शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सिया, खुशी यांनी केले प्रभावित, दोन वेळच्या डब्ल्यूएनबीए चॅम्पियनने केले महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 10:11 IST

भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.

 - रोहित नाईक 

नवी दिल्ली  -  ‘बीडब्ल्यूबी मुलींच्या शिबिराचा खूप चांगला अनुभव असून युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे. चीन, आॅस्ट्रेलिया आणि इतर देशांतील खेळाडूंसह भारताच्या मुलींचा खेळ पाहणे शानदार ठरले आहे. विशेष म्हणजे भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले. ्

ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकादमी येथे सुरु असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) शिबिरामध्ये १७ वर्षांखालील मुली रुथच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये १६ देशांतील ६६ खेळाडूंनी सहभाग घेतला असून यात १८ भारतीय मुलींचा समावेश आहे. यानिमित्ताने रुथने ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय मुलींच्या कामगिरीविषयी रुथने म्हटले की, ‘युवा भारतीय मुलींनी प्रभावित केले आहे. हे माझे भारतातील पहिलेच शिबिर असल्याने भविष्यात या मुली कितपत मजल मारतील आत्ताच सांगता येणार नाही, पण या सर्वांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. तांत्रिकदृष्ट्या शुटींग आणि पासिंगमध्ये सर्व खेळाडू कसलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय मुली कल्पकतेने खेळतात. त्यांना एखादी गोष्ट समजावण्यासाठी केवळ एकदाच सांगावे लागते. त्यानंतर ते आपला खेळ सादर करतात.’ 

यावेळी रुथने नागपूरच्या सिया देवधर आणि औरंगाबादच्या खुशी डोंगरे यांचे विशेष कौतुक केले. रुथ म्हणाली की, ‘सिया आणि खुशीचा खेळ पाहण्यात वेगळीच मजा आहे. सिया शिबिरातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे. प्रत्येक दिवसागणिक तिचा खेळ सुधारत आहे. ती सर्वोत्तम बचावपटू असून उत्कृष्ट शूटरही आहे. त्याचबरोबर खुशीही तोडीस तोड आहे. ती स्वत:च्या उपस्थितीने आपल्या संघाला मजबूत करते. शिवाय चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण ठेवून गुणांची कमाई करणे तिला आवडते. या दोन्ही खेळाडूंचा खेळ पाहण्यात आनंद आहे.’ 

त्याचप्रमाणे, ‘सिया व खुशी दोघींचेही भविष्य उज्ज्वल आहे. जर या दोघींनी आपला खेळ असाच बहरत ठेवला, तर त्यांना केवळ भारतीय संघातच नाही, तर यूएसएमध्येही मोठी संधी मिळेल. तसेच, कॉलजनंतर सिया व खुशी व्यावसायिक स्पर्धेतही छाप पाडतील. पण तरी त्यांना अजून आपल्या खेळावर मेहनत घ्यावी लागेल आणि दोघीही मेहनती आहेत,’ असेही रुथने यावेळी सांगितले. 

भारतीय महिला बास्केटबॉल सध्या जागतिक स्तरावर पिछाडीवर असून यात सुधारणा करण्यासाठी सोयी-सुविधा पुरविणे गरजचे असल्याचे रुथने म्हटले. रुथ म्हणाली की, ‘भारतात सोयी-सुविधांची कमतरता आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंना तांत्रिक ज्ञान देणेही आवश्यक आहे. आज या शिबिराच्या माध्यमातून आम्ही खेळाडू व प्रशिक्षक अशा दोघांनाही प्रशिक्षण देत आहोत. भारत जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानी असून याचा अर्थ अजूनही सुधारणा करण्यास खूप वाव आहे. मुलींच्या किंवा महिला संघाला योग्य सुविधा निर्माण करुन आणि त्यांना सर्वप्रकारची मदत दिल्यास भारतीय महिला बास्केटबॉलची प्रगती वेगाने होईल. 

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र