शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:09 IST

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

ठळक मुद्देकाही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

दीपा मलिक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण आणि आठ रौप्यासह भारताने अभूतपूर्व १९ पदके जिंकली. त्यामुळे माझ्या आनंदाला उधाण आले आहे. नऊ प्रकारात ५४ खेळाडू पाठविण्यात आले तेव्हापासूनच यंदा सर्वोत्तम कामगिरीची मला खात्री होती. १९६८ ला पॅरालिम्पिक सुरू झाल्यापासून २०१६ च्या रिओ आयोजनापर्यंत आमच्या खेळाडूंनी केवळ १२ पदके जिंकली होती. यंदा १९ पदके जिंकून १६२ देशांमध्ये भारत २४व्या स्थानी आला.त्यातही अविस्मरणीय कामगिरीसह पदकांची कमाई केली. सुमित अंतिलने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्ण, अवनी लेखराने विश्व विक्रमाची बरोबरी करीत सुवर्ण, तर मनीष नरवालने पिस्तूल प्रकारात विक्रमी सुवर्ण पटकविले. निषाद कुमार आणि प्रवीण कुमार यांनी उंच उडीत आशियाई विक्रम प्रस्थापित केले.

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा स्वतः मार्ग दाखवतात, तेव्हा खेळाडूंचे काम सोपे होते. टोकियोकडे रवाना होण्याआधी मोदींनी दोन तास खेळाडूंशी संवाद साधला. पदक जिंकल्यानंतर प्रत्यक्ष बोलून पाठ थोपटली. सर्वोच्च नेतृत्वाकडून, असे प्रोत्साहन मिळणे खेळाडूच्या यशात मोठी भूमिका बजावते.भारतीय खेळाडूंनी हा चमत्कार कसा केला, याबाबत मला वारंवार विचारणा झाली. मी म्हणेन,‘भारत सरकार, पॅरालिम्पिक समिती, पॅरा स्पोर्टसला समर्थन देणारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि निमशासकीय संघटना यांच्यातील झालेल्या बदलाचा आणि योग्य समन्वयाचा हा परिणाम आहे.’ पीसीआयमध्ये आम्ही खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम केले. 

२०१६च्या पॅरालिम्पिकची पदक विजेती म्हणून खेळाडूला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सकारात्मक निकाल येऊ शकतात हे मी अनुभवातून सिद्ध केले. रिओमध्ये चार पदके मिळाल्यापासून पॅरास्पोर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. दिव्यांग खेळाडू क्षमतेच्या बळावर काहीही करू शकतात, अनेकजण सशक्त व्यासपीठ म्हणून आमच्या खेळाकडे पाहू लागले. धोरणे अधिक सर्वसमावेशक झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पाठिंबा लाभला. खेळाडूंनी कशाचीही काळजी न करता तयारीवर लक्ष केंद्रित करावे याची खात्री पटली. कोरोनामुळे मर्यादा असताना सरकारने आमच्या तयारीसाठी कुठलीही कसर शिल्लक राखली नाही. भारतात आता पॅरालिम्पिकचे नवे पर्व सुरू झाले, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. टोकियो २०२० ही केवळ सुरुवात आहे.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारतGoldसोनं