शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रंग जे बोलके असतात...

By admin | Published: March 15, 2017 6:56 PM

रंगपंचमी. रंगांची उधळण. एरव्हीही ती आपल्या आयुष्यात होतच असते, फक्त त्या रंगांकडे आपलं लक्ष असतंच असं नाही...

 - मानसी जोशी

रंगपंचमी.रंगांची उधळण.एरव्हीही ती आपल्या आयुष्यातहोतच असते,फक्त त्या रंगांकडे आपलंलक्ष असतंच असं नाही...रंगपंचमी. रंगात न्हाऊन निघायचा दिवस. गुलाल, आॅइलपेण्ट आणि आता नैसर्गिक रंग! पण तोच उत्साह, तोच खट्याळपणा आणि तोच आनंद!खरं तर आपलं सगळं आयुष्यच या रंगांनी रंगीन केलेलं आहे नाही? कृष्णधवल सिनेमांचंसुद्धा रंगीत रुपात पुनरागमन होतंय, निसर्गात तर रंगांची उधळणच आहे होळी आणि रंगपंचमी. अर्थात, हे दोनच नाहीत तर आपल्याकडचे सगळे सण रंगांच्या वर्षावात साजरे होणारे आहेत. दिवाळीला रंगीत आकाशकंदील, अनेकरंगी दिवे, रांगोळ्या आणि फटाके, संक्र ांतीचे रंगीत पतंग, गणपतीच्या उत्सवात केले जाणारे रंगीत देखावे, सगळ्या पूजाअर्चांमधे वापरली जाणारी विविधरंगी पाने आणि फुले सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण करतात नाही? आपल्या रोजच्या बोलीभाषेतसुद्धा मानवी भावनांचे प्रतिनिधित्व करणारे रंग आहेत. आपण रागाने ‘लालबुंद’ होतो, कोणा खास व्यक्तीच्या आठवणीने गालावर ‘लाली’ खुलते, आपल्याला आवडणारी थंडी ‘गुलाबी’ असते, ‘सोनेरी’ पहाट आशेची असते तर चांदनीरात प्रणयाची! एखाद्याचा चेहरा ‘काळवंडणं’ म्हणजे चिंता दाखवते, तर ‘तोंड काळं करणं’ शरमेची गोष्ट असते. इंग्रजी भाषेतसुद्धा उदास वाटण्याला 'feeling blue' तर वाया गेलेल्या व्यक्तीसाठी  'Black sheep of the  family'असा वाक्प्रचार आहे. याशिवाय rosy lips, deep blue eyes.. 

कित्ती मज्जा आहे रंगांत!कार्ल युंगला प्रख्यात पुरातन मानसशास्त्रज्ञाने हे जाणले की माणूस रंगांद्वारे सहज व्यक्त होऊ शकतो, त्याच्या भावना, त्याचं व्यक्तिमत्त्व रंगांद्वारे ओळखले जाऊ शकते. हाच बाबा आत्ता कुठं भारतात नावारूपाला आलेल्या कलर थेरपी किंवा आर्ट थेरपीचा जनक (खरंच बाबा) म्हटलं पाहिजे. निळा, लाल, हिरवा आणि पिवळा अशा चार मुख्य रंगांमध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचं वर्णन केलं. साधारणपणे वॉर्म आणि कूल असं दोन भागात त्यांनी रंगांचं वर्गीकरण केलं आहे. म्हणजे लाल कुटुंबात येणारे तांबडा, केशरी, पिवळा हे वॉर्म म्हणजे ऊब देणाऱ्या गटातले. आणि निळ्या कुटुंबात मोडणारे म्हणजे निळा, हिरवा, जांभळा हे रंग कूल म्हणजे शीतल गटात मोडतात. कदाचित, म्हणूनच प्रतिष्ठेचं समजलं जाणारं आमंत्रण रेड कार्पेट असतं आणि दवाखान्यातले पडदे बरेचदा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात. लाल रंग सत्तेचा. लाल रंग पाहिला की रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात असं म्हणतात, प्रियकर प्रेयसीच्या नात्यात लाल बदाम हीच धडधड निर्देशित करत असावा! लाल रंग जवळीक, प्रेम आणि लैंगिकतेचं प्रतीक आहे तर गुलाबी रंग नाजूकता, कोमलता दर्शवतो. पांढरा रंग शांतीचा, स्वच्छता आणि निर्मळता दाखवतो, तर काळा रंग सत्ता, खलप्रवृत्ती दाखवतो तसेच हुशारी आणि बुद्धीदेखील. केशरी रंगातून आनंद आणि शौर्य तसेच ऊब, संपत्ती आणि हर्ष प्रकट होतो तर पिवळा रंग आशा, उत्साह आणि रागदेखील व्यक्त करतो. हिरवा रंग समुद्धीचा, सुबत्तेचा आणि सुपीकतेचा ठरतो.हो, पण या रंगांच्या दुनियेत त्या त्या संस्कृतीचा, पद्धतीचा आणि सवयीचासुद्धा मोठा भाग आहे. कोणता रंग कुठे वापरला जातो त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. डॉक्टरच्या कोटचा रंग पांढरा आणि संगमरवरी ताजमहालचासुद्धा. काही समाजात तो विधवेचा, मृत्यूचा द्योतक तर दुसऱ्या समाजात लग्नाचा पेहराव पांढराच असावा लागतो. लाल रंग प्रेम व्यक्त करण्याचा खरा पण रक्त पाहिलं तर हाच रंग भीतीचा, धोक्याचा, सिग्नलवर असेल तर अडवणुकीचा! हिरवा रंग शेतकऱ्याच्या पिकात समृद्धीचा. काळा रंग काही समाजात प्रतिबंधित तर उच्चवर्णियांच्या पार्टीला याच रंगाचा पेहराव हवा! जसा, जिथे वापर करावा तसा अर्थ बदलला. पाण्याच्या रंगाची वेगळीच मजा. ज्यात मिसळावा तसा रंग घेतो. हा खरा परिवर्तनशीलतेचं आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं प्रतीक समजला पाहिजे.अर्थात, हे सगळे रंग आपण म्हणतो ते सगळ्यांना दिसणारे..! मग अनेकजण मुद्दाम लोकांना दिसण्यासाठी वेगवेगळे रंग पांघरतात... त्यानं अंतरंग लपतं खरं, पण तात्पुरतंच. त्यापेक्षा जो आतून खळाळून वाहत येईल तो रंग आपला. या रंगपंचमीला आपले खरे रंग उधळूया...