शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लवचिक

By admin | Updated: November 27, 2014 21:51 IST

नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय.

विनोद बिडवाईक -
नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल.
फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय. लवचिकता म्हणजे काय तर पारंपरिक पद्धती न स्वीकारता समोर येणार्‍या बदलांना सामोरं जाण्याची वृत्ती.  वेगवेगळ्या  वृत्ती - प्रवृत्तींसोबत डील करतांना तुम्हाला तुमच्या स्वभावातही लवचिकता दाखवावी लागते. आणावी लागते. 
संस्थेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. टेक्नॉलॉजी बदलत असते, तिच्या वापराची, कामाची पद्धत बदलते. प्रॉडक्ट लाइन बदलावी लागते.  अशावेळेस काम करण्याची पद्धतही बदलावी लागते. त्यामुळेच नव्या संदर्भात नोकरी देताना उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व कितपत लवचिक आहे, तुम्ही किती वेगानं एखादी गोष्ट आत्मसात करू शकता हे आवर्जून तपासलं जातं. त्यानुसार एखादा प्रश्न विचारला जातो आणि तुमची मानसिक अवस्था जोखण्याचा प्रयत्न केला जातो.
बदल हा सृष्टीचा नियम आहे,  हे वाक्यं तर काय घासून गुळगुळीत झालं. पण माणसं सहजी बदलायला तयार नसतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हाच नाईलाजानं आपण बदल स्वीकारण्याचा, पचवण्याचा प्रयत्न करतो.
अन्यथा बदल म्हटलं की, अनेकजणांना त्रासच वाटतो. जिवावरच येतं. बदल न स्वीकारण्याची, बदल नाकारण्याचीच काही कारणं असतात. बदलण्याची, बदल करण्याचा आवश्यकता आहे याची माहितीच नसणं. हे एक मोठं कारण. उदाहरणार्थ,  उत्कृष्ट आणि यशस्वी ‘कस्टमर केअर’ प्रतिनिधी व्हायचं असेल, तर सर्व प्रथम बेसिक मॅनर्स आणि एटिकेट्सची आवश्यकता असते, पण अनेकांना हे माहितीच नसतं. त्यामुळे ते स्वत:त काही नवे मॅनर्स. एटीकेट्स रुजवतच नाही.
दुसरं म्हणजे बदलांसाठी आवश्यक ते कौशल्यच नसणं.  इंग्रजी ही सध्याची ज्ञानभाषा आहे. इंग्रजी बोलता येत नसेल तर कदाचित चांगली नोकरी मिळण्यात निश्‍चितच अडचणी येऊ शकतात. मग आपण इंग्रजी उत्तम शिकून घ्यावं. आवश्यक तेव्हा वापरावं. पण अनेकांची शिकण्याची तयारीच नसते. काहीजणांना आयुष्यात आपल्याला नेमकं काय कमवायचं आहे, हेच माहीत नसतं. तर काहींना बदल म्हटला की लगेच धोका वाटतो. रिस्क नकोच, आहे ते बरंय असंच कायम वाटत राहतं. त्यांना अपयशाचीच नाही तर यशाचीही भीतीच वाटते. अशी काही नेमकी कारणं असतात. नीट पाहिलं तर ही सारी बदल न स्वीकारण्याची कारणं मानसिक आहेत.  आपण बदललं पाहिजे हे ज्याला चटकन कळतं, जो वेळेत, स्वत:हून चांगले बदल स्वीकारतो तो पुढे जातो. मात्र अनेकजण बदलण्याची गरज जाणवत नाही, तोपर्यंत बदलतच नाहीत. नुस्तं मी बदलतो असं म्हणूनही चालत नाही. त्या बदलासाठी आवश्यक कौशल्य शिकावी लागतात. बदलानुसार होणारा खडखडाट पचवावा लागतो. 
मला सगळं येतं, माझ्या कामाची पद्धत बेस्ट असं ज्याला वाटतं, त्याचं नव्या जगात टिकणं अवघडच आहे. तेव्हा यापुढे एखाद्या ठिकाणी नोकरीला जाल, कामाविषयी, काम करण्याच्या वृत्तीविषयी प्रश्न विचारले गेले आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही तर त्याचा दोष मुलाखत घेणार्‍याला देऊ नका. आपण कुठे कमी पडलो आणि कुठे बदलण्याची गरज आहे, याचा विचार करा. 
बदलणं, लवचिक असणं म्हणजे आपण स्वत: नव्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, ते शिकावंच लागेल.