शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

...तर सेहवागचं तोंड होणार बंद

By admin | Updated: June 30, 2017 11:13 IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, वेंकटेश प्रसाद यांनी अर्ज केले आहेत. रवी शास्त्री यांनी अजून अर्ज केला नसला तरी..

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सध्या वेगवेगळया नावांची चर्चा असून, रवी शास्त्रींच्या बरोबरीने विरेंद्र सेहवागचे नावही या शर्यतीत आघाडीवर आहे. प्रशिक्षकपदासाठी सेहवागने फक्त दोन ओळींचा अर्ज केल्याचे वृत्त काही प्रसिद्धीमाध्यमांनी दिल्याने सेहवाग चर्चेत आला होता. मीडियामध्ये प्रसिध्द झालेली दोन ओळींच्या अर्जाची बातमी  खोडून काढताना सेहवागने आपण भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार अर्ज केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 
 
जर मला दोन ओळींचा अर्ज पाठवायचा असेल तर, त्यासाठी माझे नावच पुरेसे आहे असे सेहवागने म्हटले आहे. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर सेहवागची सोशल मीडियाच्या पीचवर जोरदार बॅटिंग सुरु असेत. त्याचे प्रत्येक टि्वट बातमीचा विषय बनतो. त्यामुळे उद्या जर सेहवागची प्रशिक्षकपदी निवड झालीच तर, त्याला तोंड बंद ठेवायला सांगितले जाईल असे डेक्कन क्रॉनिकलने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. 
 
आणखी वाचा 
 
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, वेंकटेश प्रसाद यांनी अर्ज केले आहेत. रवी शास्त्री यांनी अजून अर्ज केला नसला तरी, अर्ज करण्यासाठी सचिन तेंडुलकरने त्यांचे मन वळवले आहे. त्यामुळे शास्त्रींनी अर्ज केल्यास पहिली पसंती तेच असतील. कारण कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सचिन तेंडुलकरचा त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. 
 
बीसीसीआय विचारेल तेव्हाच मी मत मांडेन : कोहली
नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत बीसीसीआयने मत विचारले, तरच मी याबाबत माझे मत देईल, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. 
सचिनच्या मध्यस्थीनंतर शास्त्री कोचपदासाठी अर्ज करण्यास तयार
सचिनने रवी शास्त्रीशी चर्चा केल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला तयार झाले आहेत. प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सदस्यानेच थेट शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने शास्त्रींची अनिल कुंबळेंच्या जागी प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या रवी शास्त्री यांनी आपण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसल्याचे आधी म्हटले होते. संघ संचालक म्हणून चांगली कामगिरी केल्यानंतरही आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असा आरोप शास्त्रींनी केला होता.