शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Innovation Scholars 4 : जंगलातला सुगंध

By admin | Updated: March 14, 2017 16:13 IST

अगरबत्ती यंत्रांनी आदिवासी बायका होताहेत स्वयंनिर्भर!

 देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित.पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख..दुर्गम आदिवासी आणि अतिशय ग्रामीण भागातील लोकांसाठी चरितार्थाचं मुख्य साधन काय?यातील बहुतेकांकडे ना स्वत:ची जमीन ना त्यांच्याकडे कुठलं स्किल, ना रोजगारासाठी तिथे कोणता उद्योगधंदा.मजुरी आणि आसपासच्या जंगलावरच त्यांना प्रामुख्यानं अवलंबून राहावं लागतं.आदिवासींच्या चरितार्थात बांबूचा वाटा खूप मोठा. या बांबूनं आदिवासी बांधवांच्या आयुष्यात थोडीफार स्थिरताच आणली नाही, तर त्यांच्या पोटापाण्याचाही तो प्रमुख आधार ठरला. वर्षानुवर्षापासून या बांबूनंच त्यांना तारलं आहे. आजही बांबूनंच त्यांचं ‘पालकत्व’ घेतलं आहे.बांबूपासून टोपल्या विणणं, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, बांबूच्या काड्यांपासून अगरबत्त्या तयार करणं.. यासारख्या छोट्या-मोठ्या कामांतून आपल्या पोटाची खळगी ते भरतात. मात्र यातलं कुठलंही काम करण्यासाठी त्यांना हातातल्या सुरी, कोयता किंवा चाकूसारख्या धारदार हत्यारावर आणि आपल्या शारीरिक श्रमांच्या क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं.सुरी, कोयत्यानंच बांबू तासणं, त्याच्या लांबच लांब कामट्या काढणं आणि मग हव्या त्या आकारात त्यांचे तुकडे करणं, या साऱ्या कामांत नुसते शारीरिक श्रमच नाहीत, तर धोकाही खूप मोठा आहे.सुरी, कोयते वापरताना थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्यामुळे हात, बोट कापलं जाणं, जखमी होण्याचे प्रकारही आदिवासींसीठी नित्याचे आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटीही त्यामुळे बऱ्याचदा हिरावली गेली आहे.बांबूपासून अगरबत्त्या किंवा त्यासाठीचा कच्चा माल, म्हणजे कामट्या, काड्या तयार करण्याचा उद्योग आदिवासी, ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. विशेषत: घरातला महिला वर्ग आणि थोड्या कळत्या वयातल्या मुलांचा तर यात खूपच मोठा हातभार आहे. रोजचा घरखर्च चालवण्यात आणि त्याचबरोबर महिलांना स्वयंनिर्भर बनवण्यात या उद्योगाचं योगदान आदिवासी भागासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.मात्र बांबू आणण्यापासून ते अगरबत्ती, इतर वस्तू तयार करण्यापर्यंतचे कष्ट अपरंपार आहेत. आदिवासी लोकांचे हे कष्ट कमी करण्यासाठी एका तरुणानं पुढाकार घेतला.त्याचं नाव परेश पांचाल.गुजरातेतल्या अहमदाबादचा हा तरुण. अगरबत्त्यांची मशिन्स तयार करण्याचा त्यांचा पिढीजात उद्योग आहे. या व्यवसायात त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. अर्थात या उद्योगातही आता मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणही झालेलं आहे. सेमी अ‍ॅटोमॅटिक मशिनपासून ते फूल्ल अ‍ॅटोमॅटिक मशिनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण अशा यंत्रांची किंमत जास्त आणि वजेची गरजही मोठी.फावल्या वेळात हे काम करणाऱ्या गरीब आदिवासी महिलांसाठी यातला कोणताच पर्याय परवडणारा नाही आणि घरातल्या घरात, हातावर काम करणाऱ्या या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणंही शक्य नाही. अगरबत्त्यांसाठी मशिन्स तयार करण्याचा घरचा उद्योग होताच. परेशनं मग आणखी अभ्यास केला, आदिवासी, ग्रामीण भागातल्या अडचणी जाणून घेतल्या. विजेची उपलब्धता ही तिथली आणखी एक प्रमुख अडचण. परेशनं या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि साधी, सोपी, घरच्या घरी चालवता येऊ शकतील, कमी जागेत बसू शकतील अशी सुटसुटीत काही यंत्रं तयार केली. या यंत्रांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रं असली तरीही हीदेखील हातानंच चालवावी लागतात. विजेची किंवा कोणत्याही ऊर्जेची गरज या यंत्रांना लागत नाही.आदिवासींची शक्ती आणि वेळ तर या यंत्रांनी वाचवलाच, पण त्यांचा धोकाही कमी केला. तुलनेनं स्वस्त असलेल्या या यंत्रांनी आदिवासी भागात एक मोठाच रोजगार उपलब्ध करुन देण्याची किमया केली.या यंत्राच्या सहाय्याने हातात सुरे, कोयते घेण्याची आदिवासींची गरजच संपली. यंत्रात बांबू टाकल्यावर आपल्या पाहिजे त्या आकाराच्या, जाडीच्या आणि लांबीच्या कामट्या या यंत्रातून तयार होऊ शकतात. बांबूच्या ठराविक जाडीच्या कामट्या अगोदर तयार करायच्या आणि नंतर त्याच मशीनच्या साहाय्याने नेमक्या उंचीच्या काड्या तयार करायच्या! यामुळे आदिवासींचे श्रम खूप मोठ्या प्रमाणात वाचले, त्यात अधिक कौशल्यही आले. तयार झालेल्या या काड्या ‘अगरबत्ती रोलिंग मशीन’मध्ये टाकायच्या. त्यातला अगरबत्ती मसाला आपोआप त्या काड्यांना लागतो. झाली सुगंधित अगरबत्ती तयार!हीच यंत्रं त्यांना त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठीही वापरता येऊ शकतात.या यंत्रांच्या सहाय्यानं प्रत्येक आदिवासी महिला दिवसाला किमान शंभर ते दिडशे रुपये रोजगार सहज कमवू शकते!आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवू शकणाऱ्या या अगरबत्ती यंत्रांच्या संशोधनामुळे परेशला भारताच्या राष्ट्रपतींनीही नुकतंच गौरवलं आहे. - प्रतिनिधी