शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Asian Games 2018: बॉक्सिंगमधील कामगिरीबद्दल असमाधानी; बीएफआय महासचिव जय कवळी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 07:33 IST

इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.

नागपूर : इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.रविवारी येथे सुरू झालेल्या सब ज्युनियर मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी आलेले कवळी यांनी ४९ किलो गटात सुवर्ण जिंकणारा अमित पांगल याचे कौतुक केले. अमित अप्रतिम बॉक्सर असल्याचे सांगून कवळी म्हणाले, ‘आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनला नमविणारा अमित देशाचे भविष्य आहे. विकास कृष्णनदेखील सुवर्णाचा दावेदार होता; पण त्याला झालेल्या दुखापतीमुळे अखेर कांस्यवर समाधान मानावे लागले. भारताला आशियाडमध्ये केवळ दोनच पदकांची कमाई झाली.या कामगिरीवर समाधानी आहात का, असे विचाराताच ते म्हणाले, ‘मुळीच नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी नऊ पदके मिळाली होती. राष्टÑकुल आणि आशियाड यामध्ये कमालीचा फरक असला तरी किमान चार पदकांची अपेक्षा होती. कुठे चूक झाली याची समीक्षा आम्ही लवकरच करणार आहोत.’ महाराष्ट्रातूनही उत्तम बॉक्सर पुढे येत असल्याचे सांगून, मुंबईत बीएमसीच्या शाळांमधील बॉक्सिंग प्रयोग राज्यात सर्वत्र राबविण्याचा मानस असल्याचे कवळी म्हणाले. राज्यातील १८ जिल्ह्यांत बॉक्सिंगचे जाळे विणले असून, जवळपास ५५ रिंक उपलब्ध असल्याची माहिती कवळी यांनी दिली.मेरिकोम, सरितांचा पर्याय शोधण्याची मोहीमबीएफआयने आयोजित केलेल्या पहिल्या सब ज्युनियर मुलींच्या स्पर्धा आयोजनामागील हेतू सांगताना कवळी म्हणाले, ‘मेरिकोम किंवा सरिता यानंतरही आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला बॉक्सर्स हव्या असतील तर शोधमोहिम राबविणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भविष्यातील आॅलिम्पिक स्टार्सचे बीजारोपण होत असून, २०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी युवा बॉक्सर मिळणार आहेत.’ सध्याच्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील सात बॉक्सरची निवड केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अकादमीत प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. अमित पांघलने मिळवलेले एकमेव सुवर्ण पदक हीच काय ती भारतासाठी जमेची बाब ठरली. तसेच, मोक्याच्यावेळी विकास कृष्ण जखमी झाल्याचाही फटकाही भारताला बसला. दुखापतीमुळे विकासला रिंगमध्ये उतरण्यास शक्य न झाल्याने त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा