शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

तुम्हालाही कोरोना फोबिया झाला आहे का ? भीती  वाटतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 09:43 IST

कोरोना कोंडीच्या काळात आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेऊन, जगणं अधिक सुकर आणि आनंदी करता येईल का? या काळात काही कृतिशील वर्तन होईल का यासाठीचा हा विशेष संवाद.

ठळक मुद्देजे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया

- डॉ.हमीद दाभोलकर , मनोविकार तज्ज्ञ

 1.कोरोना फोबिया असा काही प्रकार तरुणांमध्ये दिसतोय? म्हणजे मला कोरोना झालाय असं वाटणं. घरातल्यांना होईल का अशी काळजी करणं? त्यावर काय उपाय असू शकतात? 

-  एखादा साथीचा रोग मोठय़ा प्रमाणात पसरतो तेव्हा अशी भीती साहजिक आहे. फोबिया ही जास्त चिंतेतून निर्माण होणारी गोष्ट आहे. ज्या माणसांना मुळातच तब्येतीची जरा जास्तच चिंता करण्याची सवय असते, शरीरात घडणा:या छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे खूप लक्ष देण्याचा स्वभाव असतो, अशांमध्ये ही समस्या दिसण्याची शक्यता जास्त असते. पुन्हा यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अगदी काहीच लक्षण नसताना आपल्याला संसर्ग झालाय असं वाटणं आणि दुस:या प्रकारात आपल्याला झालेला साधा सर्दी-खोकलाही कोरोनाशीच संबंधित आहे असं वाटणं. त्यामुळे मन सैरभैर होऊ शकतं. आम्ही  मनोबल ही जी हेल्पलाइन चालवतो, त्याच्यावर सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावच्या एका मुलाचा फोन आला. त्याच्याशी झालेल्या संवादानुसार त्याला तीव्र भीती वाटत होती. तो इतका अस्वस्थ झाला होता, की त्याला घरातून निघून जावंसं वाटत होतं. काही औषधं आणि समुपदेशन यातून त्याला बरं वाटू लागलं. त्यामुळे कुणाला भीती वाटत असेल तर त्याची चेष्टा न करता, शांतपणो कुणातरी जाणकाराशी बोलणं गरजेचं आहे. हे अनेकदा आजूबाजूच्या कुटुंब आणि मित्नमंडळींना दिसतं, की या व्यक्तीचा स्वभावच जास्त चिंता करण्याचा आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने अशावेळी आसपासच्या लोकांचा सल्ला ऐकलेला बरा असतो. त्यातूनही अस्वस्थता कायम असेल तर डॉक्टर आणि समुपदेशकाची मदत घेतली पाहिजे. आपण हेसुद्धा समजून घेतलं पाहिजे, की तरु णांमध्ये जवळजवळ 95 टक्के प्रमाण हे संसर्गातून पूर्ण बरं होऊन बाहेर निघण्याचं आहे. बहुतांश वेळा अर्धवट माहितीमुळे हे सगळं भीतीचं वातावरण उद्भवतं. 

2) सतत सक्तीनं घरी बसून राहण्यातून अनेकांची चिडचिड, घुसमट होतेय. उदास वाटतं आहे, त्यावर कशी मात करता येईल?

- परिस्थिती विपरीत आहे हे खरं असलं तरी आपल्याला मार्ग शोधावेच लागतील. त्यासाठी आज जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विविध संस्था आणि शासनाच्या हेल्पलाइन्स उपलब्ध आहेत. तरु णांनी कसलाही संकोच न बाळगता अशा हेल्पलाइन्सची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रसंगांकडे, परिस्थितीकडे आपण काय नजरेने बघतो यावर सगळ्या गोष्टी ठरतात. चिडचिड, राग हे कशामुळे होतं, तर हे माङयाच वाटय़ाला का आलं? त्या गोष्टीकडे संकट म्हणून न पाहता आपलं व्यक्तिमत्त्व अधिक कणखर बनवण्याची संधी म्हणून त्याचा उपयोग करता येईल. 

