शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
5
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
6
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
7
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
8
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
9
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
10
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
11
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
12
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
13
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
14
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
15
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
16
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
17
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
18
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
19
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
20
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!

टीम इंडियाच वर्ल्डकप पटकावू शकतो

By admin | Updated: March 9, 2016 05:11 IST

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक व श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांच्यासह माजी दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेत यजमान संघ बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला. या दिग्गज कर्णधारांव्यतिरिक्त माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग आणि जोगिंदर शर्मा व २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी जेतेपदासाठी भारताला पसंती दर्शवली आहे. या दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेबाबत दिल्लीमध्ये आयोजित एक कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.सेहवागच्या मते यंदा भारताला विश्वकप पटकाविण्याची ९९ टक्के संधी आहे. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित लढतीबाबत बोलताना गांगुली म्हणाला, या लढतीत भारतीय संघ विजयाचा दावेदार राहील, तर काही प्रमुख खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर पाकिस्तान बाजी सरशी साधू शकतो, असे इंजमाम म्हणाला.शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मते भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. आशिया कप स्पर्धेत विजेतेपद पटकावताना भारतीय संघाने ते सिद्ध केले आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत असून, कामगिरीतही सातत्य राखले आहे. भारतीय संघात ‘मॅच विनर’ खेळाडू असून चांगले फिनिशरही आहेत. त्यामुळे उर्वरित संघाच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत भासत आहे.’२००७ च्या विश्वकप स्पर्धेत विजयी चेंडू टाकणारा जोगिंदर शर्मा म्हणाला,‘भारतीय संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. जेतेपद पटकावण्याचा आम्हाला आत्मविश्वास होता.(वृत्तसंस्था)