शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

लवचिक

By admin | Updated: November 27, 2014 21:51 IST

नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय.

विनोद बिडवाईक -
नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल.
फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय. लवचिकता म्हणजे काय तर पारंपरिक पद्धती न स्वीकारता समोर येणार्‍या बदलांना सामोरं जाण्याची वृत्ती.  वेगवेगळ्या  वृत्ती - प्रवृत्तींसोबत डील करतांना तुम्हाला तुमच्या स्वभावातही लवचिकता दाखवावी लागते. आणावी लागते. 
संस्थेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. टेक्नॉलॉजी बदलत असते, तिच्या वापराची, कामाची पद्धत बदलते. प्रॉडक्ट लाइन बदलावी लागते.  अशावेळेस काम करण्याची पद्धतही बदलावी लागते. त्यामुळेच नव्या संदर्भात नोकरी देताना उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व कितपत लवचिक आहे, तुम्ही किती वेगानं एखादी गोष्ट आत्मसात करू शकता हे आवर्जून तपासलं जातं. त्यानुसार एखादा प्रश्न विचारला जातो आणि तुमची मानसिक अवस्था जोखण्याचा प्रयत्न केला जातो.
बदल हा सृष्टीचा नियम आहे,  हे वाक्यं तर काय घासून गुळगुळीत झालं. पण माणसं सहजी बदलायला तयार नसतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हाच नाईलाजानं आपण बदल स्वीकारण्याचा, पचवण्याचा प्रयत्न करतो.
अन्यथा बदल म्हटलं की, अनेकजणांना त्रासच वाटतो. जिवावरच येतं. बदल न स्वीकारण्याची, बदल नाकारण्याचीच काही कारणं असतात. बदलण्याची, बदल करण्याचा आवश्यकता आहे याची माहितीच नसणं. हे एक मोठं कारण. उदाहरणार्थ,  उत्कृष्ट आणि यशस्वी ‘कस्टमर केअर’ प्रतिनिधी व्हायचं असेल, तर सर्व प्रथम बेसिक मॅनर्स आणि एटिकेट्सची आवश्यकता असते, पण अनेकांना हे माहितीच नसतं. त्यामुळे ते स्वत:त काही नवे मॅनर्स. एटीकेट्स रुजवतच नाही.
दुसरं म्हणजे बदलांसाठी आवश्यक ते कौशल्यच नसणं.  इंग्रजी ही सध्याची ज्ञानभाषा आहे. इंग्रजी बोलता येत नसेल तर कदाचित चांगली नोकरी मिळण्यात निश्‍चितच अडचणी येऊ शकतात. मग आपण इंग्रजी उत्तम शिकून घ्यावं. आवश्यक तेव्हा वापरावं. पण अनेकांची शिकण्याची तयारीच नसते. काहीजणांना आयुष्यात आपल्याला नेमकं काय कमवायचं आहे, हेच माहीत नसतं. तर काहींना बदल म्हटला की लगेच धोका वाटतो. रिस्क नकोच, आहे ते बरंय असंच कायम वाटत राहतं. त्यांना अपयशाचीच नाही तर यशाचीही भीतीच वाटते. अशी काही नेमकी कारणं असतात. नीट पाहिलं तर ही सारी बदल न स्वीकारण्याची कारणं मानसिक आहेत.  आपण बदललं पाहिजे हे ज्याला चटकन कळतं, जो वेळेत, स्वत:हून चांगले बदल स्वीकारतो तो पुढे जातो. मात्र अनेकजण बदलण्याची गरज जाणवत नाही, तोपर्यंत बदलतच नाहीत. नुस्तं मी बदलतो असं म्हणूनही चालत नाही. त्या बदलासाठी आवश्यक कौशल्य शिकावी लागतात. बदलानुसार होणारा खडखडाट पचवावा लागतो. 
मला सगळं येतं, माझ्या कामाची पद्धत बेस्ट असं ज्याला वाटतं, त्याचं नव्या जगात टिकणं अवघडच आहे. तेव्हा यापुढे एखाद्या ठिकाणी नोकरीला जाल, कामाविषयी, काम करण्याच्या वृत्तीविषयी प्रश्न विचारले गेले आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही तर त्याचा दोष मुलाखत घेणार्‍याला देऊ नका. आपण कुठे कमी पडलो आणि कुठे बदलण्याची गरज आहे, याचा विचार करा. 
बदलणं, लवचिक असणं म्हणजे आपण स्वत: नव्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, ते शिकावंच लागेल.