शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

जगा पोटभर....आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 02:00 IST

आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार? आणि कशा लढणार आपण स्वत:साठी निवडलेल्या लढाया? आणि जिंकणार कशा?

You don't need a silver fork to eat good food."हे वाक्य वाचून कुणाला तरी पटकन वाटेल की, काय हे यांना खायचं येऊन पडलंय. प्रेरणादायी विचारांच्या रांगेत खाणंपिणं कुठं येतं का?- येतं!आणि हेच आपल्याला कळत नाही, आणि आपलं दिवसाचं गणित दिवसेंदिवस बिघडत जातं.आपलं स्वत:वर नसतंच प्रेम. पण खाण्यावरही नसतं आणि भुकेवरही!पोटात भुकेचा यज्ञ भडभडून पेटलेला असताना आपण त्यात आहुती कसली देतो?चहाची.कुरकुरे, वेफर्स किंवा वडापावची!आणि त्यानं भूक तर भागत नाहीच, पोट बिघडतं आणि त्याच्या रेट्यानं मनही भिरभिरायला लागतं हे आपल्या लक्षातही येत नाही..आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपल्या शरीरानं आपल्याशी असहकार पुकारलेला असतो..शरीराचे अनेक विकार हे पोट साफ नसल्यानं होतात..आणि पोट साफ होत नाही कारण अनेकदा आपण खातच नाही किंवा योग्य पदार्थ, योग्य प्रमाणात, योग्यवेळी, नियमित खात नाही..एक साधं उदाहरण घ्या..आपण सकाळी उशिरा उठतो, कसंबसं आवरतो, घोटभर चहा पितो आणि जातो कॉलेजला..पोट रिकामंच...मग चिडचिड होते. वर्गात लक्ष लागत नाही. भांडणं होतात.. मूड जातो. उदास वाटतो..याला कारण काय तर नास्ता न करणं..त्यानं रक्तातली साखर कमी होते आणि आपला मूड बिघडतंच जातो..पोटभर नास्ता करून, मस्त शांतचित्तानं कॉलेजला जा..तो दिवस वेगळा वाटेल..गोष्टी छोट्याच असतात. पण आपण त्या कॉम्प्लिकेट करतो..बिघडवून टाकतो..आणि मग त्याचा टोल आपल्या शरीराला भरावा लागतो..भुके पेट भजन नहीं होता,ते सैन्य पायावर नाही, पोटावर चालतंया वाक्यापासूनची फिलॉसॉफी समजून घ्या. आणि मग स्वत:ला विचारा की, आपण काय खातोय..आपल्याला आउटडेटेड वाटते आपली पारंपरिक बाजरीची, ज्वारीची, कळण्याची नि नागलीची भाकरी..नको वाटतात पातळ पालेभाज्या, डाळीसाळी, उसळींचं तर वावडंच..कोशिंबिरी आणि आमट्या तर फारच मागास..जे पदार्थ आईनं मायेनं शिजवले, त्या पदार्थात आपण शंभर चुका काढतो आणि म्हणतो हे काय जुनाट करता तुम्ही..मग आपण निवडतो काय?पॅक्ड फूड. प्रोसेस्ड फूड. दोन मिन्टात तयार होणारं जंक फूड.रात्रीची पोळी आपल्याला शिळी वाटते आणि सहा सहा महिने पॅक्ड करून ठेवलेलं अन्न चटकदार लागतं, यात किती विरोधाभास आहे?एरव्ही जिथंतिथं लॉजिक शोधतो आपण?आणि उसळी, शेवगा आणि सोयाबीन नाकारत प्रोटीन पावडरचे भपके मारतो..विचार करून पहा.नक्की चुकतंय कुठं आपलं?आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोेषण होणार?आणि कशा लढणार आपण स्वत:साठी निवडलेल्या लढाया?आणि जिंकणार कशा?या दिवाळीत घरच्या फराळावर मस्त ताव मारा..खा बिनधास्त चकल्या-करंज्या आणि जगा पोटभर..उगीच कशाला करायची स्वत:ची उपासमार?नाही का..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017