शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मेरठ की पाठशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 8:35 AM

उत्तर प्रदेशात नोकरी करायची, शिक्षिका म्हणून आव्हान होतंच, पुढे..

- शैलजा पाध्ये, शिक्षिका, जवाहर नवोदय विद्यालय, मेरठ, उत्तर प्रदेश

यूपीत जायचं?असा प्रश्न पडलाच. उत्तर प्रदेश म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? मात्र इथं आले आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की, या प्रदेशातील लोक मनानं मात्र मोठी आहेत. कोणतंही कपट नाही. पुढं होऊन मदत करतील आणि मदत घेतीलही. मुलांचं आजारपण असो किंवा आणखी काही लगेच मदतीचा हात पुढे करणारी ही माणसं आहेत. एकदा ट्रेनमध्ये बसताना माझ्या मुस्लीम मैत्रिणीनं दिलेला डबा मला आजही आठवतो. ‘जरूर खाना हं!’ म्हणत दिलेली हक्काची सूचनाही आठवते.उत्तर प्रदेशात नोकरीला आले, इथं एक नवीन भारतच मला भेटला. एकदा उत्तर प्रदेशातील लग्नाची पद्धत पाहावी म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीसोबत लग्नाला गेले. तर त्यांनी कौतुकाने माझ्या हातांवर मेहंदी काढली. लाडू भरवला. मुली माहेरी आल्यावर त्यांना द्यायच्या आहेराच्या कार्यक्रमात त्या घरच्या आजींनी मलाही साडी दिली.अर्थात सोपं नव्हतं इथं येणं. अनंत अडचणींवर मात करत मी ठामपणे उभी होते. थेट उत्तर प्रदेशात मेरठला मला नोकरी करायला जायचं होतं. माझ्या हातात नवोदय विद्यालय, मेरठ, उत्तर प्रदेश येथे बदली झाल्याचा आदेश पडला. मी अस्वस्थ झाले. पुन्हा नव्यानं रुजायचं आता खरंच जिवावर येत होतं; पण मनाची तयारी केली आणि एका नव्या दिशेने प्रवास सुरू केला. मर्यादांपेक्षा मानवी नातं मोठं आहे याची या रुजण्यानं पुन्हा एकदा खातरी करवली.नात्याच्या किंवा गोताच्या नसणाऱ्या अनेकांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने, उभारीने माझा विश्वास आणखीनच वाढत होता. प्रत्येकवेळी नवीन अडचण उभी राहायची आणि आपण त्यावर नव्यानं उपाय शोधायचा, हे ठरलेले.महाराष्ट्रात तुळजापूरलाही मी काही काळ काम केलं होतं. येथेही मला चांगले अनुभवच जास्त आले. माझ्या सहकारी मैत्रिणी, माझे सहकारी शिक्षक, शेजारी या सगळ्यांमुळे मला आपण घरापासून दूर आहोत, नातेवाइकांपासून दूर आहोत असं कधीही वाटलं नाही.मात्र मेरठला जायचं म्हणजे एक नवीन आव्हान होतं; पण ते मी पेललं. इथं येऊन इथलीच झाली. आज मी दिल्ली मेट्रोमधून सहज प्रवास करू शकते, हिंदी-इंग्रजीत संवाद साधू शकते. प्रत्येक अनुभवागणिक माझं वर्तुळ अधिक विस्तीर्ण होत जातं.बाहेरच्या जगात अनुभवांची रत्न मिळतात आणि ती आपल्याला खूप काही देऊन जातात. आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध बनत जातं. नोकरीच्या निमित्तानं मी बराच उत्तर प्रदेश फिरले. मध्य प्रदेश, ओरिसा या भागात मी बरीच फिरले. तेव्हा मला एक सत्य गवसलं की प्रत्येक प्रदेशाचं एक वैशिष्ट असलं तरी चांगली-वाईट प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी असतेच.मेरठनं या साºयावरचा माझा विश्वास वाढवला. जी अस्वस्थता मला नोकरीवर रुजू होताना होती ती आज नाही. आत्मविश्वास आणि स्वाभिमान यांच्या बळावर सुरू केलेला हा प्रवास कायमच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत आला आहे.