शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?

By admin | Updated: April 19, 2017 15:41 IST

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे.

निर्माण आणि आॅक्सिजनउत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..त्यातला हा चौथा प्रश्न : मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?मी शेंगा खाल्ल्यातर टरफलं मीच उचलेन!थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक १९ व्या शतकात म्हणाले होते, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही’. माझी मूल्यव्यवस्था याच विचाराला अनुसरून आहे, फक्त थोडी वेगळी...‘मी शेंगा खाल्ल्या तर मीच टरफले उचलणार, आणखी कोणी नाही’.थोडक्यात काय, माझ्या कृतीच्या परिणामांची जबादारी पण मलाच घ्यायची आहे. मग ती कृती बसने प्रवास करताना खाद्यपदार्थांची वेष्टणं बाहेर फेकणं असो, किंवा समाजातील समस्यांकडे डोळसपणे दुर्लक्ष करणं असो. माझ्या घरासमोर जमा झालेला कचरा असो किंवा जाता येता दिसणारे समाजातील हतबल, दुर्बल घटकांचे चेहरे असोत. जबाबदारी म्हणून स्वत: झाडू घेऊन रस्ता साफ करायला जाणं असो, की दिवसातला काही वेळ त्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी देणं असो, मी ती जबाबदारी घ्यायला हवी. आणि यामागे आहे माझ्या आईवडिलांनी शिकवलेला सर्वांबद्दलचा समान आदर. घरी आलेल्या पोस्टमनपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वांना आमच्या घरी पाहुण्यासारखा आदर मिळत असे. पुढील आयुष्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे, मग ती व्यक्ती कोणत्याही स्तरातली असो, आदराने पाहण्याची लागलेली सवय ही इथूनच आली. हा आदरच मग आपणही समाजाचे काही देणे लागतो हे शिकवून गेला.मला नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या एका गुरूंच्या तोंडून ऐकलेले एक वाक्य - ‘‘जोपर्यंत तुझी ते निस्तरायची तयारी असेल, तोपर्यंत तू कोणतीही चूक करू शकतोस!’’ जबाबदारी घेण्यासाठी सांगणारं हे वाक्य. हेच माझे दिशा दाखवणारे होकायंत्र. म्हणूनच की काय, गरजूंना मदत करणं आणि समाजाला आपलं योगदान देणं हे मला फक्त कर्म नाही, तर माझ्या मूल्यव्यवस्थेचाच एक भाग आणि नैतिक बंधन वाटतं. - विवेक पाटील,निर्माण जगण्याची दिशासापडल्यावर..मूल्य म्हणजे कंपास किंवा चुंबकसूची !ती जगण्याची दिशा भरकटू देत नाही.ती आपलं वागणं, बोलणं सतत दुरुस्त करत राहतात. मूल्यांचा आधार नसेल तर निर्णय घेणं फार अवघड होतं. उदाहरणार्थ युद्ध हवं की शांती हे ठरवलेलंच नसेल तर आपण अर्जुनासारखे गळून जाणार हे निश्चित! काही शाश्वत मूल्यं स्वीकारली की मनातला गोंधळ कमी होऊ लागतो. निर्णय घेणं सोपं होतं. मुळात आपण अधिक सजग, संवेदनशील होत जातो. पण, मूल्य हे प्रकरण कळायला कठीण आहे. अंगवळणी पडणं तर अशक्य वाटावं इतकं कठीण. कुणी आदर्श समोर असेल तर या अवघड प्रकरणाची आवड लागते. एखादे मूल्य समजून घेण्यासाठी, त्याचं महत्त्व आजमावण्यासाठी, त्याची सवय करून घेण्यासाठी मी एक नियम केला. ते मूल्य आपल्या बाबतीत कुणी पाळत नसतं तेव्हा आपली इतरांकडून काय अपेक्षा असते? कुणी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं किंवा आपल्याला असमान वागणूक दिली तर त्या परिस्थितीत त्यांनी जसं वागायला हवं होतं असं आपल्याला वाटतं, तसं जास्तीत जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न करावा. मूल्य नावाचं कोडं उलगडायला लागतं !- कल्याण टांकसाळे, निर्माण आपण सच्चेवाटतो का?आपलं कोणी तरी आदर्श असतं, आपण कोणाला तरी फॉलो करत असतो. आपण आपल्या वागण्याचा, स्वभावाचा, कृतीचा चांगला आणि वाईट विचार करतो. योग्य की अयोग्य असं निवडतो म्हणजेच आपली मूल्यव्यवस्था काय आहे याचं आपल्याला आकलन झालेलं असतं. आपली मूल्यव्यवस्था आपल्याला प्रश्न विचारायला आणि विचार करायला भाग पाडते. मूल्यव्यवस्था ही फक्त पुस्तकी कल्पना मुळीच नाही. प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या मूल्यव्यवस्थेला घेऊन जगत असतो. फक्त ती आपली मूल्यं आहेत हेच आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. ‘मी म्हणेल जगताना मूल्यव्यवस्थेचा उपयोग होतो का यापेक्षा, जगताना मी मूल्यव्यवस्थेचा उपयोग करतो/करते का’ हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा, आदर, न्याय, विश्वास, शहाणपण यांसारख्या मूल्यव्यवस्थेला घेऊन मी जगत आहे आणि जगताना या मूल्यव्यवस्थेचा मला उपयोग होत आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे ग्रामीण भागात काम करत असताना वयात आलेल्या मुलींना घराबाहेर पाठवलं जात नसायचं. पण मी बरोबर आहे म्हटल्यावर घरचे बिनधास्त त्यांना ‘जा’ अशी परवानगी देत. किंवा मला म्हणत, ‘ताई, तुम्ही बरोबर आहात म्हणजे आम्हाला काळजी नाही.’ याचाच अर्थ लोकांनी आपली जबाबदारी, विश्वास, आदर ही मूल्यव्यवस्था ओळखली आहे. आपल्या मूल्यव्यवस्थेची पोचपावती आपल्याबरोबरच समाजाने पण आपल्याला दिली पाहिजे. मात्र अनेकदा आपण ज्या मूल्यव्यवस्थेला मानतो ती इतरांना मान्य असेलच असे नाही. त्यामुळे समाजातून या गोष्टीला विरोध होत असतो. अशा परिस्थितीतही आपण आपल्या मूल्यांशी प्रामाणिक असलं पाहिजे. - साधना गुलदगड, निर्माण रोज निभाव लागेल तेव्हा..९आॅगस्ट २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला मिनिस्ट्री आॅफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अहवाल म्हणतो की, ९२,६५१ कोटी रुपये एवढं नुकसान शेतमालाच्या लॉसेसमुळे होतं. यातही २०,६९८ कोटी रुपये एवढं नुकसान फक्त कडधान्याच्या लॉसेसमुळे होतं. हे अहवाल किंवा आकडेवारी आपल्याला फार दूरचे वाटतात. पण तसं नाही. ते आपल्या संदर्भातही लागू होतंच. लग्नांमध्ये कितीतरी धान्य अक्षतांच्या रूपात फेकलं जातं. मागच्या तीन वर्षांपासून मी लग्नांमध्ये अक्षता टाकणंच बंद केलं आहे. अक्षता फेकण्यामागचं शास्त्र असं सांगतात की पक्षी, जमिनीतील किडे हेसुद्धा लग्नात पाहुणचार करू शकले पाहिजेत. आजकाल मात्र डोक्यावर छान मंडप आणि पायाखाली मस्तं गालीचे अंथरून लग्नं लावली जातात. मग कशाला अक्षता टाकायच्या?प्रश्न असे आहेत आणि माझ्या जीवनात असे छोटे छोटे मूल्य आहेत. अक्षतांच्या रूपात तांदूळ वाया न घालवणं, नैसर्गिक संसाधन जपून वापरणं, शक्य तिथे प्लॅस्टिकचा वापर टाळणं, हवं तेवढंच ताटात अन्न घेणं जेणेकरून ते वाया जाणार नाही, खादीचे कपडे वापरणे, कामामध्ये नैतिकता जपणं, स्त्रियांचा व त्यांच्या स्वातंत्र्याचा मान ठेवणं, जाती-धर्मांमध्ये भेद न करणं, दारू-सिगारेट-गुटखा-तंबाखू या पदार्थांचं सेवन न करणं.. हे सारं आपण जगताना रोज निभावू शकू असं आहे...- प्रतीक उंबरकर, निर्माण प्रश्नोत्तरांचं हे प्रकरणफार कठीण नाहीये. ‘निर्माण’ आणि ‘आॅक्सिजन’ यांच्यातलापूल असेल आकाश भोर.आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होताआणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे.तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.त्यासाठी ईमेल :nirman.oxygen@gmail.com यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवादआॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल.आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेलwww.lokmat.com/oxygen इथे!!!