शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Tokyo Olympics : संपूर्ण देशात मीराबाई चानूच्या नावाचाच डंका; जाणून घ्या, काय म्हणाले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:24 IST

Mirabai Chanu success in Tokyo olympics : मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने मेडल जिंकताच संपूर्ण देशात आंदाचे वातावरण आहे आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच बरोबर ऑलिम्पिक खेळाडूंकडून देशाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने आज झालेल्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. (Tokyo olympics Mirabai Chanu success in olympics will inspire everyone PM Narendra Modi and president Ramnath Kovind congratulated)

मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मीराबाई चानूचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे, की ‘मीराबाई चानूच्या शानदार प्रदर्शनामुळे देशात उत्साहाचे वातावरण आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे यश प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणा देईल.’

Mirabai Chanu, Tokyo Olympics: 'स्वप्न पूर्ण झालं...भारत माता की जय!', रौप्यपदक विजेत्या मीराबाईची चानूची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मीराबाई चानूचे अभिनंद करताना म्हटले आहे, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकूण टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये भारतासाठी पदक तालिकेची सुरुवात केल्याबद्दल मीराबाई चानूचे हार्दिक अभिनंदन.

संघर्षाचं पदक -मणिपूरच्या मीराबाईनं आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा.

Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष

...तेव्हा मनात आला होता वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचा विचार आता रचला इतिहास - मीराबाईचं गाव इम्फाळपासून २२ किमी दूरवर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. कारण याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. पण नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागन केलं आणि आज टोकियोमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदIndiaभारत