शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

मूठभर प्रकाश....मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 03:00 IST

मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं यालाच तर म्हणतात दिवाळी..यंदा आपल्या मनात हा यशाचा दिवा उजळू दे..

Our greatest weakness lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time.” - Thomas Edisonदिव्याचा शोध लावणारा एडिसन. या मुलाला काहीही येत नाही असं लेबल त्याच्या शिक्षकांनी त्याच्यावर चिकटवलं होतं. ‘स्टुपिड’ अशी पदवीच त्याला शाळेनं बहाल केली होती. काहीच धड जमत नाही म्हणून त्याच्या पहिल्या दोन नोकºया गेल्या. कामावरून काढून टाकलं गेलं त्याला. पुढे दिव्याचा शोध लागला. त्यावेळेस त्यानं सांगितलं की, एक हजारवेळा मी हा दिवा उजळवण्याचा प्रयत्न केला; पण काही जमलं नाही. तेव्हा त्याला कुणी विचारलं की म्हणजे तू हजारवेळा अपयशी ठरला होतास?त्यावर एडिसन म्हणाला, हजारवेळा अपयश नाही आलं तर या हजार पद्धतीनं हा दिवा लागत नाही हे मला कळलं..आता सांगा, ज्या जगानं एडिसनला स्टुपिड ठरवलं ते जग, आपल्याला जिनिअस ही पदवी सहज देऊन टाकेल का?आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न.हजारवेळा अपयश येऊनही आपल्याला हवं ते काम करण्याइतपत पेशन्स आपल्यात आहे का?आपण रडतोच फार..किती कारणं सांगतो, हे झालं म्हणून ते झालं आणि ते झालं नाही म्हणून हे झालं नाही..साधं उशिरा पोहचण्याचं उदाहरण घ्या..आपलं अपयशच ते, वेळेवर न पोहचण्याचं..पण आपण पटकन म्हणत नाही की, उशिरा उठलो म्हणून उशीर झाला..आपण फुटकळ कारणं सांगतो, पाऊस होता, गाड्या लेट, ट्राफिक जाम..म्हणजे आपल्या अपयशाचं खापर आपण सतत दुसºयाच्या डोक्यावर फोडायला पाहतो..ज्याला अपयश स्वीकारता येत नाही, तो यश काय स्वीकारणार?म्हणजे पहा..प्रश्न काहीही असो, अपयश कशातूनही येवो आपण त्यासाठी जबाबदार घटकांची यादी घेऊनच फिरतो..असं नाही म्हणत की, चुकलं माझंच काहीतरी, नाही जमलं मला, अंदाज फसला, कुवत कमी पडली, तयारी कमी पडली, क्षमता वाढवायला हवी..हे नाहीच..आपण सतत इतरांकडे बोट दाखवतो..कधी आपले पालक, कधी आर्थिक परिस्थिती, कधी समाज आणि कुणी नाहीच भेटलं तर देव आणि नशीब आहेतच..त्यांना दोष देऊन मोकळं व्हायचं..परिणाम?आपलं अपयश संपत नाही..आणि मग आपण म्हणतो, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही..अपयश म्हणजे काही आपल्यावरचा डाग नव्हे..उलट हारलो म्हणजे निदान आपण त्या खेळात तरी होतो हे सिद्ध होतं..हरणं वाईट नाहीच; पण त्या अपयशातून आपण किती पटकन उभे राहिलो यावर पुढची जित ठरते..धोनी सिनेमात एक प्रसंग आहे..शालेय क्रिकेटच्या काळातला..युवराज सिंगच्या संघाविरोधात हरण्याचा..धोनी सांगतो, पता है हम मॅच कहां हारे? बास्केटबॉल कोर्ट पर?कारण त्याचे सहकारी युवराजचा तामझाम पाहून तिथंच मनोमन पत्करतात की, याच्यापुढे आपला निभाव नाही..हे धोनीला कळलं म्हणून तो हरला नाही आणि हरला तरी संपला कधीच नाही..हे उभं राहणं जमेल आपल्याला?का नाही?दिवाळी हेच तर सांगते..मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणंआणि प्रकाशाची वाट चालणंयालाच तर म्हणतात दिवाळी..यंदा आपल्या मनात हा यशाचादिवा उजळू दे..हीच प्रार्थना..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017