शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

गोलगोल इमरतीसारखी औरंगाबादी इश्काची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:28 IST

थोडी मोकळीक, थोडी बंधनं थोडा बदल, थोडी मुरड असं नवंजुनं घेत ‘जमवून’ घेत जगणं ही इथली प्रेमकहाणी.

ठळक मुद्देसंपूर्ण राज्याच्या चळवळींचं मैदान ठरलेल्या या शहरात प्रेमाची अभिव्यक्ती किती सोपी, किती अवघड आहे?

- अगस्त्य देवकर

प्रेमाची चव काय? जगभरात कुठेही याचं उत्तर चॉकलेट असं मिळेल.  पण या शहरात ते इमरती असंच द्यावं लागेल.प्रेमाचं प्रतीक काय? याचं उत्तर सर्रास ‘ताजमहाल’ असं येईल. पण या शहारत ते बीबी-का-मकबरा असं सांगावं लागेल.हे आहे औरंगाबाद आणि इथलं प्रेम.सुफीवाद, शायरी आणि कलेची जिवंत नहर असणार्‍या या शहरात आधुनिक प्रेमाचं स्टेटस काय? संपूर्ण राज्याच्या चळवळींचं मैदान ठरलेल्या या शहरात प्रेमाची अभिव्यक्ती किती सोपी, किती अवघड आहे?उत्तर आहेर्‍ खूप पुढं आलोय..अजून खूप पुढं जायचंय!या शहरातील लोकांनी मुलंमुली मित्न असतात ही एक प्रकारे मान्य आणि गृहित धरलेलं आहे. त्यामुळे मुलामुलींनी एकत्न फिरण, बसणं, बोलणं आता तितकं नजरा वळवणारं ठरत नाही. पण मुलामुलींचा ग्रुप असेल तरच. जोडप्यांना अजून तरी ती मोकळीक नाही.मोबाईलच्या स्क्र ीनच्या पल्याड, व्हॉट्सअ‍ॅप/इन्स्टाच्या इमोजीशिवाय नजरेला नजर देऊन मनातलं सांगण्याची, मनसोक्त गप्पा मारण्याची मुभा पब्लिक प्लेसमध्ये तरी नाही. अनेक छोट्या-छोट्या गार्डन्समध्ये मुलामुलींना न बसू देण्याच्या पाट्यादेखील लावण्यात आल्या आहेत. बीबी-का-मकबरा इथं प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपी दिसतील. विद्यापीठ परिसर, साई टेकडी, कॅनॉट गार्डन या काही ठिकाणीही जोडप्यांचा वावर असतो. पण मनात धाकधुक मात्र कायम असते. उनाड पोरं, हटकणारे काका-काकू आणि स्वयंघोषित ‘संस्कृती रक्षक’ यांना इथं टाळता येईलच असं नाही.‘‘मुलगा-मुलगी एकटे बसलेले असतील तर एखादं टोळकं येऊन प्रश्न करणार, घरी सांगण्याची धमकी देणार, ‘हे धंदे इथं चालणार नाही’ असा डोस पाजणार म्हणजे पाजणारच असं इंजिनियरिंग थर्ड इयरला असणारा स्वप्नील सांगतो. त्याची ही आपबीती. अशा वेळी पोलिसांकडे मदत मागण्याचीसुद्धा पंचाईत असते. मग आता ही मुलं शहरातल्या नव्या कॅफेंकडे वळू लागली आहेत. कॉफी आणि बरंच काही असा मामला आहे.दहा वर्षांपूर्वी सीसीडी आणि सीसीबी या दोन नावांपलिकडे औरंगाबादकरांचे कॅफे विश्व नव्हतं. पण आता दर आठवड्याला नवीन कॅफे सुरू होतोय, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरात तीनशेहून अधिक छोटेमोठे कॅफे आहेत. कॉलेज परिसरात आणि खासकरून कॅनॉट प्लेसमध्ये कॅफेची गर्दी आहे. 100 ते 150 रु पयांमध्ये तासनतास बसता येतं. बजेटनुसार कॅफेची चॉईस आहे.तरु णाईचा आधुनिक कट्टा म्हणा ना. या शहरांत देशभरातूनच नाही तर जगभरातून मुलं आता शिकायला येतात. त्यांनाही लहानमोठे कॅफे, कॉफीशॉप हा बरा आधार वाटतं. मुली सांगतात की, इतक्या भयंकर घटना अवतीभोवती घडत असतात त्यामुळे आता पालकांनी मुलींवर र्निबध कडक केले आहेत. त्यामुळे आता कॉलेज ते घर असं करत मुली बाहेर कुठं जाऊ शकत नाहीत, त्या तडक घरीच जातात. खरंतर अजूनही इथं बॅचलर मुलामुलींना घरं मिळणं थोडं कठीणच जातं. मुलीमुली राहत असतील तर सोसायटीतील इतर रहिवाशांची त्यांच्यावर बारीक नजर असते. काही ठिकाणी तर बिल्डिंगच्या समोर किवा ड्रॉप करण्यासाठीसुद्धा मुलं आलेली चालत नाहीत. मात्र आता हळूहळू शहरातील अनेक कॉलेजमध्ये मुलमुली- ग्रुप किंवा जोडीने फिरू शकतात इतकी मोकळीक आहे. एका ‘मर्यादे’च्या आत मुलामुलीच्या एकत्न फिरणं, बसणं, बोलणं याबाबत कॉलेजमध्ये अडचण येत नाही. खास करून इंजिनियरिंग, मेडिकल आणि हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात ही सामान्य बाब आहे. मात्र अनेक मुलांशी बोलल्यावर हे सहज लक्षात येतं की, प्रेमात पडतानाही लगA करताना काय अडचणी येतील याचा विचार अनेकजण करतात. कारण जातीचा धाक. त्यापायी होणारा विरोध आपण टाळूच शकत नाही असं अनेकांनी सांगितलं.थोडा बदल, थोडी मोकळीक आणि थोडी बंधनं असं इथलं चित्र आहे.

( अगस्त्य औरंगाबादमध्ये खासगी नोकरी करतो.)