शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

और क्या क्या करते हो? - एक्स्ट्रा है तो बेहतर है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 4:27 PM

अभ्यासापलीकडे काय केलं? इतर कोणत्या उपक्रमात भाग घेतला? छंद काय? या प्रश्नांचं तुमच्याकडे काहीच उत्तर नसेल आणि एखादा फक्त गणपती मंडळाचा अध्यक्ष असेल तरी तो नोकरीत बाजी मारू शकतो!

ठळक मुद्दे सगळे सॉफ्ट स्किल्स शिकायला एकमेव मार्ग आहे तो म्हणजे ‘स्वानुभव’! 

- विनायक पाचलग

आजच्या घडीला अख्खा पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्त आहे. त्यांच्या मदतीला सर्वच जण धावून येत आहेत. त्यामुळे याक्षणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये एनएसएस, एनसीसी व इतर क्लबज् आपापली मदत तयार करत आहेत. काही लोक तर थेट फिल्डवर जाऊन स्वच्छता ते मदत वाटप अशा अनेक जबाबदार्‍या अंगावर घेत आहेत.  जसं हे कॉलेजमध्ये चालू आहे तसेच ते बर्‍याचशा कंपन्यांमध्येही सुरू आहे. लोक आपापल्या परीने काही ना काही करत आहेत. या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीला कॉलेजमध्ये ‘एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज म्हटले जाते. अन्य उपक्रम. आता काय महत्त्व आहे या एक्स्ट्रा उपक्रमांचे? त्यामुळे लोकांना मदत वगैरे होते हे खरंय; पण ही अशी मदत, त्यासाठी दिलेला वेळ, समर्पण आणि सच्च्या भावनेनं केलेलं काम, त्यातून शिकलेली कौशल्यं हे सारं भविष्यात जॉब मिळवायलासुद्धा महत्त्वाचे ठरतात. फक्त डिझास्टर मॅनेजमेंटच नव्हे तर वेगवेगळे कार्यक्रम, फेस्टिव्हल्स, आयआयटी टेकफेस्टसारख्या भव्यदिव्य स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी म्हणजे रूढार्थाने एक्स्ट्रा करिक्युलरच. खरं जग यात शिकायला मिळतं. आपण जे अभ्यासक्रमात  शिकतो त्यापलीकडे जाऊन कसं आणि माणसांना कसं  हँडल करायचं ते हे उपक्रम शिकवतात. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी स्पर्धा आयोजित करायला 10-15 मुलांची तरी टीम लागते.  या सगळ्या टीममध्ये समन्वय असेल तर आणि तरच ती स्पर्धा यशस्वी होऊ शकते. यात मग कोणी एक लीडर असतो तर बाकी सगळे को-ऑर्डीनेटर. यातला जो लीडर असतो त्याला जे शिकायला मिळत या उपक्र मातून तेच सगळे स्किल्स नोकरीमध्ये मॅनेजरला लागतात. म्हणजे उपक्रमातील लीडर हा भविष्यातील उत्तम मॅनेजर बनतो. तर त्याच्या बाकी सगळ्या को-ऑर्डीनेटर ना टीमवर्कम्हणजे काय ते समजतं. त्यामुळे कार्पोरेट जगात जेव्हा टीमवर्कसाठी वेगवेगळी सेशन्स घेतली जातात तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव आधीच मिळालेला असतो. आजकालच्या जगात सॉफ्ट स्किल्सला प्रचंड महत्त्व आहे हे सगळेच सांगतात. पण ते शिकायचे कोणतेही फॉर्मल माध्यम नाही. ना त्याचे क्लास लावता येतात, ना त्याच कोणतं पाठय़पुस्तक आहे. हे सगळे सॉफ्ट स्किल्स शिकायला एकमेव मार्ग आहे तो म्हणजे ‘स्वानुभव’! स्वतर्‍च्या अनुभवानेच टीमवर्क, लीडरशिप, फायनान्स मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट अशा सर्व गोष्टी शिकता येतात. आणि ही संधी असे कार्यक्र म व उपक्र म आपल्याला देतात. मुळात म्हणजे या सर्व उपक्र मातून नवी माणसे जोडली जातात, असलेल्या परिवाराशी नाती घट्ट होतात. महत्त्वाचे म्हणजे तुमचा रिझ्युम बिल्ड होतो. आजकाल तुम्हाला पडणारे मार्क हे फक्त एण्ट्री गेट असतात. मुलाखतीत निवडीचा तो निकष नसतो. अशावेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाखतीला जाता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या उपक्रमात सहभागी होतात, त्यातून काय शिकलात यावरच बरेचदा आपली निवड होणार का नाही हे ठरतं. त्यामुळे उत्तम जॉब मिळवायचा असेल तर त्याचं एक सीक्रेट हे जास्तीत जास्त इतर उपक्रमांत सहभागी होणं, त्यात दिलेलं काम मनापासून करणं हे आहे. यातून होणारा फायदा हा चटकन दिसणारा नसला तरी नोकरीत नक्की दिसेल याची खात्री बाळगा.आणि जे ऑलरेडी नोकरी करत आहेत त्यांनीसुद्धा हे उपक्रम चालूच ठेवले पाहिजेत, आधी नसतील केले तर आत्ता करायला हवेत  त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कंपनीचा सीएसआर विभाग किंवा कल्चर क्लब. सीएसआरमधून दिली जाणारी मदत असो वा कल्चर क्लबमधून करायचं असलेले गणपतीचे नियोजन. तुम्ही तिथे हवेतच.  कारण या  एक्स्ट्रा नाही तर मस्ट अ‍ॅक्टिव्हिटी आहेत.