आपल्याला आयुष्याच्या या टप्प्यावर हा एक असा काळ आलाय ज्याला आपल्यासकट आसपासची सगळीच माणसं सामोरी जातायेत. पण पुन्हा हे काही कायमस्वरूपी नाही. कोरोनामुळे आपल्याहून जास्त भरडल्या गेलेल्या देशांमध्ये आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते आहे. ते आपापल्या परीने सुटकेचे, बचावाचे मार्ग शोधताहेत. त्यामुळे आपल्याला काय आवडतं याचा विचार करून, छोटी का होईना छोटी कृती करणं गरजेचं आहे.

लॉकडाउनच्या या काळात असाही विचार करता येईल का, की भारतासह जगभरात गेल्या काही शतकांत असे अनेक नेते होऊन गेले ज्यांनी आपल्या आयुष्याचा वर्षानुवर्षाचा काळ तुरुंगात घालवला. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशी अनेक नावं डोळ्यासमोर सहज येतात. त्यांनी तो काळ कितीतरी प्रभावीपणो लेखन-वाचन-चिंतन यासाठी वापरला. आपण तर अगदीच तुरुंगात नाही, आपापल्या घरात आहोत. शक्य त्या सोईसुविधा उपभोगतो आहोत. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी वेळेअभावी राहून जातात. त्या करायला आता कितीतरी वेळ आहे. पुन्हा तंत्नज्ञानानं उपलब्ध करून दिलेली माध्यमं आहेत. एखादी कला किंवा भाषा शिकायची असेल तर इंटरनेटवर त्यासाठी सगळं एका क्लिकवर मिळतं. भारतात तरुणांनी घरातल्या कामात मदत करण्याची गोष्ट जवळपास नगण्य आहे. ती संधी तरु ण या काळात घेऊ शकतात. स्वयंपाक शिकू शकतात. काहीतरी नवं केल्याचा आनंद आणि स्वावलंबन दोन्हींना चालना देणारी ही गोष्ट असेल, नाही का? 

3) मन:स्वास्थ्य राखण्याच्या दृष्टीने काय ऐकता, वाचता, पाहता येईल?

- एकच एक गोष्ट सगळ्यांना लागू पडणार नाही. त्यामुळे हमखास उपाय काही मी प्रीस्क्र ाइब करणार नाही. आपापला वेळ ज्यात आनंदात जाऊ शकतो त्याचा शोध आपणच घेणं महत्त्वाचं. तुमची अस्वस्थता, चिंता दूर होऊन समाधान मिळेल असं काही जरा शोधलं,  स्वत:ला चाचपलं तर ते जरूर सापडेल. कुठलीही लहानशी गोष्ट असू शकते, जी तुम्हाला प्रसन्न करते. स्वत:शी आनंदी राहायला शिकवते. वाचणं, गाणं, एखादं वाद्य वाजवणं, काहीही. याच काळात नाही तर एरवीही अशा गोष्टींची सोबत तुम्हाला असली पाहिजे.

4) तरुणांचं घरच्यांशी पटत नाही, वाद होतात, अबोले आहेत, अशा वेळी काय करायचं?

