शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शिक्षक झालेले इंजिनिअर

By admin | Updated: February 19, 2016 15:22 IST

बीई झालेला इंजिनिअर डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवतो आणि एमई झालेला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. पण कमी पगारात जेमतेम नोकरीला चिकटत हे इंजिनिअर्स जगतात कसे, कुणास ठाऊक?

 मला चांगलं आठवतं इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना केजमधल्या एका डिप्लोमा कॉलेजमध्ये जागा असल्याचं सांगत  आमच्या सरांनी अर्ज करायला सांगितला होता. पण वर्गात फार काही कुणी शिक्षक व्हायला उत्सुक नव्हतं. 

इंजिनिअर झाल्यावर पुण्यात नोकरी मिळेनाशी झाली की कुठं कुठं शिक्षक व्हायचं ठरवतात ते मजबूर असतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे मी अर्ज करणार म्हटल्यावर अनेकांनी माङया निर्णयाला मुर्खपणाच म्हटलं. 
 इंजिनिअरिंग करण्यासाठी आपण जी भरमसाठ फी भरत असतो ती परत कमवायची असेल तर शिक्षक होऊन कसं चालेल? दुसरं म्हणजे आपण इंजिनिअरिंग करून शिक्षक झालो हे सांगायची अनेकांना लाज वाटत असते आणि सर्वात शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं असं की जे आपल्यालाच नीट कळलं नाही ते दुस:यांना काय शिकवणार, अशी भीतीही असते. त्याचबरोबर आपण आपल्या शिक्षकांना कधी आदर दिलेला नसतो तशीच वागणूक आपल्याला मिळाली, तर या प्रश्नांनी घाबरून सहजासहजी कुणी शिक्षक होत नसतो. 
त्यात अनेकांना आपल्या शिक्षणाचा(?) उपयोग देशाच्या विकासासाठी करायचा असतो. त्यासाठी ते पुणो किंवा मुंबई वगैरे शहरात जातात. आणि मग ग्रामीण भागातल्या कॉलेजात उरलेले नाईलाजानं शिक्षक होतात.  आणि त्यांच्या समस्यांकडे कुणी पाहत नाही. अशाच काही मला जाणवलेल्या समस्या मांडतो आहे.
सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तुम्हाला या क्षेत्नात हवा तसा पैसा मिळत नाही. अनेक संस्था ज्ञान दान वगैरे दिखावा करतात. पण प्रत्यक्षात शिक्षक म्हणून नियुक्ती करताना कमी पैशांत राबणा:या, अल्पकाळ टिकणा:या मुलांना आणि शक्यतो तर मुलींनाच प्राधान्य मिळते. मुलींची लग्न झाली की, त्या मोठय़ा शहरात जातात. त्यामुळे या तात्पुरत्या असलेल्या नोकरीकडून खूप काही मिळेल अशी त्यांची अपेक्षा नसते. ते संस्थाचालकांच्या पथ्यावर पडतं.
त्यात गल्लोगल्ली इंजिनिअरिंग कॉलेज. संस्थांच्या संख्येत वाढ झाली पण तेवढी विद्यार्थीसंख्या न वाढल्याने आणि आधीच्यांना नोक:या न मिळाल्यामुळे; कॉलेजमध्ये प्रवेश कमी होताहेत. दुसरीकडे इंजिनिअरिंग झालेल्या मुलांना/मुलींना नोकरी नसल्यामुळे त्यांना शिक्षक व्हावं असं वाटतं. परिणाम म्हणून नोकरी करण्यासाठी कॉलेज भरपूर आहेत पण त्यात विद्यार्थी नाहीत आणि याचा परिणाम शिक्षकांच्या पगारावर होतो.
बीई झालेला इंजिनिअर डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवतो आणि एमई झालेला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. साहजिकच डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवणा:यांना पगार कमी असतो. तो वाढवण्यासाठी बरेचजण एमई करतात. म्हणजे तुटपुंज्या पगारातून काही लाख रुपये खर्चून ती डिग्री मिळवतात. म्हणजे हा शिक्षक एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे शिक्षक अशा दोन भूमिका निभावत असतो. यातून मग फक्त परीक्षेपुरतं कॉलेज करणं आणि आयते प्रोजेक्ट आणणं वगैरे सगळं करावंच लागतं. 
त्यात  घरचे/ओळखीचे/ मित्रही ‘स्पर्धा परीक्षा दे,’ असा आग्रह करू लागतात. मग नवीन जागा निघालेल्या जाहिराती वाचनं आणि डी.डी. भरून परीक्षा देत राहणं हा एक नित्याचा उद्योग होऊन बसतो.
या सा:यात कॉलेजच्या नफ्याचं आणि तुमच्या पगाराचं त्नांगड तुमच्याच गळ्यात कधी पडतं तुम्हाला ही कळत नाही.
मुलांचे अॅडमिशन झाले तर जास्त नफा आणि जास्त नफा मिळाला तर तुमचे पगार जास्त इतकं सोपं गणित मग तुम्हाला कॉलेज चालवणा:यांकडून समजावलं जातं. विद्यार्थी ग्राहक होतो आणि आपण दुकानदार. ‘विद्या दान श्रेष्ठ दान’ या पाटय़ा आपण रोज वाचत असतो; पण आपल्यालाच कळत नसतं आपण कुठं चुकतोय? 
बरं एवढं सगळं होत असताना तुमच्या पगाराचे खरे आकडे आणि हातात पडणारा पगार यात बरीच तफावत असते. ती मान्य करण्याचा नाईलाज असतोच.
अशा प्रकारे शिक्षकच इतका असहाय्य आणि हतबल झाल्यामुळे शिक्षणाचा दर्जा न विचारलेलाच बरा. मात्र सध्या तरुण शिक्षकांच्या या समस्यांकडे कुणी लक्ष देतंय असं वाटत नाही.
 
 
- उल्हास रामदासी
अंबाजोगाई