शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

खेळातही देश ‘सुपर पॉवर’ व्हावा : राजनाथसिंह

By admin | Updated: April 3, 2015 00:29 IST

भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.

बेंगळुरू : भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.येथील एका स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री म्हणाले, ‘‘२१व्या शतकाचा विकास भारताशी संलग्न आहे. वैश्विक स्तरावर स्वत:चा बलाढ्यपणा सिद्ध करायचा झाल्यास भारताने आर्थिक क्षेत्रासोबतच क्रीडाक्षेत्रातही सुपर पॉवर बनायला हवे. एक वेळ अशी होती, की भारताचे खेळाडू आॅलिम्पिक आणि विश्वस्पर्धेत भाग घेऊन पाचव्या-सहाव्या स्थानावर समाधान मानायचे; पण आता काळ बदलला आहे. भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये तब्बल सहा पदकांची कमाई केली.’’आमच्या खेळाडूंमध्ये कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता आहे, हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले. कौशल्याच्या बळावर कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आली असल्याचे सांगून त्यांनी पाच वेळची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम तसेच बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालचे उदाहरण दिले. या महिलांनी देशाचे नाव उंच केल्याने दृष्टिकोन बदलून खेळांना मदत करण्याची वेळ जवळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले. कधीकाळी अभ्यासात हुशार असणे आणि परीक्षेत प्रावीण्य पटकावून अधिकारी बनण्यास अग्रक्रम दिला जायचा; पण सध्या खेळात करिअर घडवून मोठी झेप घेण्यास अग्रक्रम दिला जातो. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असल्यामुळे क्रीडाक्षेत्राला आर्थिक सुबत्ता लाभत आहे. आधी पश्चिमी देश खेळात आर्थिकदृष्ट्या संपन्न होते; त्यामुळे मेडल घेण्यातही त्यांचा नंबर आधी होता. आता भारतीय खेळाडू पदकांच्या चढाओढीत पुढे दिसतात. केंद्र सरकारदेखील खेळांना अधिक प्रोत्साहन देत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कॉर्पोरेट क्षेत्रानेही सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून खेळांसाठी सहकार्याचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)