शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

लवचिक

By admin | Updated: November 27, 2014 21:51 IST

नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय.

विनोद बिडवाईक -
नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल.
फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय. लवचिकता म्हणजे काय तर पारंपरिक पद्धती न स्वीकारता समोर येणार्‍या बदलांना सामोरं जाण्याची वृत्ती.  वेगवेगळ्या  वृत्ती - प्रवृत्तींसोबत डील करतांना तुम्हाला तुमच्या स्वभावातही लवचिकता दाखवावी लागते. आणावी लागते. 
संस्थेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. टेक्नॉलॉजी बदलत असते, तिच्या वापराची, कामाची पद्धत बदलते. प्रॉडक्ट लाइन बदलावी लागते.  अशावेळेस काम करण्याची पद्धतही बदलावी लागते. त्यामुळेच नव्या संदर्भात नोकरी देताना उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व कितपत लवचिक आहे, तुम्ही किती वेगानं एखादी गोष्ट आत्मसात करू शकता हे आवर्जून तपासलं जातं. त्यानुसार एखादा प्रश्न विचारला जातो आणि तुमची मानसिक अवस्था जोखण्याचा प्रयत्न केला जातो.
बदल हा सृष्टीचा नियम आहे,  हे वाक्यं तर काय घासून गुळगुळीत झालं. पण माणसं सहजी बदलायला तयार नसतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हाच नाईलाजानं आपण बदल स्वीकारण्याचा, पचवण्याचा प्रयत्न करतो.
अन्यथा बदल म्हटलं की, अनेकजणांना त्रासच वाटतो. जिवावरच येतं. बदल न स्वीकारण्याची, बदल नाकारण्याचीच काही कारणं असतात. बदलण्याची, बदल करण्याचा आवश्यकता आहे याची माहितीच नसणं. हे एक मोठं कारण. उदाहरणार्थ,  उत्कृष्ट आणि यशस्वी ‘कस्टमर केअर’ प्रतिनिधी व्हायचं असेल, तर सर्व प्रथम बेसिक मॅनर्स आणि एटिकेट्सची आवश्यकता असते, पण अनेकांना हे माहितीच नसतं. त्यामुळे ते स्वत:त काही नवे मॅनर्स. एटीकेट्स रुजवतच नाही.
दुसरं म्हणजे बदलांसाठी आवश्यक ते कौशल्यच नसणं.  इंग्रजी ही सध्याची ज्ञानभाषा आहे. इंग्रजी बोलता येत नसेल तर कदाचित चांगली नोकरी मिळण्यात निश्‍चितच अडचणी येऊ शकतात. मग आपण इंग्रजी उत्तम शिकून घ्यावं. आवश्यक तेव्हा वापरावं. पण अनेकांची शिकण्याची तयारीच नसते. काहीजणांना आयुष्यात आपल्याला नेमकं काय कमवायचं आहे, हेच माहीत नसतं. तर काहींना बदल म्हटला की लगेच धोका वाटतो. रिस्क नकोच, आहे ते बरंय असंच कायम वाटत राहतं. त्यांना अपयशाचीच नाही तर यशाचीही भीतीच वाटते. अशी काही नेमकी कारणं असतात. नीट पाहिलं तर ही सारी बदल न स्वीकारण्याची कारणं मानसिक आहेत.  आपण बदललं पाहिजे हे ज्याला चटकन कळतं, जो वेळेत, स्वत:हून चांगले बदल स्वीकारतो तो पुढे जातो. मात्र अनेकजण बदलण्याची गरज जाणवत नाही, तोपर्यंत बदलतच नाहीत. नुस्तं मी बदलतो असं म्हणूनही चालत नाही. त्या बदलासाठी आवश्यक कौशल्य शिकावी लागतात. बदलानुसार होणारा खडखडाट पचवावा लागतो. 
मला सगळं येतं, माझ्या कामाची पद्धत बेस्ट असं ज्याला वाटतं, त्याचं नव्या जगात टिकणं अवघडच आहे. तेव्हा यापुढे एखाद्या ठिकाणी नोकरीला जाल, कामाविषयी, काम करण्याच्या वृत्तीविषयी प्रश्न विचारले गेले आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही तर त्याचा दोष मुलाखत घेणार्‍याला देऊ नका. आपण कुठे कमी पडलो आणि कुठे बदलण्याची गरज आहे, याचा विचार करा. 
बदलणं, लवचिक असणं म्हणजे आपण स्वत: नव्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, ते शिकावंच लागेल.