शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: बॉक्सिंगमधील कामगिरीबद्दल असमाधानी; बीएफआय महासचिव जय कवळी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 07:33 IST

इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.

नागपूर : इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.रविवारी येथे सुरू झालेल्या सब ज्युनियर मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी आलेले कवळी यांनी ४९ किलो गटात सुवर्ण जिंकणारा अमित पांगल याचे कौतुक केले. अमित अप्रतिम बॉक्सर असल्याचे सांगून कवळी म्हणाले, ‘आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनला नमविणारा अमित देशाचे भविष्य आहे. विकास कृष्णनदेखील सुवर्णाचा दावेदार होता; पण त्याला झालेल्या दुखापतीमुळे अखेर कांस्यवर समाधान मानावे लागले. भारताला आशियाडमध्ये केवळ दोनच पदकांची कमाई झाली.या कामगिरीवर समाधानी आहात का, असे विचाराताच ते म्हणाले, ‘मुळीच नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी नऊ पदके मिळाली होती. राष्टÑकुल आणि आशियाड यामध्ये कमालीचा फरक असला तरी किमान चार पदकांची अपेक्षा होती. कुठे चूक झाली याची समीक्षा आम्ही लवकरच करणार आहोत.’ महाराष्ट्रातूनही उत्तम बॉक्सर पुढे येत असल्याचे सांगून, मुंबईत बीएमसीच्या शाळांमधील बॉक्सिंग प्रयोग राज्यात सर्वत्र राबविण्याचा मानस असल्याचे कवळी म्हणाले. राज्यातील १८ जिल्ह्यांत बॉक्सिंगचे जाळे विणले असून, जवळपास ५५ रिंक उपलब्ध असल्याची माहिती कवळी यांनी दिली.मेरिकोम, सरितांचा पर्याय शोधण्याची मोहीमबीएफआयने आयोजित केलेल्या पहिल्या सब ज्युनियर मुलींच्या स्पर्धा आयोजनामागील हेतू सांगताना कवळी म्हणाले, ‘मेरिकोम किंवा सरिता यानंतरही आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला बॉक्सर्स हव्या असतील तर शोधमोहिम राबविणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भविष्यातील आॅलिम्पिक स्टार्सचे बीजारोपण होत असून, २०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी युवा बॉक्सर मिळणार आहेत.’ सध्याच्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील सात बॉक्सरची निवड केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अकादमीत प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. अमित पांघलने मिळवलेले एकमेव सुवर्ण पदक हीच काय ती भारतासाठी जमेची बाब ठरली. तसेच, मोक्याच्यावेळी विकास कृष्ण जखमी झाल्याचाही फटकाही भारताला बसला. दुखापतीमुळे विकासला रिंगमध्ये उतरण्यास शक्य न झाल्याने त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा