शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:09 IST

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

ठळक मुद्देकाही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

दीपा मलिक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण आणि आठ रौप्यासह भारताने अभूतपूर्व १९ पदके जिंकली. त्यामुळे माझ्या आनंदाला उधाण आले आहे. नऊ प्रकारात ५४ खेळाडू पाठविण्यात आले तेव्हापासूनच यंदा सर्वोत्तम कामगिरीची मला खात्री होती. १९६८ ला पॅरालिम्पिक सुरू झाल्यापासून २०१६ च्या रिओ आयोजनापर्यंत आमच्या खेळाडूंनी केवळ १२ पदके जिंकली होती. यंदा १९ पदके जिंकून १६२ देशांमध्ये भारत २४व्या स्थानी आला.त्यातही अविस्मरणीय कामगिरीसह पदकांची कमाई केली. सुमित अंतिलने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्ण, अवनी लेखराने विश्व विक्रमाची बरोबरी करीत सुवर्ण, तर मनीष नरवालने पिस्तूल प्रकारात विक्रमी सुवर्ण पटकविले. निषाद कुमार आणि प्रवीण कुमार यांनी उंच उडीत आशियाई विक्रम प्रस्थापित केले.

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा स्वतः मार्ग दाखवतात, तेव्हा खेळाडूंचे काम सोपे होते. टोकियोकडे रवाना होण्याआधी मोदींनी दोन तास खेळाडूंशी संवाद साधला. पदक जिंकल्यानंतर प्रत्यक्ष बोलून पाठ थोपटली. सर्वोच्च नेतृत्वाकडून, असे प्रोत्साहन मिळणे खेळाडूच्या यशात मोठी भूमिका बजावते.भारतीय खेळाडूंनी हा चमत्कार कसा केला, याबाबत मला वारंवार विचारणा झाली. मी म्हणेन,‘भारत सरकार, पॅरालिम्पिक समिती, पॅरा स्पोर्टसला समर्थन देणारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि निमशासकीय संघटना यांच्यातील झालेल्या बदलाचा आणि योग्य समन्वयाचा हा परिणाम आहे.’ पीसीआयमध्ये आम्ही खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम केले. 

२०१६च्या पॅरालिम्पिकची पदक विजेती म्हणून खेळाडूला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सकारात्मक निकाल येऊ शकतात हे मी अनुभवातून सिद्ध केले. रिओमध्ये चार पदके मिळाल्यापासून पॅरास्पोर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. दिव्यांग खेळाडू क्षमतेच्या बळावर काहीही करू शकतात, अनेकजण सशक्त व्यासपीठ म्हणून आमच्या खेळाकडे पाहू लागले. धोरणे अधिक सर्वसमावेशक झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पाठिंबा लाभला. खेळाडूंनी कशाचीही काळजी न करता तयारीवर लक्ष केंद्रित करावे याची खात्री पटली. कोरोनामुळे मर्यादा असताना सरकारने आमच्या तयारीसाठी कुठलीही कसर शिल्लक राखली नाही. भारतात आता पॅरालिम्पिकचे नवे पर्व सुरू झाले, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. टोकियो २०२० ही केवळ सुरुवात आहे.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारतGoldसोनं