शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

स्थलांतराचं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:32 IST

स्थलांतरानं मला काय दिलं? ऊर्जा दिली, दृष्टिकोन दिला आणि एक अभ्यासून नजरही दिली.

- डॉ. मारोती तेगमपुरे

स्थलांतर मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतं. स्थलांतरामुळे स्थलात्मकच नव्हे तर सर्वांगीण पातळींवर बदल संभवतात. भाषा, संस्कृती, खानपान, या सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण स्वरूपाचे बदल घडून येतात हे सारं आपण वाचतो. पण मी हे सारं स्वत: जगलोय.माझे प्राथमिक शिक्षण गावापासून तीन किलोमीटर (उच्छा (बु), ता. मुखेड, जि. नांदेड ) अंतरावर असलेल्या बेटमोगरा जिल्हा परिषद शाळेत झालं. आठवीसाठी नांदेड येथील खालसा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गावापासून ८० किलोमीटर असलेले हे अंतर १९८९-९० साली फार मोठं वाटायचं. एकदा नांदेडला आलं की गावाकडे संपर्क होत नसे. त्यावेळी आत्ताच्यासारखी संपर्काची प्रभावी माध्यमं नव्हती, आमच्या गावात साधं पोस्ट आॅफिस नव्हतं. आजही नाही. अर्थात घरी पत्र तरी कुणाला वाचता येत होतं? मोठे बंधू शिकलेले; परंतु तेही रोजगाराच्या शोधात बाहेरच होते. अशा परिस्थितीत शहरातील मगणपुरा (नवीन मोंढा) परिसरात असलेल्या डेस्टिट्यूट चिल्ड्रन होममध्ये मी आणि माझा लहान भाऊ ओमनाथ राहू लागलो. तो त्यावेळी साधारणत: इयत्ता दुसरी-तिसरीत असेल. खऱ्या अर्थानं गावापासून माय बाबा यांच्यापासून दूर जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. याठिकाणी जे जेवण दिलं जाई, त्यास जेवण कसं म्हणावं; पण त्यावेळी त्याच अन्नानं जगवलं. याकाळात अनेक बरेवाईट अनुभव आले, जिवाभावाचे मित्र मिळाले, त्यातील नीलकंठ यमूनवाड यास कधीच विसरू शकत नाही. त्याकाळात कळलं माणसं महत्त्वाची, जातधर्म हे काही खरं नाही.महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी उस्मानाबाद गाठलं, मोठे बंधू संभाजी ग्रामसेवक म्हणून तिथं रुजू झाले होते. पुढील शिक्षणासाठी मला त्यांनी तिथं बोलावून घेतलं. हे दुसरं स्थलांतर.उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयात मी बी.ए.साठी या काळात महाविद्यालयात डॉ. काझीसर भेटले. त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करणाºया प्रेमळ मार्गदर्शनाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आरपार बदलून गेला. डॉ. कल्याण गडकर, डॉ. डी.बी. मोरे यांचं अर्थशास्त्रीय विवेचन आजही प्राध्यापक म्हणून वावरत असतानाही अनेकदा मदतीला धावून येतं. या गुरु जनांनी सुचवलं. एम.ए.साठी विद्यापीठातच जा. त्यांनी मला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाठवलं. स्वत: हिंदी विषयाचे प्राध्यापक असूनही मी एम.ए. अर्थशास्त्र करावं म्हणून डॉ. काझीसर विद्यापीठात नाव नोंदणी करण्यासाठी सोबत आले. विद्यापीठात डॉ. बी.बी. कवडे, डॉ. आर. एस. सोळुंके, डॉ. बी.एस. म्हस्के, डॉ. वंदना सोनालकर, डॉ. र. पु. कुरुलकर, यांच्यासारखे शिक्षक मला लाभले. नंतरच्या काळात तर डॉ. बी. एस. म्हस्केसरांकडे मला पीएच.डी. करण्याची संधी प्राप्त झाली, याकाळात मला जे शिकायला मिळाले ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे.याचकाळात एसएफआयसारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणाºया व भगतसिंगांना आदर्श मानून काम करणाºया विद्यार्थी संघटनेत/चळवळीत मी कधी ओढला गेलो ते समजलेच नाही. संघटनेत कार्यकर्ता म्हणून/ पदाधिकारी म्हणून वावरताना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं; पण याच काळात आपण जेथे चुकत आहोत तेथे स्पष्टपणे सांगणारे, आपल्याला दुरुस्त करणारे मित्रही भेटले. म्हणतात ना ज्ञान तीनच माध्यमातून प्राप्त होते, वाचन, चिंतन/अनुभव आणि प्रवास. पीएच.डी. करून मी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून रु जू झालो.आज वाटतं शिक्षणासाठी अनेकवेळा स्थलांतर करावं लागलं त्या स्थलांतरानं कठीण परिस्थितीत उभे राहण्याची ऊर्जा दिली. ती ऊर्जा घेऊनच मी वाटचाल करतो आहे.अर्थशास्त्र विभागप्रमुख,गोदावरी कला महाविद्यालय, अंबड, जि. जालना