शास्त्रींच्या उपस्थितीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल

By Admin | Updated: June 3, 2015 00:47 IST2015-06-03T00:47:23+5:302015-06-03T00:47:23+5:30

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याच्या

Shastri's presence will help us improve our morale | शास्त्रींच्या उपस्थितीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल

शास्त्रींच्या उपस्थितीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याच्या बोर्डाचे निर्णयाचे स्वागत केले. शास्त्री यांच्या उपस्थितीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, असे
विराट म्हणाला. आॅस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे रवी शास्त्री १०
जूनपासून प्रारंभ होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यात संघासोबत कायम राहणार आहेत.
कोहली म्हणाला, ‘शास्त्री जबाबदारी झटकणारे व्यक्ती नाही. ते प्रत्येक पदाला न्याय देणारे व्यक्ती आहे. युवा खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करण्यास शास्त्री सक्षम
आहेत. त्यांच्या वक्तव्याचा लोक आदर करतात. शास्त्री यांच्या उपस्थितीचा संघाला लाभ मिळेल.’ गेल्या वर्षी शास्त्री यांनी दिलेल्या टीप्सचा लाभ झाला, असेही विराट म्हणाला.
शास्त्री यांनी गेल्या वर्षी मला उजव्या यष्टीचा गार्ड घेण्याचा सल्ला दिला होती. मी सुरुवातीला त्याच्या मतासोबत सहमत नव्हतो. असे जर केले तर गोलंदाजाला डावी यष्टी दिसेल, असे मला वाटत होते. शास्त्री यांनी केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. मी इंग्लंडमध्ये तसे केले नाही, पण आॅस्ट्रेलियात मात्र त्यांचा सल्ला मानला. शास्त्री यांच्या टीप्सचा माझ्यासाठी उपयुक्त ठरल्या, असेही विराटने यावेळी सांगितले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Shastri's presence will help us improve our morale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.