एकमेकांशी सुसंवाद नसताना घरच्यांसोबत सक्तीनं एकत्न राहणं हे मात्न तरु णांसाठी खरंच अडचणीचं ठरू शकतं. एकमेकांच्या स्वभावाचे बोचणारे पैलू, अस्वस्थता, राग अनेक नात्यांत असूच शकतात. मात्न याच्याकडे दोन्ही पद्धतीने पाहता येईल. एक, आपण भरपूर प्रयत्न केले आणि मनातल्या गाठी सुटण्याच्या काही शक्यता दिसत नसतील तर स्वीकार करून एकमेकांना न दुखावता तेवढय़ापुरतं सोबत राहता येईल, ती वेळ निभावून नेता येईल. कारण ही सगळ्यांसाठीच या ना त्या प्रकारे आव्हानाची परिस्थिती आहे. अशावेळी आपण आणखीनच वाद करत, लहानसहान बाबी चिघळवत राहिलो तर कुणालाच फायदा नाही. त्यातून सगळ्याच यंत्नणोचं संतुलन ढासळू शकतं. दुसरा मार्ग असा असू शकतो, की याकडे संधी म्हणूनही बघता येतं. मॅरेज थेरपीच्या तत्त्वांपैकी एक असं आहे, की ज्या जोडप्याचं आपसात पटत नाही त्या जोडप्याला काही ठरावीक काळासाठी एकत्न राहायला सांगितलं जायचं. पूर्वी ही पद्धत होती. नात्यात टोकाचे मतभेद, हिंसा शोषण असेल तर याचा उपयोग नाही. पण इतर वेळी अशा प्रयोगातून अनेकदा एकमेकांच्या चांगल्या बाजूही लक्षात येऊ शकतात. कुटुंबातही संवादातली दरी सांधण्यासाठी हा काळ वापरता येऊ शकतो. नीट पाहिलं तर हा काळ हेसुद्धा सांगतोय, की आयुष्य किती क्षणभंगूर आहे. त्यादृष्टीने आजूबाजूचं वास्तव पाहिलं तर लहानलहान रु सवे, मानापमान मनात धरून बसण्याची निर्थकता लगेच लक्षात येईल. जगताना आपण अनेकदा लहान गोष्टींना गरजेहून जास्त  झूम-इन  करतो. त्यातून गोष्टींचा नको तितका बाऊ करायला लागतो. कोरोनानं आपल्याला जगण्यातच झूम आउट करायला शिकवलंय..

5) स्क्रिन टाइम फार वाढला हे सगळ्यांना कळतं; पण त्यावर उत्तर काय?

याचं असं आहे, की इंटरनेट आणि त्याचा वापर हे दुधारी शस्र असतं. प्रत्येकाने आपापल्या प्राथमिकता ठरवून स्वत:ला कसा, किती वापर करायचा याबाबत शिस्त लावून घेतली पाहिजे. आपण सोशल मीडिया चालवतो की आपला ताबा घेत तो सोशल मीडियाच आपल्याला चालवत नाही ना हे सतत प्रत्येक युजरनं स्वत:ला विचारलं पाहिजे. आनंदाच्या, मन रमवण्याच्या इतरही खूप गोष्टी सापडतील, त्या आजमावल्या पाहिजेत. सोशल मीडिया वापरताना तर फोबोसारख्या सिंड्रोमपासून स्वत:ला वाचवावं. डेटिंग साइट्स असो, गेमिंग असो की पॉर्न, कशावरही सरसकट बंदी घालून कधी प्रश्न सुटलेला नाही. आपलं शोषण होत नाही, आणि आपण कुणाचं शोषण करत नाही या दोन गोष्टींची खात्नी करून घ्यावी. पॉर्नच्या आहारी जात नाही ना, याबाबत सावध असलं पाहिजे. 

6) नक्की काय केलं तर डोकं शांत राहील? 

जे टाळणो अशक्य दे शक्ती दे सहायाजे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया या कवितेच्या ओळी प्रत्येकानं आपल्या मनाला सांगत राहाव्यात अशा. ही भाविनक, बौद्धिक क्षमता आपण मिळवली पाहिजे. इतर दैनंदिन जगण्यातल्या गोष्टी सांगायच्या तर नीट पौष्टिक खाणं, व्यायाम, योग्य वेळी पुरेशी झोप घेणं हे पाळलं पाहिजे. घरकाम आणि लहानलहान गोष्टींतून आनंद मिळवणं अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. मित्न-मैत्रिणींशी बोलून अस्वस्थता कमी होऊ शकते. अशा हक्काच्या जागा निर्माण करून जपल्या पाहिजेत.  

 

मुलाखत- शर्मिष्ठा भोसले