शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

खेळातही देश ‘सुपर पॉवर’ व्हावा : राजनाथसिंह

By admin | Updated: April 3, 2015 00:29 IST

भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.

बेंगळुरू : भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.येथील एका स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री म्हणाले, ‘‘२१व्या शतकाचा विकास भारताशी संलग्न आहे. वैश्विक स्तरावर स्वत:चा बलाढ्यपणा सिद्ध करायचा झाल्यास भारताने आर्थिक क्षेत्रासोबतच क्रीडाक्षेत्रातही सुपर पॉवर बनायला हवे. एक वेळ अशी होती, की भारताचे खेळाडू आॅलिम्पिक आणि विश्वस्पर्धेत भाग घेऊन पाचव्या-सहाव्या स्थानावर समाधान मानायचे; पण आता काळ बदलला आहे. भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये तब्बल सहा पदकांची कमाई केली.’’आमच्या खेळाडूंमध्ये कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता आहे, हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले. कौशल्याच्या बळावर कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आली असल्याचे सांगून त्यांनी पाच वेळची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम तसेच बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालचे उदाहरण दिले. या महिलांनी देशाचे नाव उंच केल्याने दृष्टिकोन बदलून खेळांना मदत करण्याची वेळ जवळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले. कधीकाळी अभ्यासात हुशार असणे आणि परीक्षेत प्रावीण्य पटकावून अधिकारी बनण्यास अग्रक्रम दिला जायचा; पण सध्या खेळात करिअर घडवून मोठी झेप घेण्यास अग्रक्रम दिला जातो. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असल्यामुळे क्रीडाक्षेत्राला आर्थिक सुबत्ता लाभत आहे. आधी पश्चिमी देश खेळात आर्थिकदृष्ट्या संपन्न होते; त्यामुळे मेडल घेण्यातही त्यांचा नंबर आधी होता. आता भारतीय खेळाडू पदकांच्या चढाओढीत पुढे दिसतात. केंद्र सरकारदेखील खेळांना अधिक प्रोत्साहन देत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कॉर्पोरेट क्षेत्रानेही सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून खेळांसाठी सहकार्याचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)