शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

यंदाही तिरंगा नक्की फडकावणार - वीरधवल खाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 09:51 IST

भारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल.

- अभिजीत देशमुखभारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल. २०१० आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर २०१४च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु काही कारणास्तव सहभागी होऊ शकलो नाही,’ असे देशाचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने लोकमतला सांगितले.मी या स्पर्धेसाठी सप्टेंबर २०१७पासून तयारी करीत आहे. राष्ट्रकुल आणि काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समाधानकारक परिणाम आले. या स्पर्धेसाठी मी खास शारीरिक शक्ती आणि स्टॅमिना वाढविण्यावर भर दिला आहे. मी या स्पर्धेत ५०, १०० मीटर व ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभाग घेत आहे. २१ आॅगस्टला होणाऱ्या ५० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत पदक नक्की जिंकेन, असा आत्मविश्वास आहे. चीन, जापान यांचे आव्हान तर आहेच; तसेच आॅलिम्पिक सुवर्ण विजेता जोसेफ सकुलींगमुळे सिंगापूर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघाचा उत्तम सराव झाला आहे. रिले स्पर्धेसाठीसुद्धा आम्ही उत्सुक आहोत. आमचा प्रयत्न २-३ पदके जिंकून भारतीय जलतरणामध्ये क्रांती घडविण्याचा आहे.जकार्ता आशियाई क्रीडा साठी सज्ज१८ आॅगस्टपासून सुरू होणा-या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जकार्ता सज्ज दिसत आहे. सुराबया जंगलातील आग, सुमात्रामध्ये आतंकवादी हमला, लुम्बार्क येथे भूकंप, आर्थिक तंगी अशा सगळ्या संकटांवर मात करून इंडोनेशिया आपली मान उंचावण्यासाठी आयोजन करण्यास सर्वस्व देत आहे. ४५ देशांचे १६,००० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभाग असल्याने आॅलिम्पिकनंतर सर्वात मोठी बहुक्रीडा स्पर्धा म्हणून बघिलते जात आहे. आशियाई क्रीडाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरे जकार्ता आणि पालेमबंग मिळून या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. या दोन्ही शहरांनी २०११ची दक्षिण-पूर्व आशियाई स्पर्धा आयोजित केली होती; त्यामुळे नवीन स्टेडियम करण्याची गरज पडली नाही. नूतनीकरणावर आयोजकांनी भर दिला आहे. केवळ सायकलिंग वेलोड्रोम (ट्रॅक प्रकार)साठी नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहे.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Sportsक्रीडा