शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पेपर टाकले, पण शिकलोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:00 AM

गाव सोडून शहरात आलो, कुठं प्रवेश मिळेना. वणवण संपेना, पण हरायचं नाही हे इथंच शिकलो..

- विक्रमसिंह बायस,

गाव सोडून शहरात आलो,कुठं प्रवेश मिळेना.वणवण संपेना,पण हरायचंनाही हे इथंच शिकलो...मार्डी. तालुका उत्तर सोलापुरातल्या प्रसिद्ध यमाई मंदिर गावचा मी. दहावीपर्यंतचं शिक्षण सोलापूर शहरात येऊन-जाऊन केलं. गावापासून शहर फक्त वीस किलोमीटरवर होतं. गावाकडे मोठा वाडा होता. त्यामुळे शहरात रहायला गेलो नाही. अप-डाउन केलं. वडिलांना वाटे मी अभियंता व्हावं. आठवीपासूनच तयारी सुरू केली. दहावीत मार्क अपेक्षेपेक्षा कमी होते. मला डिप्लोमाला तरी प्रवेश मिळेल अशी आशा होती; पण ते मिळालं नाही. परिस्थिती नव्हती की डोनेशन भरून प्रवेश घेता येईल. मग सायन्स घेतलं. इच्छेविरुद्ध फिजिक्स, केमिस्ट्रिी शिकावं लागल्यानं बारावीला मार्क्स कमी पडले. दहावीनंतर वडिलांनी सोलापूर शहरात ३०० स्क्वे. फूट जागा घेतली. साधारण पत्र्याची, परंतु राहण्यायोग्य. वडिलांना नोकरी सोडावी लागली. पर्यायाने वृत्तपत्र विक्री सुरू केली. सुदैवाने तेव्हाच दहावीच्या गुणांवर एसपीएम पॉलिटेक्निक कुमठे गाव इथं प्रवेश मिळाला. गावातून शहरात आणि पुन: शिक्षणासाठी गावात असं चक्र फिरलं.पेपर विक्री चालू होती. सोलापूर येथे दत्त चौक प्रसिद्ध असं ठिकाण. पहाटे ४.३० वाजता गाड्या यायच्या. तिथून पेपर घेऊन, ते टाकून घरी यायचो. कॉलेज माझ्या घरापासून १२ किलोमीटर. सायकलवर जायचो. अशी डिप्लोमाची ३ वर्षे काढली. क्षेत्र आवडीचं असल्या कारणाने मार्क्सही चांगले मिळत गेले. अव्वल ठरलो. ३ कॅम्पसमध्ये निवड झाली. पुण्याच्या एका नामवंत कंपनीत सुपरवायझर पोस्ट मिळाली. मन ऐकत नव्हते शिक्षण अर्धवट झाले वाटत होते. इतकी वर्षं वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय केला. त्यात दोन मुलं जे शाळा शिकून माझ्यासोबत उदरनिर्वाहासाठी करायचे, त्यांचं काम सुटलं. पुढच्या शिक्षणाच्या हेतूने पुन: पेपर विक्री करत प्रवेशाच्या उद्देशाने महाविद्यालये फिरू लागलो. प्रवेशाच्या फेºया संपल्या होत्या. नाइलाज म्हणून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी प्रवेश घेतला. शेवटी एकदा अभियंता होण्याचं स्वप्न पूर्ण झालं असं वाटत होतं... मुंबईच्या एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली; परंतु काम मनासारखं नव्हतं. मी पुन्हा सोलापूर गाठलं.त्या काळात सर्व क्षेत्रात जागतिक मंदीच्या लाटेमुळे नोकरीप्रश्न अवघड झाले. एका वृत्तपत्रात जाहिरात पाहिली आणि मग एक तंत्रशिक्षण देणाºया महाविद्यालयात मुलाखतीच्या निमित्ताने गेलो. अतिशय कठीण अशा ३ फेºयामधून माझी निवड प्राध्यापक म्हणून झाली. आज त्याच महाविद्यालयात काम करतोय. ज्या महाविद्यालयात डिप्लोमा प्रवेशासाठी नाकारण्यात आलं होतं तिथंच शिकवतोय. शहरानं बरंच काही शिकवलं. जगण्याची जिद्द, जिंकण्याची उमेद दिली. गावाकडची माणसे शहरात आल्यावर बदललेली मी पाहिली. धावपळीच्या युगात आपलं कोण हेही कळालं. आज एक प्राध्यापक म्हणून जगत असताना वृत्तपत्र विक्रेता म्हणूनदेखील ओळख आहे. कारण वृत्तपत्रांनी मला जगवलं..सोलापूर