शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

लवचिक

By admin | Updated: November 27, 2014 21:51 IST

नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय.

विनोद बिडवाईक -
नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल.
फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय. लवचिकता म्हणजे काय तर पारंपरिक पद्धती न स्वीकारता समोर येणार्‍या बदलांना सामोरं जाण्याची वृत्ती.  वेगवेगळ्या  वृत्ती - प्रवृत्तींसोबत डील करतांना तुम्हाला तुमच्या स्वभावातही लवचिकता दाखवावी लागते. आणावी लागते. 
संस्थेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. टेक्नॉलॉजी बदलत असते, तिच्या वापराची, कामाची पद्धत बदलते. प्रॉडक्ट लाइन बदलावी लागते.  अशावेळेस काम करण्याची पद्धतही बदलावी लागते. त्यामुळेच नव्या संदर्भात नोकरी देताना उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व कितपत लवचिक आहे, तुम्ही किती वेगानं एखादी गोष्ट आत्मसात करू शकता हे आवर्जून तपासलं जातं. त्यानुसार एखादा प्रश्न विचारला जातो आणि तुमची मानसिक अवस्था जोखण्याचा प्रयत्न केला जातो.
बदल हा सृष्टीचा नियम आहे,  हे वाक्यं तर काय घासून गुळगुळीत झालं. पण माणसं सहजी बदलायला तयार नसतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हाच नाईलाजानं आपण बदल स्वीकारण्याचा, पचवण्याचा प्रयत्न करतो.
अन्यथा बदल म्हटलं की, अनेकजणांना त्रासच वाटतो. जिवावरच येतं. बदल न स्वीकारण्याची, बदल नाकारण्याचीच काही कारणं असतात. बदलण्याची, बदल करण्याचा आवश्यकता आहे याची माहितीच नसणं. हे एक मोठं कारण. उदाहरणार्थ,  उत्कृष्ट आणि यशस्वी ‘कस्टमर केअर’ प्रतिनिधी व्हायचं असेल, तर सर्व प्रथम बेसिक मॅनर्स आणि एटिकेट्सची आवश्यकता असते, पण अनेकांना हे माहितीच नसतं. त्यामुळे ते स्वत:त काही नवे मॅनर्स. एटीकेट्स रुजवतच नाही.
दुसरं म्हणजे बदलांसाठी आवश्यक ते कौशल्यच नसणं.  इंग्रजी ही सध्याची ज्ञानभाषा आहे. इंग्रजी बोलता येत नसेल तर कदाचित चांगली नोकरी मिळण्यात निश्‍चितच अडचणी येऊ शकतात. मग आपण इंग्रजी उत्तम शिकून घ्यावं. आवश्यक तेव्हा वापरावं. पण अनेकांची शिकण्याची तयारीच नसते. काहीजणांना आयुष्यात आपल्याला नेमकं काय कमवायचं आहे, हेच माहीत नसतं. तर काहींना बदल म्हटला की लगेच धोका वाटतो. रिस्क नकोच, आहे ते बरंय असंच कायम वाटत राहतं. त्यांना अपयशाचीच नाही तर यशाचीही भीतीच वाटते. अशी काही नेमकी कारणं असतात. नीट पाहिलं तर ही सारी बदल न स्वीकारण्याची कारणं मानसिक आहेत.  आपण बदललं पाहिजे हे ज्याला चटकन कळतं, जो वेळेत, स्वत:हून चांगले बदल स्वीकारतो तो पुढे जातो. मात्र अनेकजण बदलण्याची गरज जाणवत नाही, तोपर्यंत बदलतच नाहीत. नुस्तं मी बदलतो असं म्हणूनही चालत नाही. त्या बदलासाठी आवश्यक कौशल्य शिकावी लागतात. बदलानुसार होणारा खडखडाट पचवावा लागतो. 
मला सगळं येतं, माझ्या कामाची पद्धत बेस्ट असं ज्याला वाटतं, त्याचं नव्या जगात टिकणं अवघडच आहे. तेव्हा यापुढे एखाद्या ठिकाणी नोकरीला जाल, कामाविषयी, काम करण्याच्या वृत्तीविषयी प्रश्न विचारले गेले आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही तर त्याचा दोष मुलाखत घेणार्‍याला देऊ नका. आपण कुठे कमी पडलो आणि कुठे बदलण्याची गरज आहे, याचा विचार करा. 
बदलणं, लवचिक असणं म्हणजे आपण स्वत: नव्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, ते शिकावंच लागेल.