शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वेंगसरकर यांना ‘जीवनगौरव’

By admin | Updated: November 19, 2014 04:07 IST

जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार परवेज रसूल याला २०१३-१४च्या रणजी हंगामात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले

मुंबई : भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) यंदाचा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, भुवनेश्वर कुमारला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबरला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक वेंगसरकर यांनी १९७६ ते १९९१ या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव आणि सदस्य संजय पटेल यांच्या समितीने वेंगसरकर यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली. त्यांना या पुरस्कारांतर्गत एक सन्मानचिन्ह, चषक आणि २५ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. वेंगसरकर यांनी १९७५-७६ या हंगामात इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना शेष भारताविरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. तसेच, १९८३चा विश्वचषक आणि १९८५च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. १९८७ ते ८९ या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व वेंगसरकर यांच्याकडे होते. याव्यतिरिक्त वेंगसरकर २००६ ते ०८ या कालावधीत वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षही होते. लॉर्ड्सवर तीन कसोटी शतक करणारे वेंगसरकर हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्या १२६ धावांच्या फटकेबाजीमुळेच भारताने १९८६ मध्ये लॉडर््सवर कसोटी विजय साजरा केला होता. याआधी सचिन तेंडुलकरला (२००६-०७ व २००९-१९) व वीरेंद्र सेहवाग (२००७-०८), गौतम गंभीर (२००८-०९), राहुल द्रविड (२०१०-११), विराट कोहली (२०११-१२) आणि रविचंद्रन अश्विन (२०१२-१३) यांना पॉली उम्रीगर चषकाने सन्मानित करण्यात आले होते. जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार परवेज रसूल याला २०१३-१४च्या रणजी हंगामात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले असून, त्याला लाला अमरनाथ चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याने ९ सामन्यांत ६६३ धावा आणि २७ विकेट घेतल्या. या पुरस्कारासह त्याला अडीच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्नाटक संघाचा कर्णधार विनय कुमार यालाही सर्वोत्तम अष्टपैलू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विनयने १२ सामन्यांत ११३ धावा व ४० विकेट घेतल्या आहेत. महाराष्ट्राचा मधल्या फळीचा फलंदाज केदार जाधव याने २०१३-१४ च्या रणजी सत्रात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याला माधव राव सिंधिया पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशचा गोलंदाज ऋषी धवन यालाही सर्वोत्तम गोलंदाज म्हणून माधव राव सिंधिया चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)