शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

गोलगोल इमरतीसारखी औरंगाबादी इश्काची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 5:28 PM

थोडी मोकळीक, थोडी बंधनं थोडा बदल, थोडी मुरड असं नवंजुनं घेत ‘जमवून’ घेत जगणं ही इथली प्रेमकहाणी.

ठळक मुद्देसंपूर्ण राज्याच्या चळवळींचं मैदान ठरलेल्या या शहरात प्रेमाची अभिव्यक्ती किती सोपी, किती अवघड आहे?

- अगस्त्य देवकर

प्रेमाची चव काय? जगभरात कुठेही याचं उत्तर चॉकलेट असं मिळेल.  पण या शहरात ते इमरती असंच द्यावं लागेल.प्रेमाचं प्रतीक काय? याचं उत्तर सर्रास ‘ताजमहाल’ असं येईल. पण या शहारत ते बीबी-का-मकबरा असं सांगावं लागेल.हे आहे औरंगाबाद आणि इथलं प्रेम.सुफीवाद, शायरी आणि कलेची जिवंत नहर असणार्‍या या शहरात आधुनिक प्रेमाचं स्टेटस काय? संपूर्ण राज्याच्या चळवळींचं मैदान ठरलेल्या या शहरात प्रेमाची अभिव्यक्ती किती सोपी, किती अवघड आहे?उत्तर आहेर्‍ खूप पुढं आलोय..अजून खूप पुढं जायचंय!या शहरातील लोकांनी मुलंमुली मित्न असतात ही एक प्रकारे मान्य आणि गृहित धरलेलं आहे. त्यामुळे मुलामुलींनी एकत्न फिरण, बसणं, बोलणं आता तितकं नजरा वळवणारं ठरत नाही. पण मुलामुलींचा ग्रुप असेल तरच. जोडप्यांना अजून तरी ती मोकळीक नाही.मोबाईलच्या स्क्र ीनच्या पल्याड, व्हॉट्सअ‍ॅप/इन्स्टाच्या इमोजीशिवाय नजरेला नजर देऊन मनातलं सांगण्याची, मनसोक्त गप्पा मारण्याची मुभा पब्लिक प्लेसमध्ये तरी नाही. अनेक छोट्या-छोट्या गार्डन्समध्ये मुलामुलींना न बसू देण्याच्या पाट्यादेखील लावण्यात आल्या आहेत. बीबी-का-मकबरा इथं प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपी दिसतील. विद्यापीठ परिसर, साई टेकडी, कॅनॉट गार्डन या काही ठिकाणीही जोडप्यांचा वावर असतो. पण मनात धाकधुक मात्र कायम असते. उनाड पोरं, हटकणारे काका-काकू आणि स्वयंघोषित ‘संस्कृती रक्षक’ यांना इथं टाळता येईलच असं नाही.‘‘मुलगा-मुलगी एकटे बसलेले असतील तर एखादं टोळकं येऊन प्रश्न करणार, घरी सांगण्याची धमकी देणार, ‘हे धंदे इथं चालणार नाही’ असा डोस पाजणार म्हणजे पाजणारच असं इंजिनियरिंग थर्ड इयरला असणारा स्वप्नील सांगतो. त्याची ही आपबीती. अशा वेळी पोलिसांकडे मदत मागण्याचीसुद्धा पंचाईत असते. मग आता ही मुलं शहरातल्या नव्या कॅफेंकडे वळू लागली आहेत. कॉफी आणि बरंच काही असा मामला आहे.दहा वर्षांपूर्वी सीसीडी आणि सीसीबी या दोन नावांपलिकडे औरंगाबादकरांचे कॅफे विश्व नव्हतं. पण आता दर आठवड्याला नवीन कॅफे सुरू होतोय, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरात तीनशेहून अधिक छोटेमोठे कॅफे आहेत. कॉलेज परिसरात आणि खासकरून कॅनॉट प्लेसमध्ये कॅफेची गर्दी आहे. 100 ते 150 रु पयांमध्ये तासनतास बसता येतं. बजेटनुसार कॅफेची चॉईस आहे.तरु णाईचा आधुनिक कट्टा म्हणा ना. या शहरांत देशभरातूनच नाही तर जगभरातून मुलं आता शिकायला येतात. त्यांनाही लहानमोठे कॅफे, कॉफीशॉप हा बरा आधार वाटतं. मुली सांगतात की, इतक्या भयंकर घटना अवतीभोवती घडत असतात त्यामुळे आता पालकांनी मुलींवर र्निबध कडक केले आहेत. त्यामुळे आता कॉलेज ते घर असं करत मुली बाहेर कुठं जाऊ शकत नाहीत, त्या तडक घरीच जातात. खरंतर अजूनही इथं बॅचलर मुलामुलींना घरं मिळणं थोडं कठीणच जातं. मुलीमुली राहत असतील तर सोसायटीतील इतर रहिवाशांची त्यांच्यावर बारीक नजर असते. काही ठिकाणी तर बिल्डिंगच्या समोर किवा ड्रॉप करण्यासाठीसुद्धा मुलं आलेली चालत नाहीत. मात्र आता हळूहळू शहरातील अनेक कॉलेजमध्ये मुलमुली- ग्रुप किंवा जोडीने फिरू शकतात इतकी मोकळीक आहे. एका ‘मर्यादे’च्या आत मुलामुलीच्या एकत्न फिरणं, बसणं, बोलणं याबाबत कॉलेजमध्ये अडचण येत नाही. खास करून इंजिनियरिंग, मेडिकल आणि हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात ही सामान्य बाब आहे. मात्र अनेक मुलांशी बोलल्यावर हे सहज लक्षात येतं की, प्रेमात पडतानाही लगA करताना काय अडचणी येतील याचा विचार अनेकजण करतात. कारण जातीचा धाक. त्यापायी होणारा विरोध आपण टाळूच शकत नाही असं अनेकांनी सांगितलं.थोडा बदल, थोडी मोकळीक आणि थोडी बंधनं असं इथलं चित्र आहे.

( अगस्त्य औरंगाबादमध्ये खासगी नोकरी करतो.)