शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

खेळातही देश ‘सुपर पॉवर’ व्हावा : राजनाथसिंह

By admin | Updated: April 3, 2015 00:29 IST

भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.

बेंगळुरू : भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.येथील एका स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री म्हणाले, ‘‘२१व्या शतकाचा विकास भारताशी संलग्न आहे. वैश्विक स्तरावर स्वत:चा बलाढ्यपणा सिद्ध करायचा झाल्यास भारताने आर्थिक क्षेत्रासोबतच क्रीडाक्षेत्रातही सुपर पॉवर बनायला हवे. एक वेळ अशी होती, की भारताचे खेळाडू आॅलिम्पिक आणि विश्वस्पर्धेत भाग घेऊन पाचव्या-सहाव्या स्थानावर समाधान मानायचे; पण आता काळ बदलला आहे. भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये तब्बल सहा पदकांची कमाई केली.’’आमच्या खेळाडूंमध्ये कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता आहे, हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले. कौशल्याच्या बळावर कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आली असल्याचे सांगून त्यांनी पाच वेळची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम तसेच बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालचे उदाहरण दिले. या महिलांनी देशाचे नाव उंच केल्याने दृष्टिकोन बदलून खेळांना मदत करण्याची वेळ जवळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले. कधीकाळी अभ्यासात हुशार असणे आणि परीक्षेत प्रावीण्य पटकावून अधिकारी बनण्यास अग्रक्रम दिला जायचा; पण सध्या खेळात करिअर घडवून मोठी झेप घेण्यास अग्रक्रम दिला जातो. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असल्यामुळे क्रीडाक्षेत्राला आर्थिक सुबत्ता लाभत आहे. आधी पश्चिमी देश खेळात आर्थिकदृष्ट्या संपन्न होते; त्यामुळे मेडल घेण्यातही त्यांचा नंबर आधी होता. आता भारतीय खेळाडू पदकांच्या चढाओढीत पुढे दिसतात. केंद्र सरकारदेखील खेळांना अधिक प्रोत्साहन देत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कॉर्पोरेट क्षेत्रानेही सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून खेळांसाठी सहकार्याचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)