शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक संघटनेने केली बंदीची कारवाई; आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपदही भारताने गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 01:32 IST

दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दखल घेण्याची बाब म्हणजे, एएआयने दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने आणि याविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणती हमी न मिळाल्याने जागतिक तिरंदाजी आशिया संघटनेने (डब्ल्यूएए) टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून काढून घेतले आहे. यामुळे आता आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद थायलंडला बहाल करण्यात आले.शिवाय या प्रकरणाचा सगळा अहवालही ‘डब्ल्यूएए’ने जागतिक तिरंदाजी संघटनेकडे सोपविला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय ‘डब्ल्यूएए’च्या कार्यकारिणी बैठकीत झाला आणि या बैठकीमध्ये ‘एएआय’चा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.‘एएआय’च्या न झालेल्या निवडणूकीमुळे जागतिक तिरंदाजी संघटना नाराज आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘एएआय’ला २६ जुलैला पाठविलेल्या पत्रामध्ये आशियाई अजिंक्यपद आणि संघटनेच्या निवडणूकीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. (वृत्तसंस्था)‘एएआय’ला पाठविण्यात आलेल्या पत्रात असेही म्हटले होते की, समाधानकारक उत्तर न दिल्यास आणि निवडणूक प्रक्रीया न केल्यास केवळ ‘एएआय’लाच नाही, तर भारताच्या खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागापासून रोखण्यात येईल. हे पत्र बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेले माजी सरचिटणीस अनिल कामिनेनी यांना लिहिले गेले होते. हे पत्र कामिनेनी यांनी सर्वोच्च न्यायालयद्वारे नेमण्यात आलेले प्रशासक एस. वाय. कुरेशी यांना सोपविले होते.यावर सूत्रांनी माहिती दिली की, कुरेशी यांनी याबाबत जागतिक संघटनेला भारतीय संघटनेच्या सर्व वस्तुस्थितीची माहिती दिली होती, तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाबाबतही भरवसा दिला होता. मात्र, जागतिक संघटना कुरेशी यांच्या उत्तरावर समाधानी नव्हते. त्याच बरोबर या स्पर्धेच्या आयोजनाविषयी क्रीडा मंत्रालयाकडूनही कोणत्याही प्रकारची हमी देण्यात आली नाही. दरम्यान ‘जागतिक संघटनेकडून अहवालाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.

टॅग्स :Indiaभारत