शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

मु.पो.म्हसवड : आयुष्य सरळ पण नाय चालत ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 05:55 IST

गेल्या चार महिन्यांपासून मावशीबरोबर छावणीत राहणारी खमकी नगाबाई. बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. लिंगवरेचा हणमंत खांडेकर. नऊ जनावरांसह गेले चार महिने छावणीतच राहतोय. 16 वर्षाचा सुदर्शन ढेकळे आणि 17 वर्षाचा सचिन बोडरे बारावीची परीक्षा झाली तसे छावणीत कामाला लागले. दुष्काळ मोठा कडक पण त्याहून मोठी आहे, या पोरांची हिंमत भेटा त्यांना....

- प्रगती जाधव-पाटील

दुष्काळी भागातलं स्थळ आलं तर आधी त्याला प्राधान्य देईन, असं सांगणारी नगाबाई. मोठा भाऊ सैन्यात जाणार, मग घरी आईबापाकडं बघायला कोण नाय म्हणून मी गावातच राहीन, असं सांगणारा सुदर्शन. मळणी यंत्रात बोट सापडल्यामुळे सैन्यात जायला स्वतर्‍ अनफिट असला तरीही इतरांना प्रेरणा देणारा हणमंत.हे भारीच पोरं रखरखत्या उन्हात भेटले. दुष्काळ.. कोरड.. कडाक्याचं ऊन.. कठीण परिस्थिती हे असले शब्द आम्हाला हरवू शकत नाहीत. निसर्गानं या मातीत जन्माला घातलंय आणि तितक्याच कणखरपणानं आम्हाला जगण्याचं बळपण दिलंय. आम्ही जे आहोत, जसे आहोत त्यात खुश आहोत.. लोकांची किव करणारी नजर आणि उपकार करण्याची भाषा आम्हाला बोचते. निसर्गाच्या कोपातून बाहेर पडण्यासाठी आम्ही परस्परांची मदत घेतोय. तेच आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. तुमच्यासाठी ही उन्हात रखरखणारी छावणी असेल; पण आम्ही या पसरलेल्या छावणीत जिवाची मुंबई करतोय. नो टेन्शनवाली..!असं हे पोरं बोलतात आणि आपण काय ऐकतोय यावर कानांचा विश्वासच बसत नाही.सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात 19 चारा छावण्या अस्तित्वात आहेत. यात साधारण तीस हजार जनावरे आणि 7 हजार नागरिक विविध ठिकाणांहून येऊन राहत आहेत. यात सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचाही यात समावेश आहे. जानेवारी महिन्यात सातार्‍यातील पहिली चारा छावणी 120 एकर क्षेत्रात म्हसवड येथे सुरू करण्यात आली. बस स्टॅण्ड परिसरात या विषयीची माहितीही देण्यात आली होती. ठिकठिकाणी मिळालेल्या माहितीचा प्रचार आणि प्रसार होऊन या छावणीत जनावरं आणि अनोळखी माणसं एकत्र येऊ लागली. आणि नात्यागोत्याची असल्यासारखी एकमेकांसह राहू लागली.गेल्या चार महिन्यांपासून आपल्या मावशीबरोबर छावणीत आलेल्या नगाबाई भिवाजी जिमल ही गावची पोरगी वयापेक्षा अधिक परिपक्व वाटली. लग्नानंतर नांदायला जायचं म्हटलं तर सुकाळ का दुष्काळ कोणता भाग निवडणार यावर म्हणते, ‘आमीच आमच्या भागाला नावं ठेवली तर आमच्या भावंडांची लग्न कशी व्हायची. दुष्काळी भागात नको म्हणून आमच्या घरात सुना कशा यायच्या? इतल्या पोरांना पोरी कोण देणार? आम्हीच आमचा भाग नाकारून नाय चालणार. आहो मोकळ्या वातावरणात रहायचं जे सुख आम्ही इथं घेतो ते मोठय़ा शहरात पर्यटनाच्या नावाखाली विकत घ्यावं लागतं. हा दोन-चार महिने जातात त्रासाचे; पण आयुष्य समदं सरळ पण नाय चालत ना?’नगाबाई छावणीत आल्यापासून इथं असणार्‍यांची गाडी शिकली, आता घरातून काही आणायचं असेल तर ती गाडीवर स्वतर्‍ जाऊन आणते.***बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. त्याला खूप शिकायचं आहे. उन्हाळ्याच्या सुटीत त्याला कौशल्य व्यवसाय शिकायचं होतं; पण त्याची छावणीत डय़ूटी लागली आणि तो इथंच राहू लागला. आपल्या वयाच्या सवंगडय़ांबरोबर धम्माल मस्ती करणं, छावणीलगत असलेल्या मैदानावर व्यायाम करणं हे त्याचं काम. म्हणाला, हे पण कौशल्य शिक्षणच चाललंय की माझं!  काही त्रागा नाही की चिडचिड नाही. ***

 आटपाडी तालुक्यातील लिंगवरेचा हणमंत तानाजी खांडेकर हा 23 वर्षाचा युवक घरच्या नऊ जनावरांसह गेले चार महिने या छावणीत तळ ठोकून आहे. लष्करात जाण्याची तीव्र इच्छा होती. शारीरिक क्षमतावाढीचा सरावही त्याने मन लावून केला. गोळाफेक तर तो लीलया करतो. काम करत असताना मळणी यंत्रात हाताचं एक बोट सापडलं आणि मिल्ट्रीत जाण्याच्या स्वप्नावर ‘मेडिकली अनफिट’चा ठपका लागला. दुष्काळी भागात नोकरी, रोजगार नाही म्हणून सैन्यात जायचं, असं नाही. सैन्यात भरती होण्याकडे पोटापाण्याचा प्रश्न म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून पाहिले जाते. हणमंतच्या मामासह सात नातेवाईक सैन्यात आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हणमंतही ध्येयाच्या मागे धावत होता. आता तो घरची शेती सांभाळतो. दहापैकी पाच एकर शेतीत अन्नधान्य पिकते. पाण्याच्या परिस्थितीमुळे नऊ जनावरं घेऊन तो या छावणीत आहे.*** अवघ्या 16 वर्षाचा सुदर्शन रावसाहेब ढेकळे हा भेटला. म्हसवडच्या पंचक्रोशीतूनच सुदर्शन आलेला. त्याच्या गावातील बहुतांश लोक मुंबईत रंगाच्या व्यवसायात काम करतात. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. पेपर संपल्या-संपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो छावणीत दाखल झाला. त्याचा थोरला भाऊ सैन्यात भरतीसाठी प्रय} करतोय. सुदर्शनला ‘तू ही भरती होणार का?’ असं विचारलं तर तो चक्क नाही म्हणाला. आणि सांगू लागला,  ‘मला शेतकरी व्हायचंय! ‘घरी कोणीतरी नको का? थोरला भाऊ सैन्यात दाखल होणार म्हटल्यानंतर गावी आईवडिलांजवळ कोणीतरी पाहिजे ना!’***

गंगोती, ता. माण येथील सचिन बोडरे (वय 17) हा छावणीत भेटलेला युवक सैन्यात भरती होण्यासाठी जोरदार सराव करतोय. दुष्काळी परिस्थिती पाचवीला पूजलेली. तालुक्यात रोजगाराची फारशी संधी नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचा गुण येथील मातीतूनच माणसांना मिळालेला. सचिनही त्याला अपवाद नाही. म्हसवडच्या छावणीत राहत असतानाही तो माणदेशी फाउण्डेशनतर्फे  चालविण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलात सैन्य भरतीत फिट होण्याच्या ध्येयामागे तो धावतोय. दुष्काळी परिस्थिती ही येथील तरुणाईची कमजोरी नाही तर ताकद वाटते झगडण्याची आता इथं पोरांना.ही धमक पाहून खरंच वाटत नाही की दुष्काळी चारा छावणीत आहोत, संकट मोठं डोक्यावर मात्र त्याहून मोठी या तरुण पोरांची हिंमत या छावणीत भेटते.

( प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)