शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

Innovation Scholars 4 : जंगलातला सुगंध

By admin | Updated: March 14, 2017 16:13 IST

अगरबत्ती यंत्रांनी आदिवासी बायका होताहेत स्वयंनिर्भर!

 देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित.पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख..दुर्गम आदिवासी आणि अतिशय ग्रामीण भागातील लोकांसाठी चरितार्थाचं मुख्य साधन काय?यातील बहुतेकांकडे ना स्वत:ची जमीन ना त्यांच्याकडे कुठलं स्किल, ना रोजगारासाठी तिथे कोणता उद्योगधंदा.मजुरी आणि आसपासच्या जंगलावरच त्यांना प्रामुख्यानं अवलंबून राहावं लागतं.आदिवासींच्या चरितार्थात बांबूचा वाटा खूप मोठा. या बांबूनं आदिवासी बांधवांच्या आयुष्यात थोडीफार स्थिरताच आणली नाही, तर त्यांच्या पोटापाण्याचाही तो प्रमुख आधार ठरला. वर्षानुवर्षापासून या बांबूनंच त्यांना तारलं आहे. आजही बांबूनंच त्यांचं ‘पालकत्व’ घेतलं आहे.बांबूपासून टोपल्या विणणं, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, बांबूच्या काड्यांपासून अगरबत्त्या तयार करणं.. यासारख्या छोट्या-मोठ्या कामांतून आपल्या पोटाची खळगी ते भरतात. मात्र यातलं कुठलंही काम करण्यासाठी त्यांना हातातल्या सुरी, कोयता किंवा चाकूसारख्या धारदार हत्यारावर आणि आपल्या शारीरिक श्रमांच्या क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं.सुरी, कोयत्यानंच बांबू तासणं, त्याच्या लांबच लांब कामट्या काढणं आणि मग हव्या त्या आकारात त्यांचे तुकडे करणं, या साऱ्या कामांत नुसते शारीरिक श्रमच नाहीत, तर धोकाही खूप मोठा आहे.सुरी, कोयते वापरताना थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्यामुळे हात, बोट कापलं जाणं, जखमी होण्याचे प्रकारही आदिवासींसीठी नित्याचे आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटीही त्यामुळे बऱ्याचदा हिरावली गेली आहे.बांबूपासून अगरबत्त्या किंवा त्यासाठीचा कच्चा माल, म्हणजे कामट्या, काड्या तयार करण्याचा उद्योग आदिवासी, ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. विशेषत: घरातला महिला वर्ग आणि थोड्या कळत्या वयातल्या मुलांचा तर यात खूपच मोठा हातभार आहे. रोजचा घरखर्च चालवण्यात आणि त्याचबरोबर महिलांना स्वयंनिर्भर बनवण्यात या उद्योगाचं योगदान आदिवासी भागासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.मात्र बांबू आणण्यापासून ते अगरबत्ती, इतर वस्तू तयार करण्यापर्यंतचे कष्ट अपरंपार आहेत. आदिवासी लोकांचे हे कष्ट कमी करण्यासाठी एका तरुणानं पुढाकार घेतला.त्याचं नाव परेश पांचाल.गुजरातेतल्या अहमदाबादचा हा तरुण. अगरबत्त्यांची मशिन्स तयार करण्याचा त्यांचा पिढीजात उद्योग आहे. या व्यवसायात त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. अर्थात या उद्योगातही आता मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणही झालेलं आहे. सेमी अ‍ॅटोमॅटिक मशिनपासून ते फूल्ल अ‍ॅटोमॅटिक मशिनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण अशा यंत्रांची किंमत जास्त आणि वजेची गरजही मोठी.फावल्या वेळात हे काम करणाऱ्या गरीब आदिवासी महिलांसाठी यातला कोणताच पर्याय परवडणारा नाही आणि घरातल्या घरात, हातावर काम करणाऱ्या या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणंही शक्य नाही. अगरबत्त्यांसाठी मशिन्स तयार करण्याचा घरचा उद्योग होताच. परेशनं मग आणखी अभ्यास केला, आदिवासी, ग्रामीण भागातल्या अडचणी जाणून घेतल्या. विजेची उपलब्धता ही तिथली आणखी एक प्रमुख अडचण. परेशनं या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि साधी, सोपी, घरच्या घरी चालवता येऊ शकतील, कमी जागेत बसू शकतील अशी सुटसुटीत काही यंत्रं तयार केली. या यंत्रांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रं असली तरीही हीदेखील हातानंच चालवावी लागतात. विजेची किंवा कोणत्याही ऊर्जेची गरज या यंत्रांना लागत नाही.आदिवासींची शक्ती आणि वेळ तर या यंत्रांनी वाचवलाच, पण त्यांचा धोकाही कमी केला. तुलनेनं स्वस्त असलेल्या या यंत्रांनी आदिवासी भागात एक मोठाच रोजगार उपलब्ध करुन देण्याची किमया केली.या यंत्राच्या सहाय्याने हातात सुरे, कोयते घेण्याची आदिवासींची गरजच संपली. यंत्रात बांबू टाकल्यावर आपल्या पाहिजे त्या आकाराच्या, जाडीच्या आणि लांबीच्या कामट्या या यंत्रातून तयार होऊ शकतात. बांबूच्या ठराविक जाडीच्या कामट्या अगोदर तयार करायच्या आणि नंतर त्याच मशीनच्या साहाय्याने नेमक्या उंचीच्या काड्या तयार करायच्या! यामुळे आदिवासींचे श्रम खूप मोठ्या प्रमाणात वाचले, त्यात अधिक कौशल्यही आले. तयार झालेल्या या काड्या ‘अगरबत्ती रोलिंग मशीन’मध्ये टाकायच्या. त्यातला अगरबत्ती मसाला आपोआप त्या काड्यांना लागतो. झाली सुगंधित अगरबत्ती तयार!हीच यंत्रं त्यांना त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठीही वापरता येऊ शकतात.या यंत्रांच्या सहाय्यानं प्रत्येक आदिवासी महिला दिवसाला किमान शंभर ते दिडशे रुपये रोजगार सहज कमवू शकते!आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवू शकणाऱ्या या अगरबत्ती यंत्रांच्या संशोधनामुळे परेशला भारताच्या राष्ट्रपतींनीही नुकतंच गौरवलं आहे. - प्रतिनिधी