शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सिया, खुशी यांनी केले प्रभावित, दोन वेळच्या डब्ल्यूएनबीए चॅम्पियनने केले महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 10:11 IST

भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.

 - रोहित नाईक 

नवी दिल्ली  -  ‘बीडब्ल्यूबी मुलींच्या शिबिराचा खूप चांगला अनुभव असून युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे. चीन, आॅस्ट्रेलिया आणि इतर देशांतील खेळाडूंसह भारताच्या मुलींचा खेळ पाहणे शानदार ठरले आहे. विशेष म्हणजे भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले. ्

ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकादमी येथे सुरु असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) शिबिरामध्ये १७ वर्षांखालील मुली रुथच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये १६ देशांतील ६६ खेळाडूंनी सहभाग घेतला असून यात १८ भारतीय मुलींचा समावेश आहे. यानिमित्ताने रुथने ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय मुलींच्या कामगिरीविषयी रुथने म्हटले की, ‘युवा भारतीय मुलींनी प्रभावित केले आहे. हे माझे भारतातील पहिलेच शिबिर असल्याने भविष्यात या मुली कितपत मजल मारतील आत्ताच सांगता येणार नाही, पण या सर्वांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. तांत्रिकदृष्ट्या शुटींग आणि पासिंगमध्ये सर्व खेळाडू कसलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय मुली कल्पकतेने खेळतात. त्यांना एखादी गोष्ट समजावण्यासाठी केवळ एकदाच सांगावे लागते. त्यानंतर ते आपला खेळ सादर करतात.’ 

यावेळी रुथने नागपूरच्या सिया देवधर आणि औरंगाबादच्या खुशी डोंगरे यांचे विशेष कौतुक केले. रुथ म्हणाली की, ‘सिया आणि खुशीचा खेळ पाहण्यात वेगळीच मजा आहे. सिया शिबिरातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे. प्रत्येक दिवसागणिक तिचा खेळ सुधारत आहे. ती सर्वोत्तम बचावपटू असून उत्कृष्ट शूटरही आहे. त्याचबरोबर खुशीही तोडीस तोड आहे. ती स्वत:च्या उपस्थितीने आपल्या संघाला मजबूत करते. शिवाय चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण ठेवून गुणांची कमाई करणे तिला आवडते. या दोन्ही खेळाडूंचा खेळ पाहण्यात आनंद आहे.’ 

त्याचप्रमाणे, ‘सिया व खुशी दोघींचेही भविष्य उज्ज्वल आहे. जर या दोघींनी आपला खेळ असाच बहरत ठेवला, तर त्यांना केवळ भारतीय संघातच नाही, तर यूएसएमध्येही मोठी संधी मिळेल. तसेच, कॉलजनंतर सिया व खुशी व्यावसायिक स्पर्धेतही छाप पाडतील. पण तरी त्यांना अजून आपल्या खेळावर मेहनत घ्यावी लागेल आणि दोघीही मेहनती आहेत,’ असेही रुथने यावेळी सांगितले. 

भारतीय महिला बास्केटबॉल सध्या जागतिक स्तरावर पिछाडीवर असून यात सुधारणा करण्यासाठी सोयी-सुविधा पुरविणे गरजचे असल्याचे रुथने म्हटले. रुथ म्हणाली की, ‘भारतात सोयी-सुविधांची कमतरता आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंना तांत्रिक ज्ञान देणेही आवश्यक आहे. आज या शिबिराच्या माध्यमातून आम्ही खेळाडू व प्रशिक्षक अशा दोघांनाही प्रशिक्षण देत आहोत. भारत जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानी असून याचा अर्थ अजूनही सुधारणा करण्यास खूप वाव आहे. मुलींच्या किंवा महिला संघाला योग्य सुविधा निर्माण करुन आणि त्यांना सर्वप्रकारची मदत दिल्यास भारतीय महिला बास्केटबॉलची प्रगती वेगाने होईल. 

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र