शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

होऊ देत भांडणं!...प्रेमात पडलं की भांडण होतंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 08:44 IST

प्रेमात पडलं की भांडण होतंच. भांडण होणं तसं काही वाईट नसतं, उलट एकमेकांना समजून घ्यायची संधी फक्त भांडणच पटकन देतं..

- श्रेणिक नरदे

जगात कुठंही गेलं तर दोन व्यक्तींमधे कायमचा सलोखा राहील असं कुणी लिहून देऊ शकत नाही. प्रत्येक दोन माणसांत भांडणं ही होतच राहतात. जगात कुठंही जा, ती होतातच. अगदी कशावरूनपण भांडता येतंच असतं. या भांडणात इतर सगळ्या गोष्टींप्रमाणं मापं असतात. उदाहरणार्थ- सौम्य भांडण, तीव्र भांडण, मध्यम भांडण (तू जेवली नाय तर मीपण जेवणार नाय...) अशा स्वरूपात ही भांडणं जगभर विविध भाषात, देशात, घरात, दारात वेगवेगळ्या कारणांसाठी होत राहतात.या भांडणात एका पार्टीने माघार घेतली तर ते मिटायची शक्यता असते नाही तर हमखास पेटायची शक्यता असते. राग, मोह, माया, काम, क्रोध विंचू चावून अशी भांडणं होऊ शकतात, म्हणजे होतात.प्रियकर-प्रेयसी यांची भांडणं हीसुद्धा सुदैवाने रोज होत असतात आणि त्यातून प्रेम वाढत राहतं. मुळात एकमेकांना समजून घेण्यासाठी सुरू झालेल्या प्रकरणात भांडणाशिवाय बºयापैकी समजून घेताच येत नाही असा समज असल्याने ही भांडण होत असावीत.पुरुषसत्ताक संस्कृती जरी आसली (म्हणजे असं बोललं जातंय) तरीही आपल्या समाजातील स्त्री हीच मॅनेजर असल्याचं वेळोवेळी दिसून येतं. उंबºयाच्या पलीकडे सत्ता गाजवणारे लोक घरात कुणाच्या इशाºयावर चालतात हे आपल्याला माहिती असावंच. विशेषत: भांडण या विषयात सतत मुद्दा लावून धरणं, मुद्दा रेटणं, आपली बाजू कशी योग्य ही पटवून देताना चार अयोग्य गोष्टी झाल्या तरी चालतील, पण मुद्दा पुढच्याला पटवून देणारच असा उत्साह हा फक्त मुलींच्या ठायी असतो. तो आम्हा बापड्या पोरांत नसतो. त्यामुळे सर्वाधिक प्रेमसंबंधातील भांडणात मुलगा हा बघत राहणं, ऐकून घेणं, मान डोलावणं यापलीकडे जास्त व्यक्त होत नाही.भांडण मिटवणं ही गोष्ट सहजासहजी शक्य नसते. यावेळी मित्र-मैत्रिणी हेच काय ते मेसेंजर, समजून घेणारे, समजूत काढणारे असतात. त्यांच्या मध्यस्थीनं बºयापैकी भांडणं मिटत असतात. नंतर मिटवणारे बाजूला पडत असतातच.पण कोणतंही भांडण हे चांगलंच असतं. हे बरीच भांडणं झाल्यानंतर झालेलं माझं मत आहे. कोणत्याही भांडणावेळची आपली मन:स्थिती शाबूत ठेवून भांडणाचा आनंद घेणे याइतका आनंद दुसरा कशात नसतो. भांडणात सहसा आपल्याला आपली खरी स्थिती कळते. आपल्याबद्दलचा पुढच्या व्यक्तीच्या मनातला राग कशावर आहे ते कळतं. रागाने फुटणाºया, तडतडणाºया व्यक्ती कढईतल्या जिलेबीसारख्या फुगत जात असतात. लाह्यासारखे तडतडत असतात आणि तडतडून हलक्या होतात. शेवटी लाह्या काय आणि जिलेबी काय आपणच खाणार असतो. त्यामुळे शांत राहून या भांडणाचा आनंद घ्यावा, आग कमी- अधिक लावणं हे आपल्या हातात असतं. ते आपल्याच हाती राहिलं तर आपण हारूनही जिंकत असतो.उलट भांडण ही संधी असते. एवढं कोण बोलून घेत असतं काय? एवढं बोलूनही बिचारा गप्प बसला, समजून घेतलं, शांत राहिला, एकही अक्षर उलट बोलला नाही. या समजुती पुढच्या व्यक्तीच्या मनात तयार झाल्यातर भांडण ही फायदेशीर गोष्ट नाही का?प्रेम व्यक्त करण्यासाठी माणसाला असंख्य धडपडी कराव्या लागतात. त्यातून आपलं प्रेम (व्यक्त केलेलं) किती प्रमाणात पोहोचलं? हे मोजण्याच कोणतंही साधन नसतंच. त्यापेक्षा साधं एखादं भांडण होईल अशी काळजी घेतली तर असंख्य गोष्टी साधता येतात.भांडणाच्या नादात अनेक नसलेल्या गोष्टी पुढे येऊन त्यावर चर्चा होऊन काहीतरी नवीन सापडतं. जुना मुद्दा भरकटत ठेवून नवीन मुद्दा घेऊन भांडणं यानं आपल्याच माणसाचा अंदाज येतो. मन मोकळं होतं. उगीच गैरसमज राहत नाही.भांडण हे व्यासपीठ आहे. भांडण हा प्रेमाचा अविभाज्य घटक आहे. त्यातून आपल्याला आनंदच मिळतो. नव्या गोष्टी समजत राहतात. प्रेमावर आलेली साय, शेवाळ निघून जातं. प्रेम पारदर्शी होतं. यासाठीच पाश्चात्य लोकांनी व्हॅलेण्टाइन्स डे नंतर स्लॅप डे चा प्रकार आणला असावा. अशी ही सुंदर भांडणं टाळू नयेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात कडाडून भांडणं होत राहोत आणि दोघांतलं प्रेम वाढत राहो.