शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

काचेचं छत फोडणारे खेलरत्न....देवेंद्र झाझडिया आणि सरदार सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 3:39 PM

जो समाज या खेळाडूंना मोजतच नाही, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणं तर सोडाच, त्या कर्तृत्वाला मोजतही नाही, त्या समाजात एका पॅराअ‍ॅथलटिला आणि हॉकीपटूला क्रीडाक्षेत्राला सर्वोच्च पुरस्कार मिळतो, ही घटना आपल्याला काय सांगते?

चिन्मय लेले

जे जग आपल्याला मोजतच नाही, आपल्या कर्तृत्वाला कर्तृत्वही समजत नाही, ज्या जगाच्या लेखी आपलं अस्तित्वच नाही, त्या जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यावर कसं वाटत असेल?-विचारा देवेंद्र झाझडिया आणि सरदार सिंगला!-अर्थात बहुसंख्यांना आता असा प्रश्न पडला असेल की हे दोघं कोण?त्यांना कुठला सर्वोच्च पुरस्कार मिळाला, कशाबद्दल मिळाला? आणि त्यांनाच का मिळाला बाकी कुणी नव्हतं का?हे प्रश्न हीच तर आपल्या समाजात खरी शोकांतिका आहे गुणवत्तेची आणि आपल्या मानसिकतचेही! आणि हा दोष गुणी माणसांचा नाही, तर समाज म्हणून आपल्या बेफिकीरीचा आणि बेदरकार वृत्तीचा आहे!झालं असं की, गेल्या आठवड्यात पॅराअ‍ॅथलिट आॅलिम्पिकपटू देवेंद्र झाझडिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना राष्टÑपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला!देशाच्या क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाºया खेळाडूंना या पुरस्कारानं नावाजलं जातं. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे देशाच्या पायी सर्वोच्च क्रीडासेवा रुजू केल्याचं प्रमाणपत्रच जणू! तो पुरस्कार एका पॅराअ‍ॅथलिटला मिळणं आणि सर्वार्थानं दुर्लक्षित हॉकी आणि हॉकीपटूस मिळणं, ही खरंतर अत्यंत भूषणावह गोष्ट आहे आणि तितकीच बोलकीही, सूचकही!आजही आपल्या समाजात एक मोठं ग्लास सिलिंग आहे. म्हणजे काय तर समाजच ठरवून टाकतो अनेकांच्या क्षमतांचं स्वातंत्र्य. आकाशात उंच रेषा मारल्या जातात, समाज सांगतो ही तुमची सीमा, उडा पण इथवरच! यापलिकडे उडण्याचं बळ अनेकांच्या पखांत नाही असं ठरवून टाकण्याचा बेदरकारपणा समाजच करतो. पण काचेच्या दृश्य अदृश्य सीमारेषा तोडूनफोडून आपली स्वप्नं पूर्ण करणं ज्यांना जमतं, त्या साºयांना बळ देणारी अशी ही घटना आहे.ज्या देशात क्रिकेटपलीकडे अन्य खेळांची आणि त्यातल्या गुणवत्तेची नोंद घेणं आता कुठं सुरू झालं आहे, त्या देशात दिव्यांग खेळाडू, त्यांची स्वप्नं, गुणवत्ता हे सारं कोण मोजणार? त्यांना खेळाडू असं तरी मानतो का आपला समाज?देवेंद्रचंच उदाहरण घ्या, त्यानं २००४ आणि २०१६ या दोन्ही वर्षी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक आणलं. पण त्या पदकाचं काय मोल, काय कौतुक झालं आपल्या समाजात?-फारच जेमतेम.तेच हॉकीचंही!मात्र हा सारा दुर्लक्षित भूतकाळ मागे सोडून एक नवीन उमेद निर्माण व्हावी, देशात क्रीडासंस्कृतीचं वातावरण खºया अर्थानं रुजावं अशी आशा वाटावी म्हणून यंदा देण्यात आलेल्या या खेलरत्न पुरस्कारांकडे पाहता येऊ शकतेल.हे पुरस्कार फक्त खेळापुरते मर्यादित नाहीत, बुरसटलेल्या मानसिकतेपलीकडे जाऊन गुणवत्तेचा सन्मान करणं आपल्यालाही जमू शकतं हे आपल्याच समाजाला सांगणारी ही घटना आहे.म्हणून या पुरस्काराच्या निमित्तानं आपणही देवेंद्र आणि सरदार सिंगला भेटायला हवं.त्यांच्याकडे असलेल्या दुर्दुम इच्छाशक्तीचं आणि मेहनतीचं इंजेक्शन टोचून घ्यावं जमल्यास स्वत:लाही!आणि मुख्य म्हणजे कुणाच्याही क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आपली नजरही त्यातून बदलता आली तर बदलून घ्यावी.