शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

टीम इंडियाचे सांघिक यश

By admin | Updated: March 29, 2017 01:18 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर टाकल्यास कळून येईल, की ही लढत खूप अटीतटीची झाली. अखेरपर्यंत सामन्यातील दबाव दिसून येत होता. भारतीय संघ विजयी लक्ष्य पार करण्यात यशस्वी होईल की नाही, अशीच चर्चा रंगलेली. १०६ धावांचे लक्ष्य तसे लहानच आहे. परंतु, हा असा सामना होता ज्यात काहीही होऊ शकत होते. पण, ज्याप्रकारे, लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहता एक गोष्ट नक्की झाली, की आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान भारतीय संघाला सहजासहजी मिळालेले नाही. खूप मेहनत घेतली आहे भारतीय खेळाडूंनी आणि या मालिकेत ती मेहनत दिसूनही आली आहे. हा एक जबरदस्त विजय आहे.त्याचवेळी, यंदाचे मोसम भारतासाठी शानदार ठरले. घरच्या मैदानावर १३ सामने खेळले गेले आणि यापैकी १० सामने जिंकले असून एकमेव पराभव पुण्यात आॅस्टे्रलियाविरुद्ध झाला. त्यामुळे माझ्या मते भारतीयांचे एक जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शन झाले आहे. या मालिकेत विराट कोहलीने फारशी चमक नाही दाखवली, परंतु चेतेश्वर पुजाराने खूप धावा काढल्या. मालिकावीर ठरलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजी केली, गोलंदाजी केली तसेच उपयुक्त क्षेत्ररक्षण करून काही धावाही वाचवल्या. तसेच, केएल राहुलने एक कसोटी सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाजीमध्ये उमेश यादवचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे. कारण, मालिकेत अशा खेळपट्ट्यांवर १७ बळी घेणे वेगवान गोलंदाजांसाठी कधीही सोपे नसते. एकूणच, या मालिकेत भारताची सांघिक कामगिरी राहिली आहे. रणनीतीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली. अखेरच्या कसोटीमध्ये प्रत्येकी ५ गोलंदाज आणि फलंदाज खेळवले. गरजेनुसार भारतीय संघाने आपले खेळाडू बदलले. शिवाय, माझ्या मते या संपूर्ण मोसमात भारतीय खेळाडूंची जिद्द आणि त्यांचा जोश जबरदस्त होता. विजयाचा निर्धार आणि आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखणे हा निश्चय भारतीय खेळाडूंमध्ये दिसून येत होता. माझ्या मते या मोसमामध्ये खेळाडूंचा दृढ निश्चिय हेच सर्वात विशेष ठरले आहे. अयाझ मेमन संपादकीय सल्लागार