शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

घरचे म्हणतात म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 14:01 IST

आयआयटीची स्वप्नं डोळ्यात ठेऊन सीईटीच्या क्लासेससाठी दहावीनंतर आता फक्त मुलंच पुण्यात येत नाहीत, त्यांचे आईबाबाही येतात. रजा घेतात, नोकºया सोडतात आणि मुलाला हवी ती ब्रॅँच, हवं ते कॉलेज मिळावं म्हणून जिवाचं रान करतात..

‘ढ’ ची आई : अहो ‘ट’ ची आई, आमचा हा काल सांगत होता, ‘ट’ ने आयआयटीची ट्यूशन लावल्ये म्हणून.‘ट’ ची आई : हो. म्हणजे आत्ता आयआयटी असं नाही. आत्ता आठवीचंच शिकवणार; फक्त सायन्स, मॅथ्स जरा डीटेलमध्ये. पुढे बेसिक कन्सेप्ट्स खूप इंपॉर्टण्ट ठरतात ना म्हणून आत्तापासूनच जरा सुरुवात.‘ढ’ ची आई : आमच्या पोराचं काय अजून काही कळत नाहीये. सध्या तरी सकाळी स्विमिंग आणि संध्याकाळी फुटबॉल!‘ट’ ची आई : ते ठीके, पण पुढं काय करणार ते ठरवा..एकूण ‘ढ’ चं काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात. ‘ट’ च्या पालकांच्या ओळखीमधल्या एकानं त्यांचा मुलगा दहावीमध्ये इंजिनिअर होणार असं ठरवलं आणि त्यामुळे ‘ट’ च्या पालकांनी इयत्ता आठवीमध्येच ‘ट’ इंजिनिअर होणार हे ठरवलं.डोळे-कान उघडून आजूबाजूला पाहिलं तर अक्षरांच्या ऐवजी निरनिराळी नावं घेऊन साधारण असाच संवाद ऐकायला मिळतो. पालकच ठरवून टाकतात, मेरा बेटा इंजिनिअर बनेगा! काही हरहुन्नरी पालक तर आपला मुलगा तासन्तास लॅपटॉपसमोरून हलत नाही म्हणून त्याला कंप्युटर इंजिनिअर बनवायच्या मागे लागतात. काही आपल्या मुलाला १५ विदेशी गाड्यांची नावं माहीत आहेत यानं सुखावून त्याला मेकॅनिकल इंजिनिअर बनवण्याचं स्वप्न बघायला लागतात. बाकी बरेचसे, ब्रॅँचचं नंतर बघता येईल पण आधी इंजिनिअर व्हायचं म्हणून महागड्या क्लासेसच्या मागे लागतात.हे आहे महानगरांतलं आणि तिथून खाली सरकलेलं छोट्या शहरांतलं चित्र.जागतिकीकरणाचं वारं आलं आणि देशात अनेक बदल घडले. गेल्या जवळपास २६ वर्षांत शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. मात्र त्यासाठी करावा लागणारा खर्चही वाढला. स्वत:ला सिद्ध करायच्या संधी वाढल्या पण त्याचबरोबर स्पर्धा प्रचंड वाढली. हातात पैसा खेळू लागला पण विनियोगाचे मार्गदेखील वाढले. शहरांमध्ये नव्या नोकºया मिळू लागल्या, स्थलांतरं घडू लागली, शहरं गच्च भरून वाहू लागली. या सगळ्यात कुटुंबव्यवस्था बदलली. कुटुंबाचा आकार कमी होत नातेसंबंधांमध्ये आमूलाग्र बदल झाले. छोट्या कुटुंबामुळे मुलाच्या/मुलीच्या निर्णयांमधला पालकांचा सहभाग वाढला, अपेक्षा वाढल्या.त्यामुळे आपल्या मुलांना उत्तम इंजिनिअर बनवू असं म्हणत पालकांनी अनेक गोष्टी स्वत:वर ओढवूनही घेतल्या. त्यात अनेकांची विलक्षण फरफट होतेय. मुलांइतकंच किंवा त्याहून जास्त स्वत:ला अपडेट ठेवण्याचा रेटा आणि नोकरी-व्यवसायातले व्याप यांचे ताणही वाढलेले दिसतात. मात्र वेळप्रसंगी स्वत:चा नोकरीधंदा बाजूला ठेवून मुलांवर ‘फोकस’ करणारे पालक आजूबाजूला भेटतात.चैताली यंदा बारावीला जाईल. तिच्यासाठी तिची आई एक वर्ष रजा घेणार आहे. त्यांच्याशी बोललं तर त्या म्हणतात, ‘खरं तर अकरावीपासूनच रजेचं चालू होतं पण शक्य नाही झालं. यावेळी कसंही करून घेणार; म्हणजे घ्यावीच लागणार. हिला क्लासला सोडा-आणायला जा, वेळच्या वेळी खाणं-पिणं, सगळं बघायचं म्हणजे नोकरी करणं शक्यच नाही.’आता त्या चैतालीला इंजिनिअरिंगच्या क्लासला सोडून जवळच एका वाचनालयात विरंगुळा म्हणून वाचत बसतात. मग नंतर पुन्हा इथून दुसºया क्लासला. अशी अनेक उदाहरणं पुण्यात बघायला मिळाली.‘महत्त्वाचं वर्ष आहे त्यामुळे तेवढी अ‍ॅडजस्टमेंट करावी लागणारच की!’ - हे इथं अनेक पालकांचं पालुपद आहे.हेच मत सुमितच्या आईबाबांचं. ते मूळचे सांगलीचे. सुमितची नुकतीच दहावी झाली. आयआयटीचे क्लासेस एप्रिलमध्येच सुरू झाल्याने आई आणि तो या एप्रिलपासूनच पुण्यात राहायला आलेत. ‘इंजिनिअरिंगचं मार्गी लागेपर्यंत मी राहीन इथेच,’ असं त्याची आई म्हणाली. त्याचे अनेक मित्र पुण्यात आणि काही कोल्हापूरला दहावीनंतरच्या शिक्षणासाठी गेले आहेत. त्यातल्या अनेकांबरोबर त्यांचे पालकदेखील गेले आहेत. त्यामुळे मोठं शहर असो वा लहान; परिस्थिती थोड्याबहुत प्रमाणात सारखीच आहे. सगळ्यांनाच अशाप्रकारे पैसा आणि वेळ दोन्ही खर्च करणं शक्य होत नसलं तरी इंजिनिअरिंगसाठी शक्य ते सारं करण्याचा अट्टाहास मात्र आहेच.गेल्या काही वर्षांत, दरवर्षी लाखो मुलांचे आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांचे लोंढेच्या लोंढे या अभियांत्रिकी मांडवाखालून जात आहेत.अनेक पालकांशी तसेच मुलांशी बोलताना एक गोष्ट लक्षात येते. अलीकडे पालकांचा फार मोठ्ठा सहभाग अभियांत्रिकी शिक्षण आणि त्यातील शाखा निवडण्यामागे आहे. प्रथमेशचंही असंच झालं. त्याला अभ्यासात फारशी गती नव्हती. त्याच्या दादाने कंप्युटर इंजिनिअरिंग केलं. पुढे अभ्यासात त्याची मदत होईल या विचारानं प्रथमेशच्या घरच्यांनी त्याला कंप्युटर डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेऊन दिली. दुसरीकडे घरचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे अनेक पालक मुलांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायला लावतात असंही चित्र आहे.मात्र असंही दिसतं की अनेक पालकांना त्या शाखेची, त्यातील शिक्षणाची फारशी माहिती नसते. तशीच ती मुलांनाही नसते. सध्या इंजिनिअरिंग करत असणाºया आणि करू इच्छिणाºया काही मुलांना विचारलं की, आपण इंजिनिअर व्हायचं, अमुकच शाखेतून व्हायचं हा निर्णय कसा घेतला?उत्तरं काय मिळाली?‘यात स्कोप आहे’, ‘बाकीच्यांपेक्षा ‘स्टेबल’ फिल्ड आहे’, ‘इंजिनिअरिंग केल्यावर कुठला ना कुठला जॉब मिळतोच. पहिला थोडा स्ट्रगल असेल, पण नंतर ‘ग्रोथ’ चांगली आहे इथे.’त्यातही अनेकांनी ‘घरचे म्हणतात म्हणून’ असंही उत्तर दिलंच.आणि म्हणून मग आईबाबा म्हणतात ते करून आपलं चुकलंच असं अनेकदा रोहन आणि प्रथमेशसारखं अनेक मुलांना वाटतं. आज रोहनचं शिक्षण पूर्ण होऊन दोन वर्षं झालेली आहेत. तो बाबांबरोबर पूर्णवेळ घरचा व्यवसाय बघायला लागला इतकंच. प्रथमेशने डिप्लोमा, नंतर डिग्री केली. एक वर्ष कशीबशी नोकरी केली आणि आता मन रमत नाही म्हणून नोकरी सोडून हताशपणे बसलाय.‘माझ्या मनासारखं लाइफ जगण्याच्या लायनीवर आणायला माझी पाच वर्षं गेली. अजूनही स्ट्रगल चालू आहे. कदाचित आधी काही गोष्टी कळल्या असत्या तर आज एवढी वर्षं लागली नसती असं वाटतं..’ - आज एका जाहिरात कंपनीमध्ये ‘व्हिज्युअलायझर’ म्हणून काम करणारा नीरज सांगत होता. इंजिनिअरिंगच्या मांडवाखालून तोही गेलाय.तो म्हणतो, इंजिनिअरिंग करून आपण पस्तावलो. आपल्याला भलतंच करायचं होतं हे सांगणारे कितीजण आहेत आज. ‘पाचवी, सहावी, मग सातवी स्कॉलरशिप, मग आठवीपासून क्लास-शाळा-क्लासचं चक्र , नववी, दहावी बोर्ड, मार्कांची रेस, मग सायन्स, अकरावी, बारावी बोर्ड, क्लासेस, सीईटी क्लास आणि मग इंजिनिअरिंग! लहानपण म्हटलं की हेच, हे तुला भीतिदायक आणि निराशाजनक चित्र नाही वाटत?’निराशा, पालकांविषयी राग, पालकांनी पैसा खर्च करून केलेली वणवण आणि त्यातूनही सर्वांनाच मिळालेली अस्वस्थता असं हे एक भीषण चित्र आहे..आणि त्याच्या पायाशी आहे, पैसा-सुबत्ता-प्रतिष्ठा देणारं एकच स्वप्न..मेरा बेटा इंजिनिअर बनेगा !

१. पालकच ठरवतात अमुकला स्कोप आहे, तिकडं मुलांना पळवतात.२. पुण्यात सहकुटुंब स्थलांतर करणाºया पालकांचं प्रमाण वाढलं. आई नोकरी सोडते, मुलाला क्लासला घेऊन जाते. हवं तेवढे पैसे मोजते, कारण एकच इंजिनिअरिंग क्रॅक करायचं.३. अनेक मुलांना माहितीच नाही, आपण इंजिनिअरिंग का करतोय?४. आठवीपासूनच इंजिनिअरिंगच्या तयारीला वेग. प्रत्यक्षात अनेकांचं उत्तर एकच, घरचे म्हणतात म्हणून करतोय!