शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

अठराव्या वर्षी होतं असं! ...पण दुसरे आॅप्शन्सही असतात !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 12:21 PM

‘मला नुस्तं लोळत पडायचंय बाबांनो, मित्रांसोबत नुसत्याच गप्पा मारायच्यात, फोन हातात घेऊन दिवस दिवस बसायचंय... थंड बसून राहाणं हाच माझा छंद आहे’ - असं ज्याच्या-त्याच्या कानात ओरडून सांगावंसं वाटतं ना?

- प्राची पाठकछंद काय तुझा?हा एक सहजच विचारला जाणारा प्रश्न. अगदी शाळेपासून लोक आपल्याला विचारत असतात. ‘आवडतं काय तुला?’मोठ्ठं होऊन अमुक होणार, याचं उत्तर लहानपणी काहीही दिलं तरी चालतं. पण १८ वर्षांचं होता होता मात्र करिअरसह या ‘काय आवडतं?’ प्रश्नाचा एक नवा व्याप मागे लागतो.आपण आपल्या आवडी-निवडीनुसार एक, दोन, चार छंद सांगतो. त्यात आपल्या अवतीभोवती मित्र-मैत्रिणींचा गराडा असतो. सोशल साइट्सवरचा माहितीचा भडिमार असतो. फोनमधून डोकं वर निघेल तर नां, ही वस्तुस्थिती कमी- जास्त फरकाने आजकाल अनेकांना समजून घ्यावी लागते.त्यात नवीन प्रश्न आयुष्यात अचानक महत्त्वाचे ठरू लागतात. आपलं दिसणं भारी आहे का? आपला सेल्फी कसा दिसतो? या बाजूने कसा? त्या बाजूने कसा?त्यात वय असं की, घरात काही जबाबदाºया असतात. अभ्यास, करिअर गोल्स असतात. कुणाला एखादा जॉब घेऊन शिकावं लागतं. कुणाला काही भलत्याच अडचणी येतात. आणि या साºयातून काय आवडतं वा काय आवडत नाही, याचीच आपली यादी मोठी होते. शी, हे नाही करणार मी, असं म्हणत हेच मत जास्त पक्कं होत जातं.लोक सांगत असतात, ‘हेच वय आहे काहीतरी कर! त्यांच्याकडे आपण ‘काय लेक्चर देतात’ म्हणून बघतो. लेक्चरचा डोस वाढला तर त्या लोकांपासून पळ काढू लागतो.‘मला केवळ लोळायचं आहे बाबांनो, मित्रांसोबत नुसत्याच गप्पा मारायच्या आहेत, फोन हातात घेऊन दिवस दिवस बसायचं आहे’, असं त्यांच्या कानात ओरडून सांगावंसं वाटतं. हे करायलापण हेच वय आहे, नंतर आहेच करिअर मागे धावपळ, घरात धावपळ. ‘थंड बसून राहाणं, हा माझा छंद आहे,’ असं कधी कोणाला मुद्दाम सांगावं असंही वाटत असतं.त्यात मुलांना विचारायचे प्रश्न आणि मुलींना विचारायचे प्रश्न असा भेद अनेकदा असतोच. ‘माझं मी ठरवीन, हाच माझा छंद आहे, ते तुम्ही प्लीज समजून घ्या’ असं सांगून टाकावं असंही मुलींच्या मनात येतंच.मात्र या साºयात होतं काय, या माझं मी ठरवीनमध्ये कळत नकळत मला काय आवडतं, काय करायचं आणि काय काय शिकायचं आहे, यापेक्षा मी काय करणार नाही, काय मला नको आहे, कोणती गोष्ट अजिबातच आवडत नाही, याचीच यादी मोठी आणि पक्की होत असते. आपल्याला काय आवडतं यापेक्षा काय आवडत नाही हे पटकन सांगता यायला लागतं.काय आवडत नाही, याची यादी म्हणजेच आपली ओळख बनून जाते. मी या चार गोष्टी करून बघितल्या. त्यात हे-हे अनुभव आले. त्यावरून सध्या तरी ही गोष्ट मला पुढे ढकलाविशी वाटतेय, कदाचित ती मला झेपत नाहीये, ते लक्षात आलं आहे, असं फार कमी जण सांगतात.बाकीचे सारे एकदम स्पेसिफिक आवडी-निवडी वरवरच्या माहितीवरून बनतात. ‘नाही म्हणजे नाहीच्च’ हा शिक्का कितीतरी गोष्टींवर वयाची विशीसुद्धा आलेली नसताना ठामपणे मारून टाकला जातो.‘करून तर बघू’, हा उत्साह फार लवकर मावळतो. कदाचित आज टाळलेली गोष्टच उद्या आपल्याला आयुष्याची दिशा देऊ शकते. तिचा कुठे नां कुठे वापर करता येऊ शकतो. निदान कोणत्या-कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला ती गोष्ट जमली नाही, ते तरी नीटच लक्षात येतं.आजूबाजूला त्या विषयांत नावाजलेलं कोणी त्या टप्प्यात चटकन आपल्याला मदत करू शकणारं असतं. तशी संधी कदाचित नंतर मिळणार नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळे म्हणून एकदमच विषयाला कुलूप लावून टाकायचं नाही. फाइल डिलीट करून टाकायची नाही; आपल्या डोक्यात डाउनलोड करून ठेवायची. एडीट करता येईल का, ते बघायचं. त्यानिमित्ताने कुठे भटकायला जाता येतं, वेगळ्या फिल्डमधली माणसं भेटतात, नवीन विश्व कळतं. हे सारं या वयातच करून घ्या.नंतर ना वेळ उरतो हाताशी, ना अनेकदा आयुष्य परवानगी देतं. त्यामुळे ‘खुल के जिओ’ हा एकमेव मंत्र हाताशी ठेवून मनात येईल ते करून पाहणं हा या वर्षीचा मंत्र केला तर खूप बहार येते आयुष्यात!(prachi333@hotmail.com)