शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचे सांघिक यश

By admin | Updated: March 29, 2017 01:18 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बाजी मारून भारताने मालिका जिंकली. हा मोठा विजय मानू शकतो, परंतु सामन्यावर नजर टाकल्यास कळून येईल, की ही लढत खूप अटीतटीची झाली. अखेरपर्यंत सामन्यातील दबाव दिसून येत होता. भारतीय संघ विजयी लक्ष्य पार करण्यात यशस्वी होईल की नाही, अशीच चर्चा रंगलेली. १०६ धावांचे लक्ष्य तसे लहानच आहे. परंतु, हा असा सामना होता ज्यात काहीही होऊ शकत होते. पण, ज्याप्रकारे, लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहता एक गोष्ट नक्की झाली, की आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान भारतीय संघाला सहजासहजी मिळालेले नाही. खूप मेहनत घेतली आहे भारतीय खेळाडूंनी आणि या मालिकेत ती मेहनत दिसूनही आली आहे. हा एक जबरदस्त विजय आहे.त्याचवेळी, यंदाचे मोसम भारतासाठी शानदार ठरले. घरच्या मैदानावर १३ सामने खेळले गेले आणि यापैकी १० सामने जिंकले असून एकमेव पराभव पुण्यात आॅस्टे्रलियाविरुद्ध झाला. त्यामुळे माझ्या मते भारतीयांचे एक जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शन झाले आहे. या मालिकेत विराट कोहलीने फारशी चमक नाही दाखवली, परंतु चेतेश्वर पुजाराने खूप धावा काढल्या. मालिकावीर ठरलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजी केली, गोलंदाजी केली तसेच उपयुक्त क्षेत्ररक्षण करून काही धावाही वाचवल्या. तसेच, केएल राहुलने एक कसोटी सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाजीमध्ये उमेश यादवचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे. कारण, मालिकेत अशा खेळपट्ट्यांवर १७ बळी घेणे वेगवान गोलंदाजांसाठी कधीही सोपे नसते. एकूणच, या मालिकेत भारताची सांघिक कामगिरी राहिली आहे. रणनीतीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली. अखेरच्या कसोटीमध्ये प्रत्येकी ५ गोलंदाज आणि फलंदाज खेळवले. गरजेनुसार भारतीय संघाने आपले खेळाडू बदलले. शिवाय, माझ्या मते या संपूर्ण मोसमात भारतीय खेळाडूंची जिद्द आणि त्यांचा जोश जबरदस्त होता. विजयाचा निर्धार आणि आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखणे हा निश्चय भारतीय खेळाडूंमध्ये दिसून येत होता. माझ्या मते या मोसमामध्ये खेळाडूंचा दृढ निश्चिय हेच सर्वात विशेष ठरले आहे. अयाझ मेमन संपादकीय सल्लागार