शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Mirabai Chanu, Tokyo Olympics: प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 13:52 IST

Tokyo Olympics, Mirabai Chanu Sliver Medal: मीराबाईचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक संकटांवर मात करुन ती आजचं यश अनुभवत आहे.

Tokyo Olympics, Mirabai Chanu Sliver Medal: जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अभियानाची दमदार सुरुवात झाली आहे. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं आज झालेल्या ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. 

जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर मिराबाई चानूच्या मणिपूर येथील राहत्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पण मिराबाई चानू हिचा आजवरचा प्रवास फार खडतर राहिला आहे. खूप संघर्षानंतर मीराबाई चानू हिला आजचा दिवस पाहायला मिळतो आहे. 

मणिपूरच्या मीराबाईनं आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा. मीराबाईचं गाव इम्फाळपासून २२ किमी दूरवर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. कारण याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. पण नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागन केलं आणि आज टोकियोमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती. 

मीराबाईनं मणिपूरच्या कुंजुरानी यांना पाहून वेटलिफ्टर होण्याचा निश्चय केला आहे. २००७ साली जेव्हा तिनं सरावाला सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे लोखंडी रॉड नव्हते, त्यावेळी लाकडी रॉडनंच तिला सराव करावा लागत होता. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू व्हायचं म्हटलं तर आहारावरही लक्ष द्यावं लागतं आणि मीराबाईच्या आहाराची गरज पूर्ण करणं त्यांच्या कुटुंबीयांना परवडणारं नव्हतं. तरीही मीराबाईच्या आईनं खडतर मेहनत करुन तिच्या आहारात कोणताही कमतरता येणार नाही याची काळजी घेतली. 

कुटुंबीयांनी आपल्यावर केलेला खर्च आणि त्यांनी पाहिलेले हलाकिचे दिवस तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये आलेल्या अपयशानंतर फारच मनला लागले. त्यानंतर ती नैराश्यात गेली. पण त्यावरही मात करुन तिनं आणखी मेहनत करण्याचा निश्चय केला आणि ती सातत्यानं सराव करण्यास सुरुवात केली. रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मीराबाई जास्तीत जास्त वेळ प्रशिक्षण केंद्रातच व्यतीत करायचं. ती घरी कमी आणि प्रशिक्षण केंद्रात जास्तवेळ राहू लागली. याआधी मीराबाईनं २०२१४ साली ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021