शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मोबाइल कॅमेरा आणि अ‍ॅक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 08:44 IST

मित्र गेले म्हणून त्यांच्यामागे मी ही इंजिनिअरिंगला गेलो. ते डोक्यावरून जाऊ लागलं. मग वाटलं अभिनय करू, दिग्दर्शन करू म्हणून मुंबई-पुण्यात गेलो. मात्र तिथं काही जमलं नाही.. पण, ठरवलं माघार नाही, लघुपटापासून सुरुवात केलीये जमेल हळूहळू पुढे जाणं..

- श्रीधर मनोहर गायकवाड, सोलापूर

मी बारावी नंतर मित्रांना फॉलो करत इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. प्रथम वर्षाला थोडंफार बर वाटलं; पण जसजसे दिवस जात होते, मला माझी चूक कळत होती. आपली आवड कशामध्ये आहे आपल्याला काय जमतं याचा आपण विचार न करता, मित्रांच्या मागे लागून, मित्रांचं ऐकून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. जे मित्र स्वत: दोन-तीन वेळा इंजिनिअरिंगच्या प्रत्येक वर्षाला नापास झाले ते म्हणायचे अरे, इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे, आर्ट्स, कॉमर्सच्या भानगडीत पडू नकोस.कॉलेजचे दिवस सुरू होते, हळूहळू इंजिनिअरिंगचा अभ्यासक्र म डोक्यावरून जाऊ लागला, विषय मागे राहू लागले. माझी पण दोन वर्षे वाया गेली. पण, यात चूक मित्रांची नाही, तर माझी होती. मला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच क्षेत्रात जर मी शिक्षण घेतलं असतं तर, कदाचित मी खूप पुढे गेलो असतो.

मी इंजिनिअरिंगला तीन वर्षे दिली; पण आपली गाडी काय पुढे जाईना, म्हणून कंटाळून मी माझा कॉलेजमधील प्रवेश रद्द केला. मला दिग्दर्शन व अभिनय क्षेत्रामध्ये खूप आवड. पण त्यासाठी करायचं काय, पर्याय काय आहेत याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. मी यातच करिअर करणार असं घरच्यांना ठणकावून सांगण्याची मुभाही नव्हती. कारण, सोलापूर सारख्या शहरात कलाक्षेत्राला पुरेसा वाव नाही. घरची परिस्थिती पण बेताची. मी पुणे गाठलं आणि नंतर मुंबई, खूप फिरलो. प्रत्येक फिल्मसिटी, स्टुडिओ आणि नाट्यमंदिरे. घरून आणलेले पैसे पुरणार नाहीत म्हणून दिवसभर चालत चालतच हिंडायचो; पण काही उपयोग झाला नाही. पुण्या- मुंबईसारख्या शहरांमध्ये राहायचं तर पैसा पाहिजे. शेवटी घरी आलो.

इकडे आल्यावर माझी आवड मला गप्प बसू देत नव्हती. असंच एकदा एका पेपरमध्ये वाचलं होतं की जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर ‘लघुपटा’पासून सुरु वात करा. अगदी, कमी खर्चात व स्व-लिखित कथांवर आधारित लघुपट तयार करता येतात. म्हणून, मी लघुपटांबाबत माहिती गोळा करायला सुरु वात केली. स्वत: कथा लिहिण्याची आवड निर्माण केली. हळूहळू दिग्दर्शन क्षेत्रातील माहिती होत गेली. कॅमेरा कोणता वापरायचा, पटकथा, संवाद कसे लिहायचे हे हळूहळू जमू लागले. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. घरच्यांचा विरोध, मित्रांची मस्करी, आर्थिक चणचण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.

मनाशी एक पक्की गाठ बांधली, की पुणे, मुंबईला जाऊन संधी शोधण्यापेक्षा आपल्या गावी सोलापुरातच राहून आपण आपली संधी निर्माण करायची. सुरु वातीला मी एकटा होतो, मोबाइल घेऊन शूट करायचो. मग हळूहळू माझ्यासारखी आवड असणारी चार मुलं आली. माझे मोठे बंधू देवा चिंचोळीकर यांच्या सहकार्याने मी ‘देव प्रोडक्शन सोलापूर’ या ग्रुपची निर्मिती केली. हळूहळू ग्रुप वाढत गेला आकाश जाधव, कालिदास पोतदार, संतोष माने, ध्रुव गायकवाड, संघपाल काकडे यांसारखी मित्र मला भेटली. माझ्या टीमच्या जोरावर मी स्वयंलिखित कथांवर ‘ब्रिफकेस’, ‘गुलाम’ आणि ‘गिफ्ट’ नावाच्या लघुपटांची आम्ही निर्मिती केली. स्वच्छ भारत मिशनवर आधारित असणाऱ्या माझ्या ‘गिफ्ट’ या लघुपटास जिल्हास्तरीय द्वितीय क्र मांक मिळाला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.आता, मी ठरवलंय, याच क्षेत्रात जगायचं. ही तर सुरुवात आहे. अजून दिल्ली खूप दूर आहे. दिग्दर्शक होणं सोपं नाही; पण आता माघारी फिरणं नाही..

अनाउन्समेण्ट

छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी ! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.

१. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा.. पत्ता- संयोजक,ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-3,एम.आय.डी.सी, अंबड, नाशिक-422010

२. ई-मेल-oxygen@lokmat.com