विजयची शानदार खेळी, भारत ३ बाद ३९८

By Admin | Updated: June 12, 2015 12:02 IST2015-06-12T09:51:10+5:302015-06-12T12:02:28+5:30

मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ३ गडी गमावून ३९८ धावा केल्या आहेत.

Vijay's superb knock, India 3 for 39 | विजयची शानदार खेळी, भारत ३ बाद ३९८

विजयची शानदार खेळी, भारत ३ बाद ३९८

ऑनलाइन लोकमत

फतुल्लाह, दि. १२ - मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ९३ षटकांत ३ गडी गमावत ३९८ धावा केल्या आहेत. 

शिखर धवन (१७३), रोहित शर्मा ( ६) व कर्णधार विराट कोहली (१४) एकापाठोपाठ एक बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली होती मात्र मुरली विजय व अजिंक्य रहाणेने (नाबाद ५५) चांगली खेळी करत भारताचा डाव पुन्हा सावरला. 

पावसामुळे भारत वि. बांगलादेश कसोटीचा कालचा दुस-या दिवसाचा खेळ रद्द झाला होता मात्र आज पावसाने उघडीप दिल्याने तिस-या दिवसाच खेळ व्यवस्थित सुरू झाला. दीडशतकी खेळी करणारा धवन व नव्वदीत खेळणार विजय मैदानात उतरले. थोड्याच वेळात मुरली विजयने त्याचे शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर शिखर धवन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ आलेला रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली पटापट बाद झाले व भारताचा डाव घसरला.

बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने २ तर जुबैर होसेनने १ बळी टिपला.

 

Web Title: Vijay's superb knock, India 3 for 39

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.