही माहिती सरसकट दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातील आहे. 


कोल्हापूर-100
अमरावती-175
औरंगाबाद (शहर) -630
भंडारा -142
चंद्रपूर -291
लातूर -128
नागपूर ( शहर ) -477
नाशिक (शहर)- 246
नाशिक ( ग्रामिण) -120
पालघर-136

रायगड -239
रत्नागिरी -203
सातारा-181
ठाणे ( शहर) -1,019
ठाणे ( ग्रामीण) 246
वर्धा -169
यवतमाळ- 325
बुलडाणा-120
पुणे (ग्रामीण) -139
जळगाव-154
मुंबई -793

***
 


पुण्याचा नंबर पहिला

एकटय़ा पुणे (शहर) परिसरात सायबर पोलिसांनी
13,357 गुन्हे दाखल केले.
त्यातून 12,683 गुन्हे निकाली निघाले असून,
बाकीच्यांचा तपास सुरू आहे.



आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, पुणे
anandvan09@gmail.com

Web Title: mobile use & cyber crime, see the changing cyber crime record in Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.