शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक संघटनेने केली बंदीची कारवाई; आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपदही भारताने गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 01:32 IST

दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दखल घेण्याची बाब म्हणजे, एएआयने दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने आणि याविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणती हमी न मिळाल्याने जागतिक तिरंदाजी आशिया संघटनेने (डब्ल्यूएए) टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून काढून घेतले आहे. यामुळे आता आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद थायलंडला बहाल करण्यात आले.शिवाय या प्रकरणाचा सगळा अहवालही ‘डब्ल्यूएए’ने जागतिक तिरंदाजी संघटनेकडे सोपविला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय ‘डब्ल्यूएए’च्या कार्यकारिणी बैठकीत झाला आणि या बैठकीमध्ये ‘एएआय’चा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.‘एएआय’च्या न झालेल्या निवडणूकीमुळे जागतिक तिरंदाजी संघटना नाराज आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘एएआय’ला २६ जुलैला पाठविलेल्या पत्रामध्ये आशियाई अजिंक्यपद आणि संघटनेच्या निवडणूकीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. (वृत्तसंस्था)‘एएआय’ला पाठविण्यात आलेल्या पत्रात असेही म्हटले होते की, समाधानकारक उत्तर न दिल्यास आणि निवडणूक प्रक्रीया न केल्यास केवळ ‘एएआय’लाच नाही, तर भारताच्या खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागापासून रोखण्यात येईल. हे पत्र बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेले माजी सरचिटणीस अनिल कामिनेनी यांना लिहिले गेले होते. हे पत्र कामिनेनी यांनी सर्वोच्च न्यायालयद्वारे नेमण्यात आलेले प्रशासक एस. वाय. कुरेशी यांना सोपविले होते.यावर सूत्रांनी माहिती दिली की, कुरेशी यांनी याबाबत जागतिक संघटनेला भारतीय संघटनेच्या सर्व वस्तुस्थितीची माहिती दिली होती, तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाबाबतही भरवसा दिला होता. मात्र, जागतिक संघटना कुरेशी यांच्या उत्तरावर समाधानी नव्हते. त्याच बरोबर या स्पर्धेच्या आयोजनाविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणत्याही प्रकारची हमी देण्यात आली नाही. दरम्यान ‘जागतिक संघटनेकडून अहवालाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.

टॅग्स :Indiaभारत