शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

बलाढ्य मुंबई ‘बॅकफूट’वर

By admin | Updated: January 12, 2017 01:31 IST

पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर गोलंदाजांचा सुमार कामगिरीचा फटका बसल्याने गतविजेते मुंबईकर रणजी अंतिम सामन्याच्या

इंदूर : पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर गोलंदाजांचा सुमार कामगिरीचा फटका बसल्याने गतविजेते मुंबईकर रणजी अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुजरातविरुध्द बॅकफूटवर आले. मुंबईचा डाव पहिल्या दिवशी २२८ धावांवर संपुष्टात आणल्यानंत गुजरातने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९१ धावांची मजल मारत ६३ धावांची निर्णायक आघाडी मिळवली आहे. अजूनही त्यांचे ४ फलंदाज बाद होण्याचे बाकी आहेत. कर्णधार पार्थिव पटेल (९०) आणि मनप्रित जुनेजा (७७) यांनी गुजरातला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.होळकर स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातने सावध सुरुवात केली. त्यात समित गोहेल (४) आणि प्रियांक पांचाळ (६) या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केल्यानंतरही मुंबईकरांना पकड मिळवण्यात अपयश आले. भार्गव मेराई आणि पार्थिव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. अभिषेक नायरने भार्गवला बाद करुन ही जोडी फोडली. भार्गवने १०० चेंडूत ७ चौकारांसह ४५ धावा काढल्या.यानंतर, पार्थिव - मनप्रित जुनेजा या जोडीने चांगलाच जम बसवताना मुंबईकरांना घाम गाळण्यास लावले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची महत्वपुर्ण भागीदारी केली. पुन्हा एकदा नायर मुंबईसाठी मोलाचा बळी मिळवताना पार्थिवला बाद केले. १४६ चेंडूत १२ चौकारांसह ९० धावा करुन पार्थिव ‘नर्व्हस नाइंटी’चा बळी ठरला. नंतर जुनेजाही शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने शतक ठोकण्यात अपयशी ठरला. त्याने ९५ चेंडूत ११ चौकारांसह शानदार ७७ धावांची खेळी केली. जुनेजानंतर रुजुल भट ३८ चेंडूत ४ चौकारांसह २५ धावा काढून परतला. त्याला बलविंदर संधूने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर चिराग गांधी (१७*) आणि रुष कलारिया (१६*) यांनी दिवसअखेरपर्यंत नाबाद राहताना गुजरातची आघाडी वाढवली. मुंबईकडून अभिषेक नायरने यशस्वी मारा करताना ९१ धावांत ३ बळी घेतले. तर, शार्दुल ठाकूर (२/६७), बलविंदर संधू (१/५४) यांनीही चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)जीवदान महागात पडले...७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा मनप्रित जुनेजा याला मिळालेले जीवदान मुंबईला महागात पडले. जुनेजा वैयक्तिक १५ धावांवर खेळत असताना, नायरच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिडविकेटला उडालेला त्याचा झेल श्रेयश अय्यरने सोडला.या जीनदानाचा जुनेजाने पुरेपूर फायदा घेताना शानदार अर्धशतकासह कर्णधार पार्थिवसह महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली.धावफलकमुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकात सर्वबाद २२८ धावा.गुजरात (पहिला डाव) : समित गोहेल झे. यादव गो. ठाकूर ४, प्रियांक पांचाळ झे. तरे गो. नायर ६, भार्गब मेराई झे. तरे गो. नायर ४५, पार्थिव पटेल झे. तरे गो. नायर ९०, मनप्रित जुनेजा झे. व गो. ठाकूर ७७, रुजुल भट झे. शॉ गो. संधू २५, चिराग गांधी खेळत आहे १७, रुष कलारिया खेळत आहे १६. अवांतर - ११. एकूण : ९२ षटकात ६ बाद २९१ धावा. गोलंदाजी : शार्दुल ठाकूर २३-४-६७-२; बलविंदर संधू २१-२-५४-१; अभिषेक नायर २७-६-९१-३; विजय गोहिल ८-०-३४-०; विशाल दाभोळकर ९-३-२१-०; सिद्धेश लाड ४-०-१८-०.