शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

टीम इंडियाचे सांघिक यश

By admin | Updated: March 29, 2017 01:18 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर टाकल्यास कळून येईल, की ही लढत खूप अटीतटीची झाली. अखेरपर्यंत सामन्यातील दबाव दिसून येत होता. भारतीय संघ विजयी लक्ष्य पार करण्यात यशस्वी होईल की नाही, अशीच चर्चा रंगलेली. १०६ धावांचे लक्ष्य तसे लहानच आहे. परंतु, हा असा सामना होता ज्यात काहीही होऊ शकत होते. पण, ज्याप्रकारे, लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहता एक गोष्ट नक्की झाली, की आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान भारतीय संघाला सहजासहजी मिळालेले नाही. खूप मेहनत घेतली आहे भारतीय खेळाडूंनी आणि या मालिकेत ती मेहनत दिसूनही आली आहे. हा एक जबरदस्त विजय आहे.त्याचवेळी, यंदाचे मोसम भारतासाठी शानदार ठरले. घरच्या मैदानावर १३ सामने खेळले गेले आणि यापैकी १० सामने जिंकले असून एकमेव पराभव पुण्यात आॅस्टे्रलियाविरुद्ध झाला. त्यामुळे माझ्या मते भारतीयांचे एक जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शन झाले आहे. या मालिकेत विराट कोहलीने फारशी चमक नाही दाखवली, परंतु चेतेश्वर पुजाराने खूप धावा काढल्या. मालिकावीर ठरलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजी केली, गोलंदाजी केली तसेच उपयुक्त क्षेत्ररक्षण करून काही धावाही वाचवल्या. तसेच, केएल राहुलने एक कसोटी सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाजीमध्ये उमेश यादवचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे. कारण, मालिकेत अशा खेळपट्ट्यांवर १७ बळी घेणे वेगवान गोलंदाजांसाठी कधीही सोपे नसते. एकूणच, या मालिकेत भारताची सांघिक कामगिरी राहिली आहे. रणनीतीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली. अखेरच्या कसोटीमध्ये प्रत्येकी ५ गोलंदाज आणि फलंदाज खेळवले. गरजेनुसार भारतीय संघाने आपले खेळाडू बदलले. शिवाय, माझ्या मते या संपूर्ण मोसमात भारतीय खेळाडूंची जिद्द आणि त्यांचा जोश जबरदस्त होता. विजयाचा निर्धार आणि आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखणे हा निश्चय भारतीय खेळाडूंमध्ये दिसून येत होता. माझ्या मते या मोसमामध्ये खेळाडूंचा दृढ निश्चिय हेच सर्वात विशेष ठरले आहे. अयाझ मेमन संपादकीय सल्लागार