शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

यंदाही तिरंगा नक्की फडकावणार - वीरधवल खाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 09:51 IST

भारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल.

- अभिजीत देशमुखभारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल. २०१० आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर २०१४च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु काही कारणास्तव सहभागी होऊ शकलो नाही,’ असे देशाचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने लोकमतला सांगितले.मी या स्पर्धेसाठी सप्टेंबर २०१७पासून तयारी करीत आहे. राष्ट्रकुल आणि काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समाधानकारक परिणाम आले. या स्पर्धेसाठी मी खास शारीरिक शक्ती आणि स्टॅमिना वाढविण्यावर भर दिला आहे. मी या स्पर्धेत ५०, १०० मीटर व ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभाग घेत आहे. २१ आॅगस्टला होणाऱ्या ५० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत पदक नक्की जिंकेन, असा आत्मविश्वास आहे. चीन, जापान यांचे आव्हान तर आहेच; तसेच आॅलिम्पिक सुवर्ण विजेता जोसेफ सकुलींगमुळे सिंगापूर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघाचा उत्तम सराव झाला आहे. रिले स्पर्धेसाठीसुद्धा आम्ही उत्सुक आहोत. आमचा प्रयत्न २-३ पदके जिंकून भारतीय जलतरणामध्ये क्रांती घडविण्याचा आहे.जकार्ता आशियाई क्रीडा साठी सज्ज१८ आॅगस्टपासून सुरू होणा-या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जकार्ता सज्ज दिसत आहे. सुराबया जंगलातील आग, सुमात्रामध्ये आतंकवादी हमला, लुम्बार्क येथे भूकंप, आर्थिक तंगी अशा सगळ्या संकटांवर मात करून इंडोनेशिया आपली मान उंचावण्यासाठी आयोजन करण्यास सर्वस्व देत आहे. ४५ देशांचे १६,००० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभाग असल्याने आॅलिम्पिकनंतर सर्वात मोठी बहुक्रीडा स्पर्धा म्हणून बघिलते जात आहे. आशियाई क्रीडाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरे जकार्ता आणि पालेमबंग मिळून या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. या दोन्ही शहरांनी २०११ची दक्षिण-पूर्व आशियाई स्पर्धा आयोजित केली होती; त्यामुळे नवीन स्टेडियम करण्याची गरज पडली नाही. नूतनीकरणावर आयोजकांनी भर दिला आहे. केवळ सायकलिंग वेलोड्रोम (ट्रॅक प्रकार)साठी नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहे.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Sportsक्रीडा