शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

भोपळा मिळूनही विराट कोहली 'खेलरत्न'; बजरंग पुनियाच्या खात्यात '80' गुण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 3:28 PM

राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी घोषणा झाली आणि पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना 2018चा 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर झाला

नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी घोषणा झाली आणि पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना 2018चा 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी डावलल्याने कुस्तीपटू बजरंग पुनिया नाराज झाला असून त्याने न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी दर्शवली आहे. या पुरस्कारासाठी निवडलेल्या विराट आणि मीराबाई यांच्या खात्यात अनुक्रमे 0 व 44 गुण आहेत, तर डावललेल्या बजरंगच्या खात्यात 80 गुण आहेत.  

बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याशिवाय त्याच्या नावावर जागतिक स्पर्धेची दोन पदकं आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्काराच्या नियमावलीप्रमाणे बजरंग प्रबळ दावेदार होता. त्यानुसारच त्याच्या गुणांची संख्या अधिक आहे. पण, म्हणून विराट कोहली आणि त्याची तुलना करणे चुकीचे आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्यामुळे त्याला गुणपद्धत लागू होत नाही. क्रीडा क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो आणि विराट याही नियमात सध्यातरी बसत नसल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.  

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीWrestlingकुस्तीBCCIबीसीसीआय