शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

..डरते है बंदुकवाले ! अरुज औरंगजेब या पाकिस्तानी तरुणीची कुणाला भीती वाटतेय?

By meghana.dhoke | Published: December 19, 2019 8:10 AM

विदेशी एजण्ट, बर्गर कल्चरवाले लेदर जॅकेट एलिट, बदतमीज अशी किती लेबलं त्यांना लावण्यात आली तरी हे पाकिस्तानी विद्यार्थी मागे हटले नाहीत.

ठळक मुद्देइमरान खान यांनी ट्विट केलं की, 1984 पासून जी स्टुडण्ट युनियनवर बंदी घालण्यात आली आहे ती बंदी आपण मागे घेत आहोत.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

बर्गर, लेदर जॅकेट एलिट, रॉची एजण्ट, भारताची एजण्ट अशी बरीच लेबलं तिला लावण्यात आली.ती गात राहते, ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.’तर तिला ‘बदतमीज लडकी’ असं सर्रास म्हटलं जातं.चांगल्या घरच्या मुली चारचौघात असं आवाज वाढवून बोलतात का? प्रश्न विचारतात का, आझादी पाहिजे म्हणून रस्त्यावर आंदोलन करतात का? असं बरंच काही तिच्याविषयी बोललं जातं. तिचं नाव आहे अरुज औरंगजेब. पाकिस्तानातल्या विद्यार्थी आंदोलनाची म्होरकी. नेता. पंजाब युनिव्हर्सिटीत उभ्या राहिल्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तिच्याकडे होतं.एकेकाळी पाकिस्तानात ज्या ओळी बेनझीर भुत्ताेंसाठी लिहिल्या गेल्या, त्या ओळी आज आरजूसाठी पुन्हा पुन्हा गायल्या जात आहेत.हबीब जनीब यांची कविता आहे, त्याकाळची, ‘डरते है बंदुकवाले, एक निहथ्थी लडकी से !’आज आरजूच्या बाबतीतच नाही तर रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलेल्या अनेक पाकिस्तानी विद्यार्थिनींनी या ओळी सार्थ ठरवल्या आहे. 29 नोव्हेंबर 2019 या दिवशी विद्यार्थी आंदोलनाचा जो भडका उडाला त्यात मुलांपेक्षाही मुलींची संख्या जास्त होती.त्या रस्त्यावर उतरून जाब विचारत होत्या सरकारला की, शिक्षणावरचा खर्च कमी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? सैन्य दलांसाठी पैसे आहेत आणि आमच्या शिक्षणासाठी नाहीत असं का? होस्टेलची फी वाढवता, शिक्षणाची फी वाढवता, शिक्षणाचं खासगीकरण करता हे सारं आम्ही का सहन करायचं? आम्ही शिकायचंच नाही का?’या अशा सडेतोड प्रश्नांचा राग इमरान खान सरकारला येणं साहजिक होतं. ‘नया पाकिस्तान’ची स्वपA तरुण मुलांना दाखवून त्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले इमरान खान सत्तेत आल्यावर मात्र जुन्याच वाटेने निघाले. नव्या उमेदीची आणि बदलाचे वायदे फोल ठरले. देशात महागाई प्रचंड वाढली. तरुण मुलांचे रोजगार आणि शिक्षणाचे प्रश्न अतिगंभीर झाले. या सार्‍याच्या विरोधात लाहोरमध्ये 29 नोव्हेंबर रोजी एक स्टुडण्ट सॉलिडेटरी मार्च अर्थात मोर्चा काढण्यात आला.त्याचं नेतृत्व करण्यातही अरुज आघाडीवर होती. एका मध्यमवर्गीय पंजाबी घरातली ही मुलगी. इंग्रजी बोलतेच; पण पंजाबीही उत्तम बोलते. जिथं अनेकांना पंजाबी बोलण्याचीही लाज वाटते त्या वर्गात ती आपलं अस्सल पंजाबीपण आनंदाने मिरवते.आता तिच्यावर ‘फॉरीन एजण्ट’ अर्थात (अप्रत्यक्षपणे) भारताची एजण्ट असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.तिला मात्र यासार्‍याची काही पर्वा नाही. ती म्हणजे ‘मला या राजकारणाशी आणि शाब्दिक खेळाशी काही कर्तव्य नाही, आमच्या शिक्षणाच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालून कार्यवाही करावी हीच आमची मागणी आहे.’ही तिची एकटीचीच मागणी नाही तर आंदोलनात उतरलेल्या शेकडो विद्याथ्र्याची मागणी होती.

ही मुलं स्पष्ट सांगत होती की, शिक्षणाची, अभ्यासक्रमाची फी कमी करा. कॅम्पसमधल्या हिंसाचाराला, लैंगिक भेदभाव आणि छळाला आळा घाला. शिक्षणाचं खासगीकरण थांबवा. होस्टेलची दरवाढ केली आहे ती मागे घ्या. आणि स्टुडण्ट युनियनवरही जी बंदी घालण्यात आलेली आहे, ती बंदी तातडीनं हटवा.अशा मागण्या अनेक होत्या.मात्र सरकार दाद द्यायला तयार नव्हतंच. आर्मीनं हे आंदोलन दडपून टाकलं. शेकडोंना अटक झाली, आंतरराष्ट्रीय दबाव वाढला तसं त्या मुलांना सोडून देण्यात आलं.आणि बाकी काही नाही तर इमरान खान यांनी ट्विट केलं की, 1984 पासून जी स्टुडण्ट युनियनवर बंदी घालण्यात आली आहे ती बंदी आपण मागे घेत आहोत.या आंदोलनानं किमान हा एवढा लहानसा का होईना विजय या मुलांना दाखवला.आंदोलन थंडावलं मात्र तरुण मुलांमधली खदखद अजून संपलेली नाही.