शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून आपण पास की नापास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 08:00 IST

देशासाठी आपण काय करतो? आपण आहोत का जबाबदार नागरिक? बजावतोय का, आपली राष्ट्रीय कर्तव्यं?

ठळक मुद्देसांगा, किती मार्क द्यायचे आपण आपल्याला?

- अनन्या भारद्वाज

उद्या ऑगस्ट क्रांतिदिन.चले जाव नारा दिला, तो हा दिवस. 9 ऑगस्ट. पुढच्याच गुरुवारी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन.हे सारे उल्लेख आले की, आपला अभिमान डोळ्यात पाणी म्हणून तरळतो. आपल्या देशाचा, आपल्या प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो. ते वाटणं चूक नाहीच, पण हे सारं करताना स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्यं चोख बजावतो का, याचाही जरा ताळमेळ कधीतरी मांडला पाहिजे.आपण व्यवस्थेला, सरकारला, नेत्यांना प्रश्न विचारतो, त्यांना म्हणतो की, सांगा, देशासाठी तुम्ही काय केलं?समजा, हा प्रश्न कुणी आपल्यालाच विचारला की, तुम्ही देशासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करता. कसे वागता तर आपण काय उत्तर देऊ?देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर कर्तव्यपूर्तीही आहे. अधिकारापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं, ते निरपेक्ष भावनेनंच आधी करायला हवं. ते आपण करतो का?जरा तपासून पाहू.1) सिग्नल पाळले जातात की तोडले जातात?2)ओव्हर स्पीडिंग होतं की नाही?3) रस्त्यात, टर्नवर गाडी थांबवून फोनवर बोलतो की नाही?4) गाडी चालवताना फोनवर बोलतो की नाही?5) रांगांची शिस्त पाळतो का?6) रस्त्यात पचापचा थुंकतो का?7) रस्त्यात कचरा टाकतो का?8) बस, ट्रेन इथं कचरा टाकतो का?9) गड-किल्यांवर जाऊन काहीबाही खरडतो का?10) सामाजिक शिस्त पाळतो का?11) अपघात झाला तर शूट करतो की जखमीला मदत करतो?12) सर्वत्र नियम पाळतो की मी तमक्याचा ढमका म्हणून ओळखी सांगतो?13) वेळेवर सगळी बिलं भरतो का?-अशी यादी कितीही मोठी करता येईल. आपण आपल्या देशावर प्रेम करतो तर या देशातले कायदे पाळणं, ते निभावणं ही आपली जबाबदारी नाही का? ते आपलं राष्ट्रप्रेम नाही का?आपण आपलं राष्ट्रप्रेम कशात मोजणार? कसं दाखवणार? की निव्वळ घोषणा देणार? निव्वळ नारेबाजी करून पोकळ आवेश दाखवणार?हे प्रश्न आपणच स्वतर्‍ला विचारले पाहिजे, जय हिंद म्हणताना मी उत्तम नागरिक बनेल म्हणून काय काय केलं हे सांगता आलं पाहिजे.विचारा स्वतर्‍ला, आपण एक उत्तम नागरिक म्हणून स्वतर्‍ला दहा पैकी किती मार्क द्याल? आणि ते कमी असतील गुण तर कसं बदलणार स्वतर्‍ला.आजपासूनच!

